शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : विद्युत व्यवस्थापकांची निवड प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:58 IST

ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तातडीने विद्युत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतवर्षी महावितरण मार्फत मानवत तालुक्यातील ४५ गावांत विद्युत व्यवस्थापक नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दीड वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर कोणत्याच गावात विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक न झाल्याने ही निवड प्रक्रिया रखडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तातडीने विद्युत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतवर्षी महावितरण मार्फत मानवत तालुक्यातील ४५ गावांत विद्युत व्यवस्थापक नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दीड वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर कोणत्याच गावात विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक न झाल्याने ही निवड प्रक्रिया रखडली आहे.ग्रामीण भागामध्ये महावितरण कंपनीमार्फत कार्यरत असलेल्या एकाच लाईनमनकडे अनेक गावे असतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी त्याला वेळेत त्या गावात जाता येत नाही. वेळोवेळी ही समस्या प्रकर्षाने पुढे आली आहे.ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणी दूर करणे, विजेमुळे होणारे अपघात रोखण्यासह वीजपुरवठा सुरळीत करून देण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या ग्रामविकास विभागाने २० आॅक्टोबर २०१६ रोजी एक आदेश काढून ३ हजार लोकसंख्येच्या आतील गावच्या ग्रामपंचायत स्तरावर महावितरण कंपनीमार्फत ग्राम विद्युत व्यवस्थापक नियुक्त करण्यात यावेत, असे सूचविले होते. या आदेशानुसार ग्रामपंचायतींनी जाहिरात काढून आयटीआयचा इलेक्ट्रीकल वायरमन ट्रेड उत्तीर्ण असलेल्या व पाच कि.मी. अंतराच्या आत राहणाºया उमेदवारांचे अर्ज मागविले होते.३४ ग्रामपंचायतींनी अर्ज मागविल्यानंतर योग्य उमेदवारांची निवड करून सर्व प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे सादर केले. पंचायत समितीने महावितरणला हे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र महावितरणमार्फत कोणतीच कार्यवाही होत नसल्याने ही प्रक्रिया रखडली आहे.ग्राम विद्युत व्यवस्थापकामार्फत विविध कामे करण्यात येणार असून विविध समस्या तत्काळ स्थानिक पातळीवर सोडविल्या जाणार असल्याने या ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या तातडीने करण्याबाबत महावितरणने पुढाकार घेणे गरजेचे आहे.दुसरीकडे या प्रक्रियेला सात ते आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या रखडल्याने अर्ज केलेल्या उमेदवारांची धाकधुक वाढली आहे.गावातच नोकरी मिळणार या आशेने अर्ज केलेला उमेदवार ग्रामपंचायत कार्यालयाकडे चकरा मारीत आहेत.११ ग्रा.पं.ला : मिळेना उमेदवारमानवत तालुक्यातील ३ हजार लोकसंख्येच्या ४५ ग्रामपंचायतींना जाहिरातीद्वारे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यापैकी ११ ग्रामपंचायतींना मात्र पाच कि.मी. अंतरा अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण उमेदवार सापडत नसल्याने या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव अद्यापही पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले नाहीत. दरम्यान, महावितरणकडे पाठविण्यात आलेल्या ३४ ग्रा.पं.च्या प्रस्तावा संदर्भात महावितरणकडे पं.स. कडून पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र महावितरणकडून अद्यापही प्रस्तावासंदर्भात कोणतीच कार्यवाही करण्यात येत नाही.अशी आहेत विद्युत व्यवस्थापकाची कामेग्राम विद्युत व्यवस्थापकामार्फत गावातील मीटर रिडिंग घेणे, वीज देयकाचे वाटप करणे, ब्रेकडाऊन अहेड करून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करणे, डीओ, फ्युज टाकणे, पथदिवे, नवीन जोडणी करणे, थकबाकी वसूल करणे, वीजपुरवठा बंद करणे यासारखी विविध कामे करण्यात येणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण