शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
4
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
5
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
6
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
7
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
8
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
9
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
10
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
11
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
12
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
13
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
14
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
15
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
16
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
17
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
18
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
19
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
20
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार

परभणी : कडब्यासह टेम्पो जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:53 IST

कडब्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला वीज तारांचा स्पर्श झाल्याने कडब्यासह टेम्पो जळून खाक झाल्याची घटना ९ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील आरखेड शिवारात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : कडब्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला वीज तारांचा स्पर्श झाल्याने कडब्यासह टेम्पो जळून खाक झाल्याची घटना ९ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील आरखेड शिवारात घडली.आरखेड शिवारात चाºयाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारात चाºयाला मागणी वाढली आहे. आरखेड शिवारात काही शेतकऱ्यांनी चाºयाचे उत्पादन घेतले असून या ठिकाणाहून चारा विक्री होत आहे. गुरुवारी हिप्परगा येथील काही शेतकरी आरखेड येथे आले. त्यांनी या ठिकाणी चारा विकत घेऊन तो टेम्पोमध्ये भरला. हा टेम्पो परतीच्या प्रवासाला जात असताना शिरपूर रस्त्यावर विजेच्या तारा खाली लोंबकाळात होत्या. या ताराखालून टेम्पो पुढे नेत असताना वीज तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन आगीचा भडका उडाला. त्यात टेम्पोतील कडब्याने पेट घेतला. कडबा पेटल्याची बाब काही वाहनधारकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी टेम्पोचालकाला माहिती दिली. टेम्पोचालकाने हा टेम्पो थांबवून खाली उडी घेतली. टेम्पोतील इतर शेतकºयांनाही खाली उतरविले. बघता बघता आगीचे लोट वाढत गेले. जवळपास पाण्याची व्यवस्था नसल्याने आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे आग विझवणे शक्य झाले नाही. त्यामुळे शेतकºयांसमोर हा टेम्पो आणि त्यातील कडबा जळून खाक झाला. आगीमध्ये टेम्पो पूर्णत: जळाल्याने त्याचा क्रमांक उपलब्ध झाला नाही. शेतकºयांनाही या संदर्भात माहिती नव्हती. दरम्यान, टेम्पोचा जागेवरच कोळसा झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.झरी येथे आखाड्याला आग : शेती औजारे जळाली, चार जनावरे भाजली, हजारोंचे नुकसानपरभणी तालुक्यातील झरी येथील शेतातील आखाड्याला आग लागल्याने चार जनावरे भाजली असून शेती औजारे जळून खाक झाली. ६ मे रोजी ही घटना घडली. झरी शिवारातील गट नं.६९० मध्ये धोंडीराम बाबुराव देशमुख यांचा आखाडा आहे. या आखाड्यात जनावरे बांधलेली होती. आखाड्याशेजारीच शेतीची औजारे ठेवली होती.सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या आखाड्याने अचानक पेट घेतला. परिसरामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने आग विझविताना अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान, या घटनेत गाय, म्हैस व दोन वासरे भाजली आहेत.तर सोयाबीन, हरभरा आणि तुरीचा भुसा जळून खाक झाला. कोळपे, औत, तिफन, स्पिंकलर आदी शेतीचे साहित्यही जळून खाक झाल्याची माहिती देशमुख यांनी दिली. घटनेनंतर तलाठी काळे यांनी पंचनामा केला असून परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.घटनांत वाढ४पालम तालुक्यासह इतर तालुक्यांमध्ये महिनाभरापासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वीच कडबा घेऊन जाणाºया एका टेम्पोला सेलू तालुक्यातील देवगाव फाटा परिसरात आग लागली होती. तसेच पूर्णा, मानवत, पाथरी तालुक्यात कडब्याच्या गंजीने पेट घेतल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.४उन्हाची तीव्रता वाढत असल्याने कडबा पेट घेत असून काही भागात वीज वितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.४शेतातील उभ्या उसाला आग लागल्याच्याही घटना घडल्या आहेत. एकंदर या उन्हाळ्यात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगFarmerशेतकरी