शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

परभणी: चाळीस दिवसांपासून पारा चढलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:01 IST

जिल्ह्यात १२ दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून ४० अंशापेक्षा अधिक तापमान राहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईतही भर पडल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात १२ दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून ४० अंशापेक्षा अधिक तापमान राहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईतही भर पडल्याचे दिसत आहे.यावर्षी मार्च महिन्यापासूनच उन्हाचा पारा वाढला आहे. २५ मार्च रोजी यावर्षातील तापमान ४० अंशापर्यंत नोंद झाले. त्यानंतर ५ एप्रिलचा अपवाद वगळता सलग १२ दिवस पारा ४० अंशापेक्षा अधिक राहिल्याने नागरिकांना कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. वाढत्या तापमानामुळे वातावरणात उकाडाही वाढत असून नागरिक त्रस्त आहेत. दिवसभर शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे. तापमान वाढीचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. तसेच वाढत्या तापमानामुळे प्रकल्पांमधील पाणीसाठ्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याने टंचाईची तीव्रता वाढत चालली आहे.तापमानवाढीची शक्यता४वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने १० एप्रिलपर्यंतचा तापमानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यात हे तापमान ४३ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तविली आहे. ७ एप्रिल रोजी ४२ अंश आणि ८ ते १० एप्रिलपर्यंत ४३ अंश तापमान राहील, असा अंदाज आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTemperatureतापमानweatherहवामान