शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

परभणी : बससेवेच्या मागणीसाठी विद्यार्थिनींनी रोखल्या बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:43 IST

येथे मानव विकास मिशन अंतर्गत बससेवा सुरू करावी, अशी मागणी वारंवार केल्यानंतरही त्यास दाद मिळत नसल्याने २० आॅगस्ट रोजी सकाळी ७ ते ८ यावेळेत संतप्त झालेल्या धर्मापुरी येथील विद्यार्थिनींनी परभणी- जिंतूर रस्त्यावरील धर्मापुरी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल १५ बस या विद्यार्थिनींनी रोखून धरल्याने एक तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथे मानव विकास मिशन अंतर्गत बससेवा सुरू करावी, अशी मागणी वारंवार केल्यानंतरही त्यास दाद मिळत नसल्याने २० आॅगस्ट रोजी सकाळी ७ ते ८ यावेळेत संतप्त झालेल्या धर्मापुरी येथील विद्यार्थिनींनी परभणी- जिंतूर रस्त्यावरील धर्मापुरी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल १५ बस या विद्यार्थिनींनी रोखून धरल्याने एक तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.तालुक्यातील धमार्पुरी या गावातील सुमारे १०० विद्यार्थिनी शिक्षणासाठी दररोज परभणी येथे येतात. मागील वर्षी या गावात मानव विकासची बस दररोज येत होती. त्यामुळे विद्यार्थिनीच्या शिक्षणात कोणताही अडथळा आला नाही. मात्र चालू शैक्षणिक वर्षात मानव विकासची बससेवा बंद करण्यात आली. मानव विकास अंतर्गत बससेवा तत्काळ सुरू करावी व विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी गावकऱ्यांनी एस. टी. महामंडळ आणि जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी केली. मात्र गावात कोणतीही बस थांबत नसल्याने विद्यार्थिनी संतप्त झाल्या. २० आॅगस्ट रोजी सकाळी ७ ते ८ यावेळेत धमार्पुरी फाट्यावर मुख्य मार्गावरील बस रोखून धरल्या.एक तासाच्या आंदोलनात १५ बसेस रोखरुन धरण्यात आल्या. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनाची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकºयांची समजूत काढली. जिल्हाधिकारी व एस.टी. महामंडळ प्राशासनाला आज आणखी एकदा निवेदन देऊ, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे पोलीस कर्मचाºयांनी सांगितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी चेअरमन नितीन कदम, मावळा संघटनेचे गोविंद कदम, तानाजी कदम, रमेश कदम यांच्यासह विद्यार्थिनी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थिनींचे होत आहे शैक्षणिक नुकसान४धर्मापुरी येथून परभणी येथे शिक्षणासाठी येणाºया विद्यार्थिनींना सकाळी ७.१५ वाजता गावातून निघावे लागते. त्यानंतर बसची वाट पहात ताटकळत थांबावे लागते.४त्यामुळे पहिल्या २ तासिका बुडतात. दररोज हा प्रकार होत असल्याने विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे.४केवळ बससेवा नसल्याने विद्यार्थिनींच्या तासिका बुडत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीagitationआंदोलन