शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : तिसऱ्या टप्प्यात नऊ गावांचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:19 IST

मागील वर्षीच्या खरीप हंगामात बोंडअळीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील नऊ गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांना बोंडअळीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच पावसाने महिनाभरापासून डोळे वटारल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): मागील वर्षीच्या खरीप हंगामात बोंडअळीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील नऊ गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांना बोंडअळीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच पावसाने महिनाभरापासून डोळे वटारल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली आहे.मानवत हा कापसाचे उत्पादन घेणारा तालुका आहे. कापूस, तूर, सोयाबीन या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मागील वर्षी कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकºयांना पुरेसे उत्पन्न मिळाले नव्हते. प्रादूर्भावग्रस्त क्षेत्रासाठी राज्य शासनाने अनुदान मंजूर केले होते. मानवत तालुक्यातील तहसील व कृषी कार्यालयाच्या वतीने २९ हजार ३९६ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त कापसाचे पंचनामे करून ३७ हजार ६२ शेतकºयांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. या अहवालावरून शासनाने ५ कोटी ३२ लाख ९१ हजार रुपयांची रक्कम तहसील कार्यालयाकडे वर्ग केली होती.त्यातून सावळी, हत्तलवाडी, बोंदरवाडी, मांडेवडगाव, टाकळी नि., गोगलगाव, शेवडी ज., पार्डी, इरळद, सावंगी, वझूर बु., पोंहडूळ, आंबेगाव, आटोळा, हमदापूर, खडकवाडी, किन्होळा बु., मानोली, कोल्हावाडी, साखरेवाडी या वीस गावांमधील शेतकºयांच्या बँक खात्यावर पहिल्या टप्प्यातील रक्कम वर्ग करण्यात आली. शासनाकडून दुसºया टप्यात जुलै महिन्यात ७ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम तहसील कार्यालयाला प्राप्त झाली होती.अद्याक्षराप्रमाणे गावांची निवड यादी तयार करून इटाळी, उक्कलगाव, करंजी, कुंभारी, केकरजवळा, कोथाळा, कोल्हा, जंगमवाडी, ताडबोरगाव, थार, देवळगाव, नरळद, नागरजवळा, पाळोदी, पिंपळा, भोसा, मंगरूळ पा.प., मंगरूळ बु., मानवत, राजूरा, वांगी या २२ गावांतील व रुढी, रत्नापूर येथील काही शेतकºयांना अशा २४ गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करून वाटप करण्यात आली. मात्र नऊ गावांतील ५ हजार ५४८ शेतकºयांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. या नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी आणखी ३ कोटी १० लाख २८ हजार रुपयांची आवश्यकता आहे. तालुका प्रशासनाबरोबरच शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.शेतकºयांना करावी: लागतेय उसणवारीदुसºया टप्यातील ७ कोटी ९९ लाख ५७ हजार रुपयांमधून उर्वरित ३३ गावांतील शेतकºयांना अनुदान वाटप होईल, असे वाटत होते. मात्र या रकमेतून तालुक्यातील केवळ २२ गावातील शेतकºयांच्या खात्यावर आणि रुढी गावातील ५७७, रत्नापूर येथील ३६३ अशा १५ हजार ३९१ शेतकºयांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली. उर्वरित लोहरा, रामेटाकळी, रामपुरी, वझूर खु., सारंगपूर, सावरगाव, सोनूळा, सोमठाणा, हटकरवाडी या नऊ गावांतील ५ हजार ५८४ शेतकºयांना अनुदानासाठी तिसºया टप्प्याची प्रतीक्षा आहे. अनुदान वेळेत मिळत नसल्याने यंदाच्या हंगामात उसणवारी करून पेरणी करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.पावसाचा खंड वाढलाएकीकडे प्रशासकीय स्तरावरून अनुदान मिळत नसल्याने चिंता वाढत असतानाच दुसरीकडे पावसाचा खंड वाढल्याने पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामात नुकसान सहन करावे लागण्याची भीती शेतकºयांमध्ये निर्माण झाली असून शेतकºयांची धाकधूक वाढली आहे.बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी तिसºया टप्प्याचे अनुदान मिळावे, यासाठी वरिष्ठ कार्यालयात पत्र व्यवहार सुरू आहे.डी.डी. फुफाटे, तहसीलदार, मानवत

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूस