शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास शिवसेना गय करणार नाही- खा.संजय जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:07 IST

वीज वितरण कंपनीकडून विद्युत रोहित्र, त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. वसुलीच्या नावाखाली गावांचा वीजपुरवठा परस्पर तोडला जातो. मात्र दुसरीकडे वीज चोरीकडे दुर्लक्ष करुन मध्यमवर्गीयांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाकडून निजामकाळातील अन्यायापेक्षा जास्तीचा अन्याय शेतकºयांवर केला जात असल्याचा घणाघात खा.संजय जाधव यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वीज वितरण कंपनीकडून विद्युत रोहित्र, त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. वसुलीच्या नावाखाली गावांचा वीजपुरवठा परस्पर तोडला जातो. मात्र दुसरीकडे वीज चोरीकडे दुर्लक्ष करुन मध्यमवर्गीयांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाकडून निजामकाळातील अन्यायापेक्षा जास्तीचा अन्याय शेतकºयांवर केला जात असल्याचा घणाघात खा.संजय जाधव यांनी केला.वीज कंपनीतील अधिकाºयांच्या मनमानी कारभाराविरुद्ध शिवसेनेच्या वतीने खा. संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी येथील जिंतूर रोडवरील वीज वितरण कंपनीच्या सर्कल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. खा.जाधव म्हणाले, येथील अधीक्षक अभियंत्यांकडून पैसे घेतल्याशिवाय कामे केली जात नाहीत. ग्रामस्थांना कोणत्याही सूचना न देता आठ- आठ दिवस गावठाणचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. जळालेल्या डी.पी. शेतकºयांना बदलून दिले जात नाहीत. ग्रामीण भागातील ओव्हरलोड विद्युत रोहित्राच्या बाजुला एक नवीन डीपी बसविणे आवश्यक आहे; परंतु, तसे केले जात नाही. त्याचा ताण शेतकºयांवर येत आहे. पीएम, बीएमची कामे अद्यापही सुरु नाहीत. ३३ केव्ही सबस्टेशनमधील दुरुस्तीची कामे केली जात नाहीत. वीज वितरण कंपनीचा कारभार असाच सुरु राहिला तर प्रशासनाला धारेवर धरले जाईल, असा इशारा खा.संजय जाधव यांनी यावेळी दिला. हे आंदोलन सरकारच्या विरोधात नसून प्रशासनाच्या विरोधात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शेतकरी जळालेले विद्युत रोहित्र ने-आण करतात; परंतु, त्याचा मलिदा मात्र एजन्सी व महावितरण प्रशासन संगनमताने खाते. सध्या तर जुन्या रोहित्रातील आॅईल काढून नवीन विद्युत रोहित्रात टाकण्यात येत आहे. त्यामुळे नवीन विद्युत रोहित्र जास्त काळ टिकत नाही. त्याचा फटका शेतकºयांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. विद्युत प्रशासनाने आपल्या भूमिकेत बदल करुन तात्काळ शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.आंदोलनात जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, सदाशिव देशमुख, जि.प. सदस्य विष्णू मांडे, सखूबाई लटपटे, बाळासाहेब जाधव पारवेकर, अर्जुन सामाले, अर्जुन रणेर, मारोती इक्कर, पांडुरंग खिल्लारे दीपक बारहाते, पंढरीनाथ घुले, दामोदर घुले, गणेश इक्कर, प्रा.डॉ.पंढरीनाथ धोंडगे आदींसह शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले‘विहिरीत पाणी असूनही उपयोग होईना’४सध्या शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतांना मूबलक पाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर सिद्धेश्वर, येलदरी व जायकवाडी ही प्रमुख धरणेही तुडूंब भरलेली आहेत. रबी हंगामातील पिकांसाठी पाणी पाळी देण्यात येत आहे; परंतु, वीज नसल्याने या पाण्याचाही शेतकºयांना उपयोग होत नाही. त्यामुळे महावितरण प्रशासनाने जनहिताच्या कामासाठी एक पाऊल पुढे टाकून शेतकºयांना तात्काळ विद्युत रोहित्र व लागणाºया विजेच्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी खा.जाधव यांनी यावेळी केली.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीSanjay Jadhavसंजय जाधव