शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : टँकरमुक्तीकडे शहराची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 01:02 IST

युआयडीएसएसएमटी आणि अमृत योजनेतून बनविलेल्या पाणीपुरवठा योजनेवर नळ जोडणी देण्याचे काम शहरात सुरु झाल्याने आगामी काळात नळ योजनेद्वारे मूबलक पाणी मिळणार असून संभाव्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी तयार केल्या जाणाऱ्या टँकरच्या आराखड्याला मंजुरी मिळण्याची शक्यता मावळली आहे. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यात शहराची वाटचाल टँकरमुक्तीकडे होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : युआयडीएसएसएमटी आणि अमृत योजनेतून बनविलेल्या पाणीपुरवठा योजनेवर नळ जोडणी देण्याचे काम शहरात सुरु झाल्याने आगामी काळात नळ योजनेद्वारे मूबलक पाणी मिळणार असून संभाव्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी तयार केल्या जाणाऱ्या टँकरच्या आराखड्याला मंजुरी मिळण्याची शक्यता मावळली आहे. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यात शहराची वाटचाल टँकरमुक्तीकडे होणार आहे.अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असून सध्या शहरवासियांना नळ जोडणी दिली जात आहे. येलदरी प्रकल्पातही मूबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. नव्या योजनेंतर्गत शहराच्या कानाकोपºयात जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी देणे शक्य होणार आहे. यावर्षी परभणीकरांना पाण्याचीही चिंता नाही. त्यामुळे यावर्षी प्रथमच उन्हाळ्यात शहरवासियांना टँकरद्वारे पाणी देण्यापासून मनपा प्रशासनाला मुक्ती मिळणार आहे.उन्हाळ्याची चाहूल लागताच प्रशासन संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी टंचाई कृती आराखडे तयार करण्यामध्ये मग्न असते. विंधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरती पूरक योजना, नवीन हातपंप घेणे आणि टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जाते. मात्र यावर्षी नवीन योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष नळ जोडणी दिली जाणार असल्याने या सर्व उपाययोजनांना बगल द्यावी लागणार आहे. येलदरी प्रकल्पातही पुरेसे पाणी आहे आणि शहरातही घराघरापर्यंत नळ योजना पोहचणार असल्याने टँकरला मंजुरी मिळण्याची शक्यता कमी आहे.लाखो रुपयांचा वाचणार खर्च४दरवर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईग्रस्त भागाला टँकरने पाणी देण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो; परंतु, यावर्षी नळ योजनेचे पाणी उपलब्ध होणार आहे. शिवाय महानगरपालिकेकडे स्वत:चे ४ टँकर उपलब्ध आहेत. त्यामुळे गरज पडल्यास या टँकरच्या सहाय्यानेही पाणी देणे शक्य आहे.४त्यामुळे यावर्षी टँकर्ससाठी वेगळा निधी मिळण्याची शक्यता कमी आहे. विभागीय आयुक्त कार्यालयानेही नळ योजनेद्वारेच पाणीपुरवठा करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता कमी असून टंचाई आराखडा गुंडाळावा लागणार आहे.जुनी जलवाहिनी होणार बंद४परभणी शहराला सध्या राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा केला जात आहे. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यास थेट येलदरीतून परभणीत पाणी येणार आहे. त्यामुळे शहरातील जुनी जलवाहिनी बंद करुन नवीन जलवाहिनीद्वारे पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक नळ धारकाला त्याचे नळ कनेक्शन नवीन योजनेमध्ये अपडेट करुन घ्यावे लागणार आहे.४नवीन योजनेंतर्गत शहरात १५ झोन तयार केले असून त्या झोनद्वारेच पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती मिळाली.हातपंपांची दुरुस्तीही प्रस्तावित४शहरातील विविध भागामध्ये ६२८ हातपंप असून संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन या हातपंपाची दुरुस्ती केली जाणार आहे. मनपाच्या निधीतून दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.२४ दलघमी पाण्याचे आरक्षण४परभणी शहराला वर्षभर लागणाºया २४ दलघमी पाण्याचे आरक्षण येलदरी प्रकल्पात करण्यात आले आहे. त्यामुळे वर्षभरात हे पाणी शहरासाठी मिळणार आहे.४शहरवासियांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी वर्षभरात केवळ ८ दलघमी पाण्याची आवश्यकता भासते. मात्र राहटी बंधाºयात पाणी सोडताना ते नदीवाटे येत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता.४हा अपव्यय गृहित धरुन सुमारे ३२ दलघमी पाणी पूर्वी आरक्षित केले जात होते. यावर्षी मात्र २४ दलघमी पाणी आरक्षित केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी