शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

बारावीच्या निकालात औरंगाबाद विभागात परभणी ‘टॉप’वर

By admin | Updated: May 30, 2017 15:13 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात टॉपवर राहिला असून, जिल्ह्याचा ९०.५९ टक्के निकाल लागला आहे.

ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 30 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात टॉपवर राहिला असून, जिल्ह्याचा ९०.५९ टक्के निकाल लागला आहे.
शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा मंगळवारी ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये औरंगाबाद विभागातून परभणी हा जिल्हा सर्वप्रथम आला आहे. जिल्ह्याचा ९०.५९ टक्के निकाल लागला आहे. 
परभणीनंतर दुस-या क्रमांकावर बीड जिल्हा राहिला असून, या जिल्ह्याचा ९०.४९ टक्के निकाल लागला आहे.
 
तिसरा क्रमांक औरंगाबाद जिल्ह्याचा असून, या जिल्ह्याचा ८९.७६ टक्के निकाल लागला आहे़ हिंगोली जिल्ह्याचा ८९.६२ टक्के निकाल लागला असून, सर्वात शेवटच्या क्रमांकावर जालना जिल्हा असून, या जिल्ह्याचा ८८.४९ टक्के निकाल लागला आहे.
परभणी जिल्ह्यातील २२ हजार ११० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार ५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १९ हजार ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये २ हजार ७९७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून, १० हजार ७६१ विद्यार्थी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
 
 ६ हजार २८९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, १३७ विद्यार्थी सर्वसाधारण  श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत़ जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा ९५.८० टक्के निकाल लागला आहे. या शाखेसाठी ९ हजार ५३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ५१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९ हजार ११७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ त्यामध्ये १२०९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ४ हजार ६९७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३ हजार १४६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६५ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत़ जिल्ह्याचा कला शाखेचा ८५.१८ टक्के निकाल लागला असून, या शाखेतून परीक्षेसाठी ९ हजार ९८४ विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाकडे नोंदणी केली होती.
 
त्यापैकी ९ हजार ९५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८ हजार ४८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ११७६ विशेष प्राविण्यासह, ४ हजार ९४१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ हजार ३१६ द्वितीय श्रेणीत तर ४७ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा जिल्ह्याचा ९३.४९ टक्के निकाल लागला असून, या परीक्षेसाठी २ हजार ८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली व सर्वच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ त्यामध्ये १ हजार ९५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ त्यामध्ये ३९७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ९२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६०४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २४ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत़ किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचा जिल्ह्याचा ८७.१७ टक्के निकाल लागला आहे़ या अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यातील ५०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली़ ४९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
 
 ४३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ त्यामध्ये १५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, १९६ प्रथमश्रेणीत, २२३ द्वितीय श्रेणीत तर १ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.
पुरवणी परीक्षेचा ५० टक्के निकाल
बारावीचा पुरवणी परीक्षेचा जिल्ह्याचा ५० टक्के निकाल लागला असून, या परीक्षेसाठी ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली़ ४७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ त्यामध्ये २ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ३६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १६६ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत़ या परीक्षेचा विज्ञान शाखेचा ६६.१३ टक्के, कला शाखेचा ४३.०५ टक्के, वाणिज्य शाखेचा ५४.२९ टक्के तर किमान कौशल्यावर आधारित शाखेचा ४५.८३ टक्के निकाल लागला आहे. 
जिंतूर तालुका जिल्ह्यात प्रथम
जिंतूर तालुक्याचा बारावीचा ९३.५४ टक्के निकाल लागला असून, हा तालुका जिल्ह्यात पहिला आला आहे. त्या खालोखाल सेलू तालुका दुसºया क्रमांकावर असून, या तालुक्याचा ९२.८८ टक्के निकाल लागला आहे़ तिसºया क्रमांकावर परभणी तालुका असून, या तालुक्याचा ९२.०४ टक्के निकाल लागला आहे़ याशिवाय पूर्णा तालुक्याचा ८९.८३ टक्के, मानवत तालुक्याचा ८८.५७ टक्के, सोनपेठ तालुक्याचा ८९.३५ टक्के, गंगाखेड तालुक्यात ८७.६२ टक्के, पालम तालुक्याचा ८७.२२ टक्के तर पाथरी तालुक्याचा ८१.५८ टक्के निकाल लागला आहे.
मुलींनीच मारली निकालात बाजी
जिल्ह्याच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.९२ टक्के असून, मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.१५ टक्के आहे़ जिल्ह्यातील १३ हजार ६२६ मुलांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ हजार १८४ उत्तीर्ण झाले़ जिल्ह्यातील ८ हजार ४३३ मुलींनी बारावीची परीक्षा दिली़ त्यापैकी ७ हजार ८३६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
 
निकालाची टक्केवारी वाढली
परभणी जिल्ह्याच्या निकालाची यावर्षी टक्केवारी वाढली आहे़ गतवर्षी जिल्ह्याचा बारावीचा ८६.१३ टक्के निकाल लागला होता. औरंगाबाद विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये परभणी गतवर्षी सर्वात शेवटी होती. यावर्षी मात्र जिल्ह्याच्या निकालामध्ये कमालीची सुधारणा झाली असून, जिल्ह्याचा ९०.५९ टक्के निकाल लागला असून, पाच जिल्ह्यांमध्ये परभणीचा पहिला क्रमांक आला आहे.