शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:05 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असून, या संदर्भात २५ जानेवारी रोजी अध्यादेश काढून आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असून, या संदर्भात २५ जानेवारी रोजी अध्यादेश काढून आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत़परभणी जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ जिल्ह्यातील ८४९ गावांपैकी सुमारे ७७२ गावे दुष्काळग्रस्त म्हणून राज्य शासनाने जाहीर केली आहेत़ या गावांमध्ये चारा आणि पाणीटंचाई निर्माण झाली असून, दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत़ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विहीर अधिग्रहण या कामांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ मात्र प्रत्यक्षात चारा छावण्या जिल्ह्यात सुरू झालेल्या नाहीत़ राज्य शासनाचे आदेश नसल्याने चारा छावण्यासंदर्भात प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या जात नव्हत्या़दरम्यान, २५ जानेवारी रोजी महसूल व वन विभागाने अध्यादेश काढून चारा छावण्या सुरू करण्याबाबत सुचित केले आहे़ दुष्काळी भागातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करण्यासाठी आवश्यकतेनुसार चारा छावण्या उघडण्यास मंजुरी दिली आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या आणि लहान पशूधन संख्येनुसार आणि चाºयाच्या उपलब्धतेनुसार आढावा घेऊन मंडळस्तरावर छावण्या सुरू कराव्यात, या छावण्यांमध्ये किमान ३०० ते ५०० जनावरे दाखल करून घ्यावीत़प्रत्येक जनावरांच्या मालकास त्याच्याकडे असलेल्या एकूण जनावरांपैकी केवळ ५ जनावरे छावणीमध्ये दाखल करता येतील़ त्याच प्रमाणे सहकारी साखर कारखाने, सहकारी खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, दुध खरेदीविक्री संघ या संस्थांमार्फतही चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेऊ शकतात, असे या आदेशात म्हटले आहे़ छावणीत दाखल असलेल्या प्रती मोठ्या जनावरास प्रति दिन ७० रुपये आणि लहान जनावरास ३५ रुपये या प्रमाणे अनुदान दिले जाणार आहे़ चारा छावणी सुरू केल्यानंतर या छावणीमध्ये जनावरांचे ऊन व आवकाळी पावसापासून संरक्षण होण्यासाठी निवारा उभारणे आवश्यक आह़े तसेच रात्रीच्या वेळी आवश्यक तो प्रकाश असावा, यासाठी अधिकृत विद्युत जोडणी, सौर यंत्रणेद्वारे पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, जनावरांसाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे आदी अटीही घालण्यात आल्या आहेत़ चारा छावणीच्या आदेशामुळे जिल्ह्यातील पशूपालकांची चिंता दूर झाली आहे़मोठी जनावरे : १५ किलो चारा लागणार४चारा छावणी सुरू केल्यानंतर या छावणीमध्ये जनावरांना चारा देण्याचे निकषही शासनाने ठरवून दिले आहेत़ त्यानुसार मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन १५ किलो हिरवा चारा, उसाचे वाढे, ऊस आदी चारा द्यावा तर लहान जनावरांसाठी साडेसात किलो चारा देण्याचे निश्चित केले आहे़ तसेच आठवड्यातून तीन दिवस मोठ्या जनावरांना एक किलो तर लहान जनावरांना अर्धा किलो पशूखाद्य देता येईल़ तसेच सहा किलो वाळलेला चारा मोठ्या जनावरांसाठी आणि लहान जनावरांसाठी तीन किलो, मोठ्या जनावरांसाठी मूर घास आणि लहान जनावरांसाठी ४ किलो मूर घास देण्याची तरतूद या आदेशात करण्यात आली आहे़६ लाख मे़ टन चाराजल्हा प्रशासनाने मागील महिन्यात घेतलेल्या आढाव्यानुसार परभणी जिल्ह्यात ५ लाख ९० हजार ८०० मे़ टन चारा उपलब्ध होवू शकतो़ हा चारा २० जून पर्यंत पुरेल, असा अंदाज आहे़एकमेव छावणी सुरूजिल्ह्यात राणीसावरगाव येथे शासनस्तरावरून चारा छावणीला मंजुरी मिळाली असून, जिल्ह्यामध्ये एकमेव चारा छावणी सध्या सुरू आहे़ शासनाने शुक्रवारी काढलेल्या अध्यादेशामुळे येत्या काळात किती छावण्या सुरू होतात? याकडे लक्ष लागले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळState Governmentराज्य सरकार