शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

परभणी : अधिकारी नसल्याने स्थायी समितीची बैठक तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:06 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक ५ आॅक्टोबर रोजी असल्याची पूर्व सूचना असतानाही अनेक विभागप्रमुखांनीच बैठकीकडे पाठ फिरविल्याने ही बैठक तहकूब करण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली़ यामुळे उपस्थित सदस्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक ५ आॅक्टोबर रोजी असल्याची पूर्व सूचना असतानाही अनेक विभागप्रमुखांनीच बैठकीकडे पाठ फिरविल्याने ही बैठक तहकूब करण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली़ यामुळे उपस्थित सदस्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला़जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक ५ आॅक्टोबर रोजी होणार असल्याची नोटीस आठ दिवसांपूर्वी जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या मंजुरीने सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने काढण्यात आली होती़ या संदर्भातील माहिती समितीच्या सर्व सदस्यांसह सर्व सभापती आणि विभागप्रमुखांना देण्यात आली होती़ त्यानुसार दुपारी २ च्या सुमारास जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठकीसाठी अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते व समितीचे सदस्य आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, शिक्षणाधिकारी आशा गरुड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बाळासाहेब शिंदे व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेख हे अधिकारी उपस्थित झाले़ जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज हे विभागीय आयुक्त कार्यालयातील महत्त्वाच्या बैठकीसाठी औरंगाबादला गेले असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत़शिवाय इतर अनेक विभागप्रमुख उपस्थित झाले नाहीत़ त्यामुळे अधिकारी येतील, असे समजून बैठकीस सुरुवात करण्यात आली़ त्यानंतर मागील बैठकीतील इतिवृत्तांत वाचण्यास सुरुवात करण्यात आली; परंतु, उर्वरित विभागप्रमुख येत नसल्याने उपस्थित सदस्य विष्णू मांडे यांच्यासह अन्य काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़ अधिकारी उपस्थित राहत नसतील तर माहिती कोणाला विचारायची? जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे़ यासाठी उपाययोजना करण्याची गरज असताना माहिती देऊनही अधिकारी दांडी मारत असतील तर बैठकच कशाला घ्यायची? असा सूर उमटला़ त्यानंतर चर्चेअंती शुक्रवारची बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला़ आता पुढील बैठकीची तारीख जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड या ठरविणार आहेत़दरम्यान, आतापर्यंत पदाधिकारी किंवा सदस्य अनुस्थित राहिल्यास बैठक तहकूब करावी लागत होती़ आता चक्क अधिकारीच गैरहजर राहिल्याने बैठक तहकूब करण्याची वेळ जिल्हा परिषद पदाधिकाºयांवर आली आहे़ त्यामुळे पदाधिकाºयांचा अधिकाºयांवर धाक राहिला नाही की काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ या संदर्भात पदाधिकाºयांवर चिंतन करण्याची वेळ आली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीzpजिल्हा परिषद