शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

परभणीतील स्थिती : गौण खनिज महागल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:41 IST

वाळू धक्क्यांचे लिलाव झाले नसल्याने वाळू वेळेवर उपलब्ध होत नाही. गिट्टी आणि मुरुम देखील महागल्याने जिल्ह्यात बांधकामे ठप्प पडली आहेत. परिणामी या व्यवसावर अवलंबून असलेल्या सुमारे १५ हजाराहून अधिक कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वाळू धक्क्यांचे लिलाव झाले नसल्याने वाळू वेळेवर उपलब्ध होत नाही. गिट्टी आणि मुरुम देखील महागल्याने जिल्ह्यात बांधकामे ठप्प पडली आहेत. परिणामी या व्यवसावर अवलंबून असलेल्या सुमारे १५ हजाराहून अधिक कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर होत आहे.यावर्षी वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे वाळू खुल्या बाजारपेठेत उपलब्ध नाही. वाळूचे भाव गगणाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न धूसर होत आहे. १२०० रुपये ब्रास प्रमाणे मिळणारी वाळू सध्या २४ हजार रुपये प्रति ट्रक (तीन ब्रास) या दराने विक्री होत आहे. मुरुम आणि गिट्टीचाही कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याने दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे घरबांधकामांची प्रक्रिया ठप्प पडली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात घरकुुलांचे बांधकाम करण्यासाठीही प्रशासनाला उद्दिष्ट दिले आहे. या घरकुलांसाठी गौण खनिज उपलब्ध होत नसल्याने घरकुल बांधकामेही ठप्प आहेत. चोरट्या मार्गाने वाळू खरेदी करुन बांधकामे करावी लागत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसाही खर्च होत आहे.ग्रामीण भागातील घरकुलांसाठी माफक दरात वाळू उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते; परंतु, हे आश्वासनही कागदोपत्रीच राहिले आहे. वाळूसह मुरुम आणि गिट्टीचीही अशीच परिस्थिती आहे. २०० रुपये ब्रास दराने मिळणारा मुरुम ७०० ते ८०० रुपये दराने खरेदी करावा लागत आहे. एकंदर जिल्ह्यामध्ये बांधकामे ठप्प पडल्याने या व्यवसायावर संकट कोसळले आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि त्यात हाताला काम लागत नसल्याने मजुरांचे स्थलांतर होत आहे.घरकुलांसाठीही मिळेना वाळू४घरकुलांच्या बांधकामासाठी प्रति लाभार्थ्याला लागणाऱ्या वाळूचाही प्रशासनाकडून पुरवठा होत नाही. टोकण पद्धत आणि प्रशासकीय कारवायांमध्ये वाळू उपलब्ध होणे जिकीरीचे झाले आहे. जिल्हा प्रशासनाने लाभार्थ्यांना वाळू देताना किचकट प्रक्रिया दूर करुन थेट लाभार्थ्याच्या घरकुलापर्यंत वाळू उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, सद्यस्थितीला लाभार्थ्यांनी वाळूची मागणी केली असताना अनेकांना वाळू उपलब्ध होत नाही. त्यामुळे घरकुल बांधकामाबरोबरच पंचायत समिती, तहसीलच्या चकरा मारुन लाभार्थी त्रस्त होत आहेत.लक्षवेधी सूचना मांडणार४दरम्यान, जिल्ह्यामध्ये वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक बांधकाम कामगारांना काम उपलब्ध होत नाही. त्यामुळे कामगारांचे स्थलांतरही वाढले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे बांधकाम कामगारांवर संकट ओढावले असल्याने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचा प्रश्न येत्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित करणार असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभागsandवाळू