शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

परभणी : दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:05 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असून, या संदर्भात २५ जानेवारी रोजी अध्यादेश काढून आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असून, या संदर्भात २५ जानेवारी रोजी अध्यादेश काढून आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत़परभणी जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ जिल्ह्यातील ८४९ गावांपैकी सुमारे ७७२ गावे दुष्काळग्रस्त म्हणून राज्य शासनाने जाहीर केली आहेत़ या गावांमध्ये चारा आणि पाणीटंचाई निर्माण झाली असून, दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत़ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विहीर अधिग्रहण या कामांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ मात्र प्रत्यक्षात चारा छावण्या जिल्ह्यात सुरू झालेल्या नाहीत़ राज्य शासनाचे आदेश नसल्याने चारा छावण्यासंदर्भात प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या जात नव्हत्या़दरम्यान, २५ जानेवारी रोजी महसूल व वन विभागाने अध्यादेश काढून चारा छावण्या सुरू करण्याबाबत सुचित केले आहे़ दुष्काळी भागातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करण्यासाठी आवश्यकतेनुसार चारा छावण्या उघडण्यास मंजुरी दिली आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या आणि लहान पशूधन संख्येनुसार आणि चाºयाच्या उपलब्धतेनुसार आढावा घेऊन मंडळस्तरावर छावण्या सुरू कराव्यात, या छावण्यांमध्ये किमान ३०० ते ५०० जनावरे दाखल करून घ्यावीत़प्रत्येक जनावरांच्या मालकास त्याच्याकडे असलेल्या एकूण जनावरांपैकी केवळ ५ जनावरे छावणीमध्ये दाखल करता येतील़ त्याच प्रमाणे सहकारी साखर कारखाने, सहकारी खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, दुध खरेदीविक्री संघ या संस्थांमार्फतही चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेऊ शकतात, असे या आदेशात म्हटले आहे़ छावणीत दाखल असलेल्या प्रती मोठ्या जनावरास प्रति दिन ७० रुपये आणि लहान जनावरास ३५ रुपये या प्रमाणे अनुदान दिले जाणार आहे़ चारा छावणी सुरू केल्यानंतर या छावणीमध्ये जनावरांचे ऊन व आवकाळी पावसापासून संरक्षण होण्यासाठी निवारा उभारणे आवश्यक आह़े तसेच रात्रीच्या वेळी आवश्यक तो प्रकाश असावा, यासाठी अधिकृत विद्युत जोडणी, सौर यंत्रणेद्वारे पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, जनावरांसाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे आदी अटीही घालण्यात आल्या आहेत़ चारा छावणीच्या आदेशामुळे जिल्ह्यातील पशूपालकांची चिंता दूर झाली आहे़मोठी जनावरे : १५ किलो चारा लागणार४चारा छावणी सुरू केल्यानंतर या छावणीमध्ये जनावरांना चारा देण्याचे निकषही शासनाने ठरवून दिले आहेत़ त्यानुसार मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन १५ किलो हिरवा चारा, उसाचे वाढे, ऊस आदी चारा द्यावा तर लहान जनावरांसाठी साडेसात किलो चारा देण्याचे निश्चित केले आहे़ तसेच आठवड्यातून तीन दिवस मोठ्या जनावरांना एक किलो तर लहान जनावरांना अर्धा किलो पशूखाद्य देता येईल़ तसेच सहा किलो वाळलेला चारा मोठ्या जनावरांसाठी आणि लहान जनावरांसाठी तीन किलो, मोठ्या जनावरांसाठी मूर घास आणि लहान जनावरांसाठी ४ किलो मूर घास देण्याची तरतूद या आदेशात करण्यात आली आहे़६ लाख मे़ टन चाराजल्हा प्रशासनाने मागील महिन्यात घेतलेल्या आढाव्यानुसार परभणी जिल्ह्यात ५ लाख ९० हजार ८०० मे़ टन चारा उपलब्ध होवू शकतो़ हा चारा २० जून पर्यंत पुरेल, असा अंदाज आहे़एकमेव छावणी सुरूजिल्ह्यात राणीसावरगाव येथे शासनस्तरावरून चारा छावणीला मंजुरी मिळाली असून, जिल्ह्यामध्ये एकमेव चारा छावणी सध्या सुरू आहे़ शासनाने शुक्रवारी काढलेल्या अध्यादेशामुळे येत्या काळात किती छावण्या सुरू होतात? याकडे लक्ष लागले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळState Governmentराज्य सरकार