शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

परभणी : तिसऱ्या टप्प्यात नऊ गावांचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:19 IST

मागील वर्षीच्या खरीप हंगामात बोंडअळीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील नऊ गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांना बोंडअळीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच पावसाने महिनाभरापासून डोळे वटारल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): मागील वर्षीच्या खरीप हंगामात बोंडअळीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील नऊ गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांना बोंडअळीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच पावसाने महिनाभरापासून डोळे वटारल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली आहे.मानवत हा कापसाचे उत्पादन घेणारा तालुका आहे. कापूस, तूर, सोयाबीन या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मागील वर्षी कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकºयांना पुरेसे उत्पन्न मिळाले नव्हते. प्रादूर्भावग्रस्त क्षेत्रासाठी राज्य शासनाने अनुदान मंजूर केले होते. मानवत तालुक्यातील तहसील व कृषी कार्यालयाच्या वतीने २९ हजार ३९६ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त कापसाचे पंचनामे करून ३७ हजार ६२ शेतकºयांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. या अहवालावरून शासनाने ५ कोटी ३२ लाख ९१ हजार रुपयांची रक्कम तहसील कार्यालयाकडे वर्ग केली होती.त्यातून सावळी, हत्तलवाडी, बोंदरवाडी, मांडेवडगाव, टाकळी नि., गोगलगाव, शेवडी ज., पार्डी, इरळद, सावंगी, वझूर बु., पोंहडूळ, आंबेगाव, आटोळा, हमदापूर, खडकवाडी, किन्होळा बु., मानोली, कोल्हावाडी, साखरेवाडी या वीस गावांमधील शेतकºयांच्या बँक खात्यावर पहिल्या टप्प्यातील रक्कम वर्ग करण्यात आली. शासनाकडून दुसºया टप्यात जुलै महिन्यात ७ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम तहसील कार्यालयाला प्राप्त झाली होती.अद्याक्षराप्रमाणे गावांची निवड यादी तयार करून इटाळी, उक्कलगाव, करंजी, कुंभारी, केकरजवळा, कोथाळा, कोल्हा, जंगमवाडी, ताडबोरगाव, थार, देवळगाव, नरळद, नागरजवळा, पाळोदी, पिंपळा, भोसा, मंगरूळ पा.प., मंगरूळ बु., मानवत, राजूरा, वांगी या २२ गावांतील व रुढी, रत्नापूर येथील काही शेतकºयांना अशा २४ गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करून वाटप करण्यात आली. मात्र नऊ गावांतील ५ हजार ५४८ शेतकºयांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. या नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी आणखी ३ कोटी १० लाख २८ हजार रुपयांची आवश्यकता आहे. तालुका प्रशासनाबरोबरच शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.शेतकºयांना करावी: लागतेय उसणवारीदुसºया टप्यातील ७ कोटी ९९ लाख ५७ हजार रुपयांमधून उर्वरित ३३ गावांतील शेतकºयांना अनुदान वाटप होईल, असे वाटत होते. मात्र या रकमेतून तालुक्यातील केवळ २२ गावातील शेतकºयांच्या खात्यावर आणि रुढी गावातील ५७७, रत्नापूर येथील ३६३ अशा १५ हजार ३९१ शेतकºयांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली. उर्वरित लोहरा, रामेटाकळी, रामपुरी, वझूर खु., सारंगपूर, सावरगाव, सोनूळा, सोमठाणा, हटकरवाडी या नऊ गावांतील ५ हजार ५८४ शेतकºयांना अनुदानासाठी तिसºया टप्प्याची प्रतीक्षा आहे. अनुदान वेळेत मिळत नसल्याने यंदाच्या हंगामात उसणवारी करून पेरणी करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.पावसाचा खंड वाढलाएकीकडे प्रशासकीय स्तरावरून अनुदान मिळत नसल्याने चिंता वाढत असतानाच दुसरीकडे पावसाचा खंड वाढल्याने पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामात नुकसान सहन करावे लागण्याची भीती शेतकºयांमध्ये निर्माण झाली असून शेतकºयांची धाकधूक वाढली आहे.बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी तिसºया टप्प्याचे अनुदान मिळावे, यासाठी वरिष्ठ कार्यालयात पत्र व्यवहार सुरू आहे.डी.डी. फुफाटे, तहसीलदार, मानवत

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूस