शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

परभणी : तीन विषयांना मिळेनात वर्षभरापासून शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:38 IST

जिंंतूर तालुक्यातील आसेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व हिंदी विषय शिकविण्यासाठी वर्षभरापासून शिक्षकच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (परभणी) : जिंंतूर तालुक्यातील आसेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व हिंदी विषय शिकविण्यासाठी वर्षभरापासून शिक्षकच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागाची शाळा आहे. प्राथमिक गटात पहिली ते चौथी तर माध्यमिक गटामध्ये पाचवी ते दहावी या वर्गांचा समावेश आहे. पहिली ते चौथी या वर्गात १८२ विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने आठ पदांना मंजुरी दिली आहे. आठही शिक्षक येथे कार्यरत असताना मुख्याध्यापकाचे पद मात्र रिक्त आहे. त्यामुळे शिक्षकांंना शाळेत व प्रशासकीय स्तरावर येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.माध्यमिक गटामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गाचा समावेश आहे. या वर्गांमध्ये २७९ विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने १० पदे मंजूर केली आहेत. मात्र या ठिकाणी ६ शिक्षकच कार्यरत असून ४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी उपलब्ध शिक्षकांंना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व हिंदी हे महत्त्वाचे विषय शिकविण्यासाठी वर्षभरापासून शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दोन महिन्यांवर दहावीच्या बोर्डाची परीक्षा येऊन ठेपली आहे; परंतु, या विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध नसल्याने गणित व विज्ञान विषयाचे ज्ञान आत्मसात करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. येत्या दोन महिन्यांसाठी तरी या शाळेला गणित व विज्ञान विषय शिकविण्यासाठी माध्यमिक विभागाकडून शिक्षकांची नियुक्ती केली तर विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी यांनी लक्ष देऊन या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.विद्यार्थी संख्येवर: होतोय परिणामआसेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून गणित, विज्ञान व हिंदी विषय शिक्षक मिळत नसल्याने ग्रामस्थांनी आपले पाल्य जि.प.च्या शाळेतून काढण्यास सुरुवात केली आहे.यापूर्वी पाचवी ते दहावी या वर्गात ४०० विद्यार्थी संख्या होती. मात्र शिक्षण विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे यावर्षी विद्यार्थी संख्या २७९ वर येऊन ठेपली आहे.शिक्षकांअभावी विद्यार्थी संख्या कमी होत असतानाही शिक्षण विभागाकडून रिक्त पदावर शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.या प्रकाराकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाºयांनी लक्ष देऊन शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी आसेगाव व परिसरातील पालकातून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र