शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

परभणी : बंधाऱ्यातील पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:25 IST

पूर्णा नदीपात्रातील निळा-कंठेश्वर बंधाºयाच्या रखडलेल्या कामामुळे ४ व ५ आॅगस्ट या दिवशी नदी पात्रात आलेले पाणी अडवू न शकल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. बंधाºयाचे काम पूर्ण झाले असते तर हे पाणी साठवले गेले असते. या पाण्यामुळे परिसरातील ९०० हेक्टर जमीन व नदीकाठावरील गावातील पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): पूर्णा नदीपात्रातील निळा-कंठेश्वर बंधाºयाच्या रखडलेल्या कामामुळे ४ व ५ आॅगस्ट या दिवशी नदी पात्रात आलेले पाणी अडवू न शकल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. बंधाºयाचे काम पूर्ण झाले असते तर हे पाणी साठवले गेले असते. या पाण्यामुळे परिसरातील ९०० हेक्टर जमीन व नदीकाठावरील गावातील पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता.तालुक्यातील कंठेश्वर, महागाव, निळा शिवारातील पूर्णा नदीवर २००९ मध्ये कोल्हापुरी बंधाºयाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. १० वर्षे उलटूनही या बंधाºयाचे काम केवळ ८० टक्केच पूर्ण झाले आहे. शासनाकडून कधी अतिरिक्त निधी तर अधिकाऱ्यांची काम कुचराई तसेच कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे १० वर्षे उलटले तरी या बंधाºयाचे काम पूर्ण झाले नाही. संभाव्य बंधाºयाची उंची साडेचार मीटर एवढी असून हा बंधारा पूर्ण झाल्यास परिसरातील ९०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यामध्ये निळा येथील ४०० हेक्टर, कळगाव येथील १०० हेक्टर, कंठेश्वर येथील १००, आजदापूर १०० हेक्टर तर कान्हडखेड या परिसरातील शेतकºयांनाही या पाण्याचा उपयोग होणार आहे. त्याच शेती सिंचनाबरोबरच अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात येणार आहे. कोल्हापुरी बंधाºयासाठी शासनाकडून वेळोवेळी अतिरिक्त निधी देण्यात आला. कामाचे वाढते स्वरुप व दिलेला निधी अपुरा पडत असल्याने वर्षानुवर्षे या बंधाºयाचे काम रखडत गेले.मागील अनेक वर्षापासून दर पावसाळ्यात पूर्णा शहराजवळील नदीवरील बंधाºयातील पाणी उलटून पुढे जाते. हे पाणी कंठेश्वर, निळा, महागाव या शिवारातील बंधाºयात जाते; परंतु, या बंधाºयाचे काम अपूर्ण असल्याने या बंधाºयात पाणी साठत नाही. परिणामी हे पाणी कंठेश्वर येथे गोदावरी नदीपात्रात जाते. याही वर्षी शनिवार, रविवारी झालेल्या पावसाच्या पाण्याची कुठेही साठवण न झाली नसल्याने पूर्णा नदीपात्रात आले होते.यावर्षीही या पाण्याचा मोठा अपव्यय झाला आहे. बंधाºयाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी ग्रामस्थांचा अनेक वर्षापासून शासनाशी संघर्ष सुरु आहे.कामाची मुदत चार वर्षापूर्वीच संपली४पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर, महागाव व निळा शिवारातील बंधाºयाच्या प्रत्यक्ष कामास १० वर्षापूर्वी सुरुवात झाली. या बंधाºयाची अंतिम मुदत २०१५ मध्ये संपुष्टात आली. या बाबत लघु पाटबंधारे विभागाने वेळोवेळी वाढीव मुदतवाढ मागितली; परंतु, ती मिळाली नाही. या रखडलेल्या कामाबाबत ग्रामस्थांनी आपली तक्रार लोकशाही दिनामध्ये मांडली.४या कामाचा प्रश्न तहसील, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्यासह मंत्रालयापर्यंत पोहचविण्यात आला; परंतु, संबंधित विभागाने कंत्राटदारांकडून खुलासा मागविला. परंतु, या खुलासा काय आला व त्याचे पुढे काय झाले, याबाबत कळू शकले नाही. अर्धवट कामामुळे मात्र या बंधाºयातील पाणी वाया जात आहे. याचा फटका शेतकºयांना बसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीWaterपाणी