शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

परभणी : भुयारी पुलात साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:12 IST

परभणी-मानवतरोड रेल्वे मार्गावर कोल्हावाडी गाव असून या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे विभागाने भुयारी पूल उभारला आहे; परंतु, पहिल्याच पावसाने या पुलात पाणी साचल्याने गावाला जाणारा रस्ता बंद पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): परभणी-मानवतरोड रेल्वे मार्गावर कोल्हावाडी गाव असून या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे विभागाने भुयारी पूल उभारला आहे; परंतु, पहिल्याच पावसाने या पुलात पाणी साचल्याने गावाला जाणारा रस्ता बंद पडला आहे.तालुक्यातील कोल्हावाडी गावाला जोडणारा हा एकमेव राज्य रस्ता आहे. या रस्त्यावर परभणी-मानवतरोडला जाणारी रेल्वे लाईन आहे. रेल्वे प्रशासनाने कोल्हावाडी गावाला जोडणाºया रस्त्यावर भुयारी मार्ग तयार केला आहे.भुयारी मार्ग बनविला खरा. मात्र पुलात साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी अद्याप कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या पुलात ४ फूट पाणी साचून रस्ता बंद पडला आहे. त्याचबरोबर पुलाच्या बाजूने खोदकाम केले मात्र, सिमेंट कॉन्क्रीट केले नसल्याने चिखल साचला आहे.रेल्वे रुळावरून उचलून न्यावी लागली वाहने४मान्सनपूर्व पहिल्याच पावसात रेल्वे विभागाने उभारलेल्या भुयारी पुलामध्ये गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे कोल्हावाडीकडे जाणारा रस्ता बंद पडला. परिणामी दुचाकीस्वारांना रस्ता ओलांडावा कसा? असा प्रश्न पडला.४अनेकांनी दुचाकी वाहने रेल्वे रुळावरून उचलून नेत धोकादायक मार्ग पत्कारला. तेव्हा भुयारी पुलातील पाणी इतरत्र काढून देऊन ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी कोल्हावाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.४दरम्यान, कोल्हावाडी ग्रामस्थांची सुविधा व्हावी यासाठी रेल्वे विभागाने उभारलेला भुयारी पूल सोयीचा ठरण्याऐवजी गैरसोयीचाच जास्त ठरत असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेRainपाऊस