शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

परभणी : रेल्वे फाटकावर एसटी बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:35 IST

शहरातील पालम रेल्वे फाटकावर रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या बेशिस्त वाहनांमुळे धारूर-नांदेड बसला अपघात झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : शहरातील पालम रेल्वे फाटकावर रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या बेशिस्त वाहनांमुळे धारूर-नांदेड बसला अपघात झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.बीड जिल्ह्यातील किल्लेधारूर आगाराची नांंदेडकडे जाणारी बस (क्रमांक एम.एच.२०-बी.एल.०१३२) दुपारी बारा वाजेच्या सुमारास गंगाखेड बसस्थानकातून पालम, लोहा व नांदेड येथे जाणारे ५८ प्र्रवासी घेऊन निघाली असता बसस्थनकाजवळ असलेला पालम नाका रेल्वेफाटक आदिलाबाद-परळी या रेल्वेची वेळ झाल्याने फाटक बंद होते. त्यामुळे बस फाटक परिसरात थांबली होती. यावेळी फाटकाच्या दोन्ही बाजूने रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या वाहनांच्या रांगातून बस बाहेर काढताना मधेच येत असलेल्या दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रेल्वेफाटकाच्या बाजूला असलेल्या लोखंडी कठड्यांकडे वाहकाच्या बाजूने झुकली. वेळीच सावध चालकाने लोखंडी कठडे तोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात बस पलटी होऊ नये याची दक्षता घेत बस पुढे नेली. वाहकाच्या बाजूने बस घासत शेवटपर्यंत गेली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांची एकच धांदल उडाली. प्रसंगावधान राखत बसचालक शेख नजीर व वाहक रुख्मिणी केकान यांनी बस तेथून बाहेर काढून नांदेड रोडवरील दत्त मंदिर परिसरात रस्त्याच्या बाजूला बस थांबवून बसची पाहणी केली. यामध्ये बसचे नुकसान होऊन बस खिळखीळी झाल्याने नांदेडकडे जाणाऱ्या दुसºया बसने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रवाना केले. अचानक घडलेल्या घटनेमुळे बसमधून प्रवास करणाºया पासधारक व ५५ प्रवाशांबरोबरच स्टाफचे तीन प्रवासी तसेच चालक, वाहक यांचा जीव भांड्यात पडला.बस अपघातातून सुखरूप बाहेर पडल्याचे पाहून सर्वांच प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.दुतर्फा बेशिस्त लागलेल्या वाहनांमुळे अपघातपालम नाक्यावर असलेल्या रेल्वेफाटकावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या रस्त्यावरील वाहने वळण रस्त्याने पालम रस्त्यावर काढण्यात आली आहेत. यातच येथील रस्ता पूर्णत: खड्डेयुक्त झाल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार दिवसातून २५ ते ३० वेळा फाटक बंद होत आहे. यातच पुढे जाण्याची घाई करीत दुचाकीचालक, आॅटोचालक व छोटे वाहनधारक आपली वाहने बेशिस्तपणे रस्त्यावर दुतर्फा लावली जात असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात