शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अधिकारी नसल्याने स्थायी समितीची बैठक तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:06 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक ५ आॅक्टोबर रोजी असल्याची पूर्व सूचना असतानाही अनेक विभागप्रमुखांनीच बैठकीकडे पाठ फिरविल्याने ही बैठक तहकूब करण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली़ यामुळे उपस्थित सदस्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक ५ आॅक्टोबर रोजी असल्याची पूर्व सूचना असतानाही अनेक विभागप्रमुखांनीच बैठकीकडे पाठ फिरविल्याने ही बैठक तहकूब करण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली़ यामुळे उपस्थित सदस्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला़जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक ५ आॅक्टोबर रोजी होणार असल्याची नोटीस आठ दिवसांपूर्वी जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या मंजुरीने सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने काढण्यात आली होती़ या संदर्भातील माहिती समितीच्या सर्व सदस्यांसह सर्व सभापती आणि विभागप्रमुखांना देण्यात आली होती़ त्यानुसार दुपारी २ च्या सुमारास जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठकीसाठी अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते व समितीचे सदस्य आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, शिक्षणाधिकारी आशा गरुड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बाळासाहेब शिंदे व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेख हे अधिकारी उपस्थित झाले़ जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज हे विभागीय आयुक्त कार्यालयातील महत्त्वाच्या बैठकीसाठी औरंगाबादला गेले असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत़शिवाय इतर अनेक विभागप्रमुख उपस्थित झाले नाहीत़ त्यामुळे अधिकारी येतील, असे समजून बैठकीस सुरुवात करण्यात आली़ त्यानंतर मागील बैठकीतील इतिवृत्तांत वाचण्यास सुरुवात करण्यात आली; परंतु, उर्वरित विभागप्रमुख येत नसल्याने उपस्थित सदस्य विष्णू मांडे यांच्यासह अन्य काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़ अधिकारी उपस्थित राहत नसतील तर माहिती कोणाला विचारायची? जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे़ यासाठी उपाययोजना करण्याची गरज असताना माहिती देऊनही अधिकारी दांडी मारत असतील तर बैठकच कशाला घ्यायची? असा सूर उमटला़ त्यानंतर चर्चेअंती शुक्रवारची बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला़ आता पुढील बैठकीची तारीख जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड या ठरविणार आहेत़दरम्यान, आतापर्यंत पदाधिकारी किंवा सदस्य अनुस्थित राहिल्यास बैठक तहकूब करावी लागत होती़ आता चक्क अधिकारीच गैरहजर राहिल्याने बैठक तहकूब करण्याची वेळ जिल्हा परिषद पदाधिकाºयांवर आली आहे़ त्यामुळे पदाधिकाºयांचा अधिकाºयांवर धाक राहिला नाही की काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ या संदर्भात पदाधिकाºयांवर चिंतन करण्याची वेळ आली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीzpजिल्हा परिषद