शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

परभणी : जायकवाडीच्या पाणी आवर्तनाची अनिश्चितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पाथरी ( परभणी ) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून जिल्ह्याला खरीप आणि रबी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून जिल्ह्याला खरीप आणि रबी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आलेले पाणी आवर्तन बंद करण्यात आले आहे. सध्या कालव्यातून खडका पात्रात परळी थर्मलसाठी पाणी वाहत आहे. धरणात ३० टक्के पाणीसाठा असल्याने परभणी जिल्ह्याच्या सिंचनासाठी पाणी आवर्तन कसे आणि किती मिळणार? याबाबत अद्याप अनिश्चितता दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे.पैठण येथे जायकवाडीच्या धरणात वरच्या धरणातून पाणी सोडण्याबाबत मागील महिनाभर राज्य पातळीवर मोठे राजकारण आणि चर्चा सुरू होती. वरच्या धरणातील पाणी सोडण्यात आले असले तरी सध्या धरणात ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.जायकवाडी धरण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान समजले जात असले तरी पाणी मिळविण्यासाठी विशेषत: परभणी जिल्ह्यातील शेतकºयांना नेहमीच संघर्ष करावा लागत आहे. पाण्यासाठी अनेक वेळा राजकारणही झाले. जायकवाडी धरणाचा डावा कालवा परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातील वरखेड भागापासून सुरू होतो. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर या भागातील बहुतांश क्षेत्र सिंचनाखाली येते. पाथरी, मानवत, परभणी आणि पूर्णा तालुक्यातील काही भाग येतो. या भागासाठी वॉटर लाईफ असलेल्या डाव्या कालव्यातून धरणे बांधतेवेळी २५०० क्युसेस क्षमतेने पाणी सोडण्याचे निश्चित झाले होते. सध्या मात्र १२०० क्युसेसनेच पाणी मिळते. त्यामुळे पूर्वी बारामाही सिंचन होणाºया कालवा कार्यक्षेत्रात आता २५ टक्के सुद्धा सिंचन होत नाही. दिवसेंदिवस पाण्यासाठी शेतकरी आणि या भागातील ग्रामस्थांंना संघर्ष करावा लागत आहे.परभणी जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात मागील दोन महिने पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, पाथरी तालुक्यात तर अधिकच बिकट परिस्थिती आहे.पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी हे चार तालुके गंभीर दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले आहेत. खरीप हंगामातील पिकांसाठी संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आली होती. याच आवर्तनात खरिपाच्या पिकासोबत रबी पेरणीसाठी पाणी सोडण्यात आले. पाथरी उपविभागांतर्गत ३५ हजार हेक्टर क्षेत्र असताना या पाणी आवर्तनामध्ये ५ हजार हेक्टर क्षेत्रत ओलिताखाली आले. सध्या सिंचनासाठी पाणी बंद करून परळी थर्मलसाठी खडका डोहात पाणी सोडण्यात येत आहे.दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आणखी सात महिने उन्हाळा आहे. त्यामुळे आगामी काळात चार पाणीपाळ्या सोडणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही नियोजन झाले नाही.कालवा सल्लागार समिती : बैठकीला खो४जायकवाडी धरणात ३० टक्के पेक्षा कमी पाणी आहे. परभणी जिल्ह्याला पाणी सोडण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच जायकवाडी धरणातून किती पाणी सोडावे, यासाठी राज्यस्तरावर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येतो.४दरवर्षी १५ आॅक्टोबरनंतर होणारी बैठक नोव्हेंबर महिना संपत आला तरीही झाली नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.परभणी जिल्ह्यात विशेषत: पाथरी मतदार संघात गंभीर दुष्काळ पडल्याने शेतकºयांच्या हितासाठी जायकवाडी धरणातील पाणी सिंचन तसेच पिण्यासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.-मोहन फड, आमदार, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी