शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

परभणी : सोळागाव पाणीपुरवठा योजना पडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:40 IST

जिंतूर तालुक्यातील सोळा गावांना पाणीपुरवठा करणारी योजना देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडली आहे़ काही दिवसांपूर्वीच वीज बिलाचा भरणा करून ही योजना सुरू करण्यात आली होती़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (जि. परभणी) : जिंतूर तालुक्यातील सोळा गावांना पाणीपुरवठा करणारी योजना देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडली आहे़ काही दिवसांपूर्वीच वीज बिलाचा भरणा करून ही योजना सुरू करण्यात आली होती़जिंतूर तालुक्यातील बोरी व कौसडी या गावांना सोळा गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो़ गतवर्षी या योजनेकडे महावितरणचे विज बील थकले होते़ त्यामुळे बोरी व कौसडी गावातील पाणीपुरवठा बंद झाला होता़ यावर्षी जानेवारी महिन्यापासून बोरी व कौसडी येथे पाणीटंचाई जाणवत असल्याने ही योजना सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत होती़कौसडी येथे ग्रामस्थांनी आंदोलनही केले़ त्यानंतर प्रशासनाच्या वतीने थकीत बिलाचा भरणा करण्यात आला होता़ योजना सुरू झाल्याने ग्रामस्थांना पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, १५ दिवसांपासून ही योजना देखभाल दुरुस्तीअभावी पुन्हा बंद पडली आहे़ विशेष म्हणजे निवळी धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असूनही केवळ नियोजनाअभावी ही योजना बंद पडल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई