शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

परभणी : जायकवाडीच्या पाणी आवर्तनाची अनिश्चितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पाथरी ( परभणी ) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून जिल्ह्याला खरीप आणि रबी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून जिल्ह्याला खरीप आणि रबी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आलेले पाणी आवर्तन बंद करण्यात आले आहे. सध्या कालव्यातून खडका पात्रात परळी थर्मलसाठी पाणी वाहत आहे. धरणात ३० टक्के पाणीसाठा असल्याने परभणी जिल्ह्याच्या सिंचनासाठी पाणी आवर्तन कसे आणि किती मिळणार? याबाबत अद्याप अनिश्चितता दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे.पैठण येथे जायकवाडीच्या धरणात वरच्या धरणातून पाणी सोडण्याबाबत मागील महिनाभर राज्य पातळीवर मोठे राजकारण आणि चर्चा सुरू होती. वरच्या धरणातील पाणी सोडण्यात आले असले तरी सध्या धरणात ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.जायकवाडी धरण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान समजले जात असले तरी पाणी मिळविण्यासाठी विशेषत: परभणी जिल्ह्यातील शेतकºयांना नेहमीच संघर्ष करावा लागत आहे. पाण्यासाठी अनेक वेळा राजकारणही झाले. जायकवाडी धरणाचा डावा कालवा परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातील वरखेड भागापासून सुरू होतो. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर या भागातील बहुतांश क्षेत्र सिंचनाखाली येते. पाथरी, मानवत, परभणी आणि पूर्णा तालुक्यातील काही भाग येतो. या भागासाठी वॉटर लाईफ असलेल्या डाव्या कालव्यातून धरणे बांधतेवेळी २५०० क्युसेस क्षमतेने पाणी सोडण्याचे निश्चित झाले होते. सध्या मात्र १२०० क्युसेसनेच पाणी मिळते. त्यामुळे पूर्वी बारामाही सिंचन होणाºया कालवा कार्यक्षेत्रात आता २५ टक्के सुद्धा सिंचन होत नाही. दिवसेंदिवस पाण्यासाठी शेतकरी आणि या भागातील ग्रामस्थांंना संघर्ष करावा लागत आहे.परभणी जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात मागील दोन महिने पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, पाथरी तालुक्यात तर अधिकच बिकट परिस्थिती आहे.पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी हे चार तालुके गंभीर दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले आहेत. खरीप हंगामातील पिकांसाठी संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आली होती. याच आवर्तनात खरिपाच्या पिकासोबत रबी पेरणीसाठी पाणी सोडण्यात आले. पाथरी उपविभागांतर्गत ३५ हजार हेक्टर क्षेत्र असताना या पाणी आवर्तनामध्ये ५ हजार हेक्टर क्षेत्रत ओलिताखाली आले. सध्या सिंचनासाठी पाणी बंद करून परळी थर्मलसाठी खडका डोहात पाणी सोडण्यात येत आहे.दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आणखी सात महिने उन्हाळा आहे. त्यामुळे आगामी काळात चार पाणीपाळ्या सोडणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही नियोजन झाले नाही.कालवा सल्लागार समिती : बैठकीला खो४जायकवाडी धरणात ३० टक्के पेक्षा कमी पाणी आहे. परभणी जिल्ह्याला पाणी सोडण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच जायकवाडी धरणातून किती पाणी सोडावे, यासाठी राज्यस्तरावर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येतो.४दरवर्षी १५ आॅक्टोबरनंतर होणारी बैठक नोव्हेंबर महिना संपत आला तरीही झाली नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.परभणी जिल्ह्यात विशेषत: पाथरी मतदार संघात गंभीर दुष्काळ पडल्याने शेतकºयांच्या हितासाठी जायकवाडी धरणातील पाणी सिंचन तसेच पिण्यासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.-मोहन फड, आमदार, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी