शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

परभणी : भुयारी पुलात साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:12 IST

परभणी-मानवतरोड रेल्वे मार्गावर कोल्हावाडी गाव असून या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे विभागाने भुयारी पूल उभारला आहे; परंतु, पहिल्याच पावसाने या पुलात पाणी साचल्याने गावाला जाणारा रस्ता बंद पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): परभणी-मानवतरोड रेल्वे मार्गावर कोल्हावाडी गाव असून या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे विभागाने भुयारी पूल उभारला आहे; परंतु, पहिल्याच पावसाने या पुलात पाणी साचल्याने गावाला जाणारा रस्ता बंद पडला आहे.तालुक्यातील कोल्हावाडी गावाला जोडणारा हा एकमेव राज्य रस्ता आहे. या रस्त्यावर परभणी-मानवतरोडला जाणारी रेल्वे लाईन आहे. रेल्वे प्रशासनाने कोल्हावाडी गावाला जोडणाºया रस्त्यावर भुयारी मार्ग तयार केला आहे.भुयारी मार्ग बनविला खरा. मात्र पुलात साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी अद्याप कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या पुलात ४ फूट पाणी साचून रस्ता बंद पडला आहे. त्याचबरोबर पुलाच्या बाजूने खोदकाम केले मात्र, सिमेंट कॉन्क्रीट केले नसल्याने चिखल साचला आहे.रेल्वे रुळावरून उचलून न्यावी लागली वाहने४मान्सनपूर्व पहिल्याच पावसात रेल्वे विभागाने उभारलेल्या भुयारी पुलामध्ये गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे कोल्हावाडीकडे जाणारा रस्ता बंद पडला. परिणामी दुचाकीस्वारांना रस्ता ओलांडावा कसा? असा प्रश्न पडला.४अनेकांनी दुचाकी वाहने रेल्वे रुळावरून उचलून नेत धोकादायक मार्ग पत्कारला. तेव्हा भुयारी पुलातील पाणी इतरत्र काढून देऊन ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी कोल्हावाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.४दरम्यान, कोल्हावाडी ग्रामस्थांची सुविधा व्हावी यासाठी रेल्वे विभागाने उभारलेला भुयारी पूल सोयीचा ठरण्याऐवजी गैरसोयीचाच जास्त ठरत असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेRainपाऊस