शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

परभणी : अधिकारी नसल्याने स्थायी समितीची बैठक तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:06 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक ५ आॅक्टोबर रोजी असल्याची पूर्व सूचना असतानाही अनेक विभागप्रमुखांनीच बैठकीकडे पाठ फिरविल्याने ही बैठक तहकूब करण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली़ यामुळे उपस्थित सदस्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक ५ आॅक्टोबर रोजी असल्याची पूर्व सूचना असतानाही अनेक विभागप्रमुखांनीच बैठकीकडे पाठ फिरविल्याने ही बैठक तहकूब करण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली़ यामुळे उपस्थित सदस्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला़जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक ५ आॅक्टोबर रोजी होणार असल्याची नोटीस आठ दिवसांपूर्वी जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या मंजुरीने सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने काढण्यात आली होती़ या संदर्भातील माहिती समितीच्या सर्व सदस्यांसह सर्व सभापती आणि विभागप्रमुखांना देण्यात आली होती़ त्यानुसार दुपारी २ च्या सुमारास जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठकीसाठी अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते व समितीचे सदस्य आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, शिक्षणाधिकारी आशा गरुड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बाळासाहेब शिंदे व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेख हे अधिकारी उपस्थित झाले़ जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज हे विभागीय आयुक्त कार्यालयातील महत्त्वाच्या बैठकीसाठी औरंगाबादला गेले असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत़शिवाय इतर अनेक विभागप्रमुख उपस्थित झाले नाहीत़ त्यामुळे अधिकारी येतील, असे समजून बैठकीस सुरुवात करण्यात आली़ त्यानंतर मागील बैठकीतील इतिवृत्तांत वाचण्यास सुरुवात करण्यात आली; परंतु, उर्वरित विभागप्रमुख येत नसल्याने उपस्थित सदस्य विष्णू मांडे यांच्यासह अन्य काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़ अधिकारी उपस्थित राहत नसतील तर माहिती कोणाला विचारायची? जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे़ यासाठी उपाययोजना करण्याची गरज असताना माहिती देऊनही अधिकारी दांडी मारत असतील तर बैठकच कशाला घ्यायची? असा सूर उमटला़ त्यानंतर चर्चेअंती शुक्रवारची बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला़ आता पुढील बैठकीची तारीख जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड या ठरविणार आहेत़दरम्यान, आतापर्यंत पदाधिकारी किंवा सदस्य अनुस्थित राहिल्यास बैठक तहकूब करावी लागत होती़ आता चक्क अधिकारीच गैरहजर राहिल्याने बैठक तहकूब करण्याची वेळ जिल्हा परिषद पदाधिकाºयांवर आली आहे़ त्यामुळे पदाधिकाºयांचा अधिकाºयांवर धाक राहिला नाही की काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ या संदर्भात पदाधिकाºयांवर चिंतन करण्याची वेळ आली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीzpजिल्हा परिषद