शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जलयुक्त शिवार अंतर्गत ७ कोटींचा निधी मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:07 IST

राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे करण्यासाठी जिल्ह्याला ६ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून १२४ गावांमध्ये कामे करण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे करण्यासाठी जिल्ह्याला ६ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून १२४ गावांमध्ये कामे करण्यात येणार आहेत.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध विकासकामे करण्यासाठी २०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील १२४ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांसाठी या वर्षात शासनाने १४ कोटी १५ लाख ४४ हजार रुपयांचा निधी दिला होता. यामध्ये भूजल सर्व्हेक्षण विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना गाळमुक्त योजनेसाठी तसेच रोहयो उपजिल्हाधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाचा समावेश होता. या कार्यालयांना दिलेल्या निधीपैकी ५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. तर तब्बल ९ कोटी १४ लाख ४८ हजार रुपये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास खर्च करण्यास अपयश आले होते. त्यामुळे हा निधी शासनाकडे ३१ मार्च रोजी समर्पित करण्यात आला होता. आता शासनाने याच अभियानांतर्गत गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार या शिर्षकांतर्गत ६ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वी १२ एप्रिल रोजी या कार्यालयास ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. विशेष म्हणजे यापूर्वी या शिर्षकांतर्गत १ कोटी ७२ लाख ८९ हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता. तो निधी पूर्णपणे महसूल यंत्रणेने खर्च केला. आता पुन्हा ६ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मिळाल्याने जिल्ह्यातील विविध तलाव व धरणांमधील गाळ या योजनेंतर्गत काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विविध सेवाभावी संस्थांना यासाठी सहभागी करुन घेतल्यास गाळ काढण्याची मोहीम यशस्वी होण्यास मदत होणार आहे.औरंगाबाद जिल्ह्याला सर्वाधिक निधी४धरण व तलावातील गाळ काढण्याच्या मोहितेअंतर्गत राज्य शासनाने मराठवाड्यातील १ हजार ५६९ गावांसाठी ८७ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे १७ कोटी २ लाख रुपयांचा निधी औरंगाबाद जिल्ह्यासाठी मंजूर केला.४बीड जिल्ह्यासाठी १६ कोटी १३ लाख, नांदेड जिल्ह्यासाठी १५ कोटी ३५ लाख, जालना जिल्ह्यासाठी ११ कोटी ५३ लाख, लातूर जिल्ह्यासाठी १० कोटी ८ लाख, हिंगोली जिल्ह्यासाठी ६ कोटी ४४ लाख आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ४ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प