शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

परभणी : वाळू तस्करीसाठी आता बैलगाडीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:52 IST

ट्रक आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू वाहतूक करणे धोकादायक झाल्याने वाळूमाफियांनी आता तस्करीसाठी चक्क बैलगाडीचा वापर सुरू केला आहे. हा नवा फंडा वापरत दररोज हजारो ब्रास वाळू उपसली जात असताना महसूल प्रशासन मात्र कानाडोळा करीत आहे. पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात वाळूचे २२ धक्के आहेत. यावर्षी गोदावरीचे वरचे टोक नाथ्रा ते मुदगलपर्यंत केवळ एका वाळू धक्याचा लिलाव झाला आहे. त्यामुळे उर्वरित वाळू धक्यातून अवैध उपसा सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : ट्रक आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू वाहतूक करणे धोकादायक झाल्याने वाळूमाफियांनी आता तस्करीसाठी चक्क बैलगाडीचा वापर सुरू केला आहे. हा नवा फंडा वापरत दररोज हजारो ब्रास वाळू उपसली जात असताना महसूल प्रशासन मात्र कानाडोळा करीत आहे.पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात वाळूचे २२ धक्के आहेत. यावर्षी गोदावरीचे वरचे टोक नाथ्रा ते मुदगलपर्यंत केवळ एका वाळू धक्याचा लिलाव झाला आहे. त्यामुळे उर्वरित वाळू धक्यातून अवैध उपसा सुरू आहे.महसूल प्रशासन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करीत आहे. रस्त्यावरून जाणारी ही वाहने पकडून हजारो रुपयांचा दंड लावला जात आहे. त्यामुळे वाळूमाफियांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वाहनांवर वारंवार कारवाई होत असल्याने वाळूमाफियांनी आता नवीन शक्कल शोधली आहे. त्यात बैलगाडीचा वापर केला जात आहे. वाळूघाटांवरून बैलगाडीच्या सहाय्याने वाळू आणायची, या वाळूचा साठा करायचा आणि तेथून वाटेल तेथे ही वाळू घेऊन जायची. मागील काही महिन्यांपासून अशा पद्धतीने वाळूची तस्करी जोरात सुरू आहे; परंतु, महसूल प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वाळूची सर्रास चोरी सुरू असल्याचे दिसत आहे.जुन्या पद्धतीला नवा मुलामाच्१५ ते २० वर्षापूर्वी ज्यांना बांधकाम करावयाचे आहे, असे व्यक्ती गोदाकाठच्या गावात जाऊन बैलगाडी किंवा गाढवावर वाळू आणत होते. मध्यंतरीच्या काळात अशा पद्धतीने वाळू आणणे खर्चीक झाल्याने ही पद्धत बंद झाली होती. मात्र मागील काही दिवसांपासून वाळू वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर पुन्हा दिसू लागला आहे.च्गोदावरी पात्रातून वाहनाने वाळू चोरणे अडचणीचे ठरत असल्याने बैलगाडीचा वापर सुरू करण्यात आला आहे. सूर्योदयापासून वाळू उपसण्याला सुरूवात होत असून ही वाळू गावाबाहेर साठा करून ठेवली जाते. तेथे विक्री करण्याचा व्यवसाय सध्या सुरू आहे. नदीपात्रातील वाळू उपसण्यासाठी बैलगाडीचालक १५० ते २०० रुपये घेतात. विशेष म्हणजे, बैलगाडी व गाढवावरून वाळू वाहतूक करताना कोणी रोखत नाही. त्यामुळे हा उपसा बिनबोभाटपणे सुरू आहे.नियमबाह्यपद्धतीने होतेय वाळूचे उत्खननच्मागील काही वर्षांपासूून वाळू धक्क्याच्या लिलावात पुढाऱ्यांचा शिरकाव झाला आहे. वाळू व्यवसायातून करोडो रुपयांची माया जमविली जात आहे. नियमबाह्यउपसा केल्याने पात्रात मोठे खड्डे पडले असून उन्हाळ्यात पाणीसाठा होत नाही. मागील दोन वर्षात वाळूचे दर गगनाला भिडले आहेत.च्त्यामुळे बांधकाम करणे शक्य नाही. गोपेगाव आणि डाकू पिंपरी या दोन धक्यांचा लिलाव झाला असून त्यातून प्रचंड वाळू उत्खनन होत आहे. दिवसा मजुरांच्या सहाय्याने आणि रात्री यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र याविरुद्ध कारवाई होत नाही.अधिकाºयांवरच नजरकारवाईच्या धास्तीने वाळू चोरी कमी झाली असली तरी वाळू तस्करी करणारे महसूल विभागाच्या अधिकाºयांवर नजर ठेवून तस्करी करीत आहेत.अधिकाºयांच्या निवासस्थानासमोरच पाळत ठेवली जात असून गाडी कोणत्या दिशेने जाते, त्यावरून वाळू तस्करीचा वेळ ठरविला जात आहे. त्यामुळे अधिकाºयांची कारवाई अनेक वेळा निष्फळ ठरते.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूriverनदी