शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

परभणी : अनधिकृत शाळांची पथकांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 23:44 IST

शिक्षणाच्या हक्क कायद्यातील तरतुदीनुसार परवानगी न घेता जिल्ह्यात काही शाळा चालविल्या जात असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्या आदेशावरुन पथकांनी जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात किती शाळा अनधिकृतरीत्या चालविल्या जातात, हे स्पष्ट होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिक्षणाच्या हक्क कायद्यातील तरतुदीनुसार परवानगी न घेता जिल्ह्यात काही शाळा चालविल्या जात असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्या आदेशावरुन पथकांनी जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात किती शाळा अनधिकृतरीत्या चालविल्या जातात, हे स्पष्ट होणार आहे.जिल्ह्यात शाळा सुरू करण्यासाठी राज्य शासनाची किंवा स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे आर.टी.ई. कायद्यानुसार असलेल्या तरतुदींची पूर्तता शाळांनी करणे बंधनकारक आहे. असे असताना अनेक शाळा परवानगीविनाच चालविल्या जात असल्याची माहिती मिळाल्याने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी या शाळांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.या आदेशानुसार पथकांनी शाळांच्या तपासणीला सुरुवातही केली आहे. आतापर्यंत पाच शाळांची तपासणी केली असून, त्यात काही त्रुटी आढळल्या आहेत. ज्या ठिकाणी शाळा सुरू करण्यास मान्यता दिली, तेथे शाळा सुरू न करता अन्य ठिकाणी शाळा चालविणे, वर्ग खोल्यांची उपलब्धता नसणे, मुलांसाठी रॅम्प नसणे, मुलींसाठी स्वच्छतागृहाचा अभाव, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था नसणे, अनधिकृत वर्ग चालविणे आदी त्रूटी आढळल्या आहेत.आतापर्यंत एकूण पाच शाळांची तपासणी करण्यात आली असून, त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला पाठविण्यात आला आहे. अजूनही ही तपासणी केली जाणार असून, आता जि.प. प्रशासन या शाळांविरुद्ध काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे....तर होऊ शकतो १ लाख रुपयांचा दंड४शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार कोणतीही शाळा संबंधित शासन किंवा प्राधिकरणाच्या हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरू करता येत नाही़ कलम १८ (५) नुसार जर राज्य शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगी प्रमाणपत्राशिवाय शाळा चालविण्यात येत असेल अथवा शाळेची मान्यता काढून घेतल्यानंतरही शाळा चालविण्यात येत असेल तर त्या शाळेला अनधिकृत घोषित करुन १ लाख रुपयांपर्यंतचा दंड करण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे ताकीद देऊनही अनधिकृत शाळा सुरू ठेवल्यास प्रति दिन १० हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद असल्याचे शासन आदेशावरून स्पष्ट होते

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाzpजिल्हा परिषद