शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

परभणी : निष्काळजीने रखडली अधिग्रहणाची देयके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:18 IST

मागील वर्षीच्या टंचाई काळात अधिग्रहित केलेल्या जलस्त्रोतांची देयके प्रशासकीयस्तरावरील निष्काळजीपणामुळेच रखडली असल्याची बाब स्पष्ट झाली असून या प्रकरणात आता तरी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ परिपूर्ण अहवाल सादर करुन रखडलेली देयके अदा करावीत, अशी मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागील वर्षीच्या टंचाई काळात अधिग्रहित केलेल्या जलस्त्रोतांची देयके प्रशासकीयस्तरावरील निष्काळजीपणामुळेच रखडली असल्याची बाब स्पष्ट झाली असून या प्रकरणात आता तरी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ परिपूर्ण अहवाल सादर करुन रखडलेली देयके अदा करावीत, अशी मागणी होत आहे.२०१६-१७ च्या उन्हाळ्यात परभणी जिल्ह्यामध्ये टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. या काळात ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी धावपळ थांबावी, या उद्देशाने उपलब्ध खाजगी जलस्त्रोत अधिग्रहित करुन हे पाणी गावकºयांना खुले करुन दिले होते.ठिकठिकाणी विहीर आणि बोअर अधिग्रहण केल्यानंतर जलस्त्रोतांच्या मालकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाण्याचा मोबदला वितरित केला जातो. मात्र जिल्ह्यात मागील वर्षीच्या उन्हाळ्यात अधिग्रहित केलेल्या जलस्त्रोतांची देयके अद्यापपर्यंत वितरित झाली नाहीत. त्यामुळे ज्यांनी संकटाच्या काळात पाणी देऊन मदत केली, त्यांनाच अडचणीत आणण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले. यावर्षी पुन्हा पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असून मागील वर्षीचीच देयके रखडल्याने यावर्षी पाणी उपलब्ध करुन दिले जाते की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात अधिग्रहणाच्या देयकांविषयी ओरड वाढल्यानंतर जिल्हा प्रशासनाने २५ मे २०१८ रोजी ग्रामीण पाणीपुरवठा योजना, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, संबंधित अधिकाºयांची बैठक घेऊन अधिग्रहणाच्या संदर्भात प्रलंबित प्रकरणांची परिपूर्ण माहिती तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतु, त्यानंतरही जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती विभागातून या सूचनांचे पालन झाले नाही. परिणामी अधिग्रहणाची देयके अजूनही रखडलेली आहेत.परिपूर्ण अहवाल पाठविण्याच्या होत्या सूचना४विहीर, बोअर अधिग्रहणासाठी ग्रामपंचायतीने घेतलेला ठराव (दिनांक), ग्रामपंचायत कार्यालयातून पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक, पंचायत समितीतून तहसील कार्यालयास प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक तसेच तहसील कार्यालयाने अधिग्रहण आदेश निर्गमित केल्याचा दिनांक आदी माहिती नमुना विवरण पत्र १ मध्ये आणि निधीच्या माहितीचा तपशील विवरण पत्र २ मध्ये देण्याच्या सूचना जुलै महिन्यातच जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या.४यापूर्वी मे महिन्यात व जून महिन्यातही रखडलेल्या देयकासंदर्भात बैठक घेऊन माहिती घेतली; परंतु, या महत्वपूर्ण प्रकरणात वारंवार पाठपुरावा करुनही परिपूर्ण माहिती सादर झाली नाही. परिणामी अधिग्रहणाची देयके रखडली आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकाºयांनी जिल्ह्याची परिपूर्ण माहिती एकत्रितरित्या कारणमिमांसा व सुस्पष्ट अभिप्रायासह वेळेत सादर केली असती तर रखडलेली प्रकरणे निकाली निघाली असती.या कारणांमुळे रखडली प्रकरणे४२०१६-१७ च्या टंचाई काळात विहीर, बोअर अधिग्रहणासाठी ग्रामपंचायतीकडून प्राप्त झालेल्या प्रकरणात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी तातडीने कार्यवाही केली नाही. काही प्रकरणे एक ते दोन महिन्यांच्या विलंबाने तर काही प्रकरणे दोन ते तीन महिन्यांच्या विलंबाने तहसील कार्यालयाकडे पाठविली. तहसील कार्यालयाने देखील या प्रकरणात त्वरित निर्णय न घेता विलंबाने आदेश निर्गमित केले आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने निधीची मागणी केलेल्या काही प्रकरणात तहसील कार्यालयाचे अधिग्रहणासंदर्भात आदेशच नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये तातडीने लक्ष घालून निकाली काढण्याचे आदेश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले; परंतु, यावर गांभीर्याने प्रयत्न झाले नाहीत. परिणामी ही प्रकरणे रखडली आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीzpजिल्हा परिषद