शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

परभणी : बंधाऱ्यातील पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:25 IST

पूर्णा नदीपात्रातील निळा-कंठेश्वर बंधाºयाच्या रखडलेल्या कामामुळे ४ व ५ आॅगस्ट या दिवशी नदी पात्रात आलेले पाणी अडवू न शकल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. बंधाºयाचे काम पूर्ण झाले असते तर हे पाणी साठवले गेले असते. या पाण्यामुळे परिसरातील ९०० हेक्टर जमीन व नदीकाठावरील गावातील पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): पूर्णा नदीपात्रातील निळा-कंठेश्वर बंधाºयाच्या रखडलेल्या कामामुळे ४ व ५ आॅगस्ट या दिवशी नदी पात्रात आलेले पाणी अडवू न शकल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. बंधाºयाचे काम पूर्ण झाले असते तर हे पाणी साठवले गेले असते. या पाण्यामुळे परिसरातील ९०० हेक्टर जमीन व नदीकाठावरील गावातील पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता.तालुक्यातील कंठेश्वर, महागाव, निळा शिवारातील पूर्णा नदीवर २००९ मध्ये कोल्हापुरी बंधाºयाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. १० वर्षे उलटूनही या बंधाºयाचे काम केवळ ८० टक्केच पूर्ण झाले आहे. शासनाकडून कधी अतिरिक्त निधी तर अधिकाऱ्यांची काम कुचराई तसेच कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे १० वर्षे उलटले तरी या बंधाºयाचे काम पूर्ण झाले नाही. संभाव्य बंधाºयाची उंची साडेचार मीटर एवढी असून हा बंधारा पूर्ण झाल्यास परिसरातील ९०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यामध्ये निळा येथील ४०० हेक्टर, कळगाव येथील १०० हेक्टर, कंठेश्वर येथील १००, आजदापूर १०० हेक्टर तर कान्हडखेड या परिसरातील शेतकºयांनाही या पाण्याचा उपयोग होणार आहे. त्याच शेती सिंचनाबरोबरच अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात येणार आहे. कोल्हापुरी बंधाºयासाठी शासनाकडून वेळोवेळी अतिरिक्त निधी देण्यात आला. कामाचे वाढते स्वरुप व दिलेला निधी अपुरा पडत असल्याने वर्षानुवर्षे या बंधाºयाचे काम रखडत गेले.मागील अनेक वर्षापासून दर पावसाळ्यात पूर्णा शहराजवळील नदीवरील बंधाºयातील पाणी उलटून पुढे जाते. हे पाणी कंठेश्वर, निळा, महागाव या शिवारातील बंधाºयात जाते; परंतु, या बंधाºयाचे काम अपूर्ण असल्याने या बंधाºयात पाणी साठत नाही. परिणामी हे पाणी कंठेश्वर येथे गोदावरी नदीपात्रात जाते. याही वर्षी शनिवार, रविवारी झालेल्या पावसाच्या पाण्याची कुठेही साठवण न झाली नसल्याने पूर्णा नदीपात्रात आले होते.यावर्षीही या पाण्याचा मोठा अपव्यय झाला आहे. बंधाºयाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी ग्रामस्थांचा अनेक वर्षापासून शासनाशी संघर्ष सुरु आहे.कामाची मुदत चार वर्षापूर्वीच संपली४पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर, महागाव व निळा शिवारातील बंधाºयाच्या प्रत्यक्ष कामास १० वर्षापूर्वी सुरुवात झाली. या बंधाºयाची अंतिम मुदत २०१५ मध्ये संपुष्टात आली. या बाबत लघु पाटबंधारे विभागाने वेळोवेळी वाढीव मुदतवाढ मागितली; परंतु, ती मिळाली नाही. या रखडलेल्या कामाबाबत ग्रामस्थांनी आपली तक्रार लोकशाही दिनामध्ये मांडली.४या कामाचा प्रश्न तहसील, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्यासह मंत्रालयापर्यंत पोहचविण्यात आला; परंतु, संबंधित विभागाने कंत्राटदारांकडून खुलासा मागविला. परंतु, या खुलासा काय आला व त्याचे पुढे काय झाले, याबाबत कळू शकले नाही. अर्धवट कामामुळे मात्र या बंधाºयातील पाणी वाया जात आहे. याचा फटका शेतकºयांना बसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीWaterपाणी