शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
3
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
4
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
5
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
6
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
7
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
8
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
9
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
10
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
11
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
12
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
13
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
14
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
15
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
16
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
17
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
18
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
19
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
20
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : तिसऱ्या टप्प्यात नऊ गावांचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:19 IST

मागील वर्षीच्या खरीप हंगामात बोंडअळीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील नऊ गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांना बोंडअळीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच पावसाने महिनाभरापासून डोळे वटारल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): मागील वर्षीच्या खरीप हंगामात बोंडअळीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील नऊ गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांना बोंडअळीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच पावसाने महिनाभरापासून डोळे वटारल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली आहे.मानवत हा कापसाचे उत्पादन घेणारा तालुका आहे. कापूस, तूर, सोयाबीन या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मागील वर्षी कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकºयांना पुरेसे उत्पन्न मिळाले नव्हते. प्रादूर्भावग्रस्त क्षेत्रासाठी राज्य शासनाने अनुदान मंजूर केले होते. मानवत तालुक्यातील तहसील व कृषी कार्यालयाच्या वतीने २९ हजार ३९६ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त कापसाचे पंचनामे करून ३७ हजार ६२ शेतकºयांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. या अहवालावरून शासनाने ५ कोटी ३२ लाख ९१ हजार रुपयांची रक्कम तहसील कार्यालयाकडे वर्ग केली होती.त्यातून सावळी, हत्तलवाडी, बोंदरवाडी, मांडेवडगाव, टाकळी नि., गोगलगाव, शेवडी ज., पार्डी, इरळद, सावंगी, वझूर बु., पोंहडूळ, आंबेगाव, आटोळा, हमदापूर, खडकवाडी, किन्होळा बु., मानोली, कोल्हावाडी, साखरेवाडी या वीस गावांमधील शेतकºयांच्या बँक खात्यावर पहिल्या टप्प्यातील रक्कम वर्ग करण्यात आली. शासनाकडून दुसºया टप्यात जुलै महिन्यात ७ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम तहसील कार्यालयाला प्राप्त झाली होती.अद्याक्षराप्रमाणे गावांची निवड यादी तयार करून इटाळी, उक्कलगाव, करंजी, कुंभारी, केकरजवळा, कोथाळा, कोल्हा, जंगमवाडी, ताडबोरगाव, थार, देवळगाव, नरळद, नागरजवळा, पाळोदी, पिंपळा, भोसा, मंगरूळ पा.प., मंगरूळ बु., मानवत, राजूरा, वांगी या २२ गावांतील व रुढी, रत्नापूर येथील काही शेतकºयांना अशा २४ गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करून वाटप करण्यात आली. मात्र नऊ गावांतील ५ हजार ५४८ शेतकºयांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. या नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी आणखी ३ कोटी १० लाख २८ हजार रुपयांची आवश्यकता आहे. तालुका प्रशासनाबरोबरच शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.शेतकºयांना करावी: लागतेय उसणवारीदुसºया टप्यातील ७ कोटी ९९ लाख ५७ हजार रुपयांमधून उर्वरित ३३ गावांतील शेतकºयांना अनुदान वाटप होईल, असे वाटत होते. मात्र या रकमेतून तालुक्यातील केवळ २२ गावातील शेतकºयांच्या खात्यावर आणि रुढी गावातील ५७७, रत्नापूर येथील ३६३ अशा १५ हजार ३९१ शेतकºयांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली. उर्वरित लोहरा, रामेटाकळी, रामपुरी, वझूर खु., सारंगपूर, सावरगाव, सोनूळा, सोमठाणा, हटकरवाडी या नऊ गावांतील ५ हजार ५८४ शेतकºयांना अनुदानासाठी तिसºया टप्प्याची प्रतीक्षा आहे. अनुदान वेळेत मिळत नसल्याने यंदाच्या हंगामात उसणवारी करून पेरणी करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.पावसाचा खंड वाढलाएकीकडे प्रशासकीय स्तरावरून अनुदान मिळत नसल्याने चिंता वाढत असतानाच दुसरीकडे पावसाचा खंड वाढल्याने पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामात नुकसान सहन करावे लागण्याची भीती शेतकºयांमध्ये निर्माण झाली असून शेतकºयांची धाकधूक वाढली आहे.बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी तिसºया टप्प्याचे अनुदान मिळावे, यासाठी वरिष्ठ कार्यालयात पत्र व्यवहार सुरू आहे.डी.डी. फुफाटे, तहसीलदार, मानवत

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूस