शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

परभणी : रेल्वे फाटकावर एसटी बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:35 IST

शहरातील पालम रेल्वे फाटकावर रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या बेशिस्त वाहनांमुळे धारूर-नांदेड बसला अपघात झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : शहरातील पालम रेल्वे फाटकावर रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या बेशिस्त वाहनांमुळे धारूर-नांदेड बसला अपघात झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.बीड जिल्ह्यातील किल्लेधारूर आगाराची नांंदेडकडे जाणारी बस (क्रमांक एम.एच.२०-बी.एल.०१३२) दुपारी बारा वाजेच्या सुमारास गंगाखेड बसस्थानकातून पालम, लोहा व नांदेड येथे जाणारे ५८ प्र्रवासी घेऊन निघाली असता बसस्थनकाजवळ असलेला पालम नाका रेल्वेफाटक आदिलाबाद-परळी या रेल्वेची वेळ झाल्याने फाटक बंद होते. त्यामुळे बस फाटक परिसरात थांबली होती. यावेळी फाटकाच्या दोन्ही बाजूने रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या वाहनांच्या रांगातून बस बाहेर काढताना मधेच येत असलेल्या दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रेल्वेफाटकाच्या बाजूला असलेल्या लोखंडी कठड्यांकडे वाहकाच्या बाजूने झुकली. वेळीच सावध चालकाने लोखंडी कठडे तोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात बस पलटी होऊ नये याची दक्षता घेत बस पुढे नेली. वाहकाच्या बाजूने बस घासत शेवटपर्यंत गेली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांची एकच धांदल उडाली. प्रसंगावधान राखत बसचालक शेख नजीर व वाहक रुख्मिणी केकान यांनी बस तेथून बाहेर काढून नांदेड रोडवरील दत्त मंदिर परिसरात रस्त्याच्या बाजूला बस थांबवून बसची पाहणी केली. यामध्ये बसचे नुकसान होऊन बस खिळखीळी झाल्याने नांदेडकडे जाणाऱ्या दुसºया बसने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रवाना केले. अचानक घडलेल्या घटनेमुळे बसमधून प्रवास करणाºया पासधारक व ५५ प्रवाशांबरोबरच स्टाफचे तीन प्रवासी तसेच चालक, वाहक यांचा जीव भांड्यात पडला.बस अपघातातून सुखरूप बाहेर पडल्याचे पाहून सर्वांच प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.दुतर्फा बेशिस्त लागलेल्या वाहनांमुळे अपघातपालम नाक्यावर असलेल्या रेल्वेफाटकावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या रस्त्यावरील वाहने वळण रस्त्याने पालम रस्त्यावर काढण्यात आली आहेत. यातच येथील रस्ता पूर्णत: खड्डेयुक्त झाल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार दिवसातून २५ ते ३० वेळा फाटक बंद होत आहे. यातच पुढे जाण्याची घाई करीत दुचाकीचालक, आॅटोचालक व छोटे वाहनधारक आपली वाहने बेशिस्तपणे रस्त्यावर दुतर्फा लावली जात असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात