शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

परभणी : विद्युत व्यवस्थापकांची निवड प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:58 IST

ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तातडीने विद्युत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतवर्षी महावितरण मार्फत मानवत तालुक्यातील ४५ गावांत विद्युत व्यवस्थापक नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दीड वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर कोणत्याच गावात विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक न झाल्याने ही निवड प्रक्रिया रखडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तातडीने विद्युत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतवर्षी महावितरण मार्फत मानवत तालुक्यातील ४५ गावांत विद्युत व्यवस्थापक नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दीड वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर कोणत्याच गावात विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक न झाल्याने ही निवड प्रक्रिया रखडली आहे.ग्रामीण भागामध्ये महावितरण कंपनीमार्फत कार्यरत असलेल्या एकाच लाईनमनकडे अनेक गावे असतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी त्याला वेळेत त्या गावात जाता येत नाही. वेळोवेळी ही समस्या प्रकर्षाने पुढे आली आहे.ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणी दूर करणे, विजेमुळे होणारे अपघात रोखण्यासह वीजपुरवठा सुरळीत करून देण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या ग्रामविकास विभागाने २० आॅक्टोबर २०१६ रोजी एक आदेश काढून ३ हजार लोकसंख्येच्या आतील गावच्या ग्रामपंचायत स्तरावर महावितरण कंपनीमार्फत ग्राम विद्युत व्यवस्थापक नियुक्त करण्यात यावेत, असे सूचविले होते. या आदेशानुसार ग्रामपंचायतींनी जाहिरात काढून आयटीआयचा इलेक्ट्रीकल वायरमन ट्रेड उत्तीर्ण असलेल्या व पाच कि.मी. अंतराच्या आत राहणाºया उमेदवारांचे अर्ज मागविले होते.३४ ग्रामपंचायतींनी अर्ज मागविल्यानंतर योग्य उमेदवारांची निवड करून सर्व प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे सादर केले. पंचायत समितीने महावितरणला हे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र महावितरणमार्फत कोणतीच कार्यवाही होत नसल्याने ही प्रक्रिया रखडली आहे.ग्राम विद्युत व्यवस्थापकामार्फत विविध कामे करण्यात येणार असून विविध समस्या तत्काळ स्थानिक पातळीवर सोडविल्या जाणार असल्याने या ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या तातडीने करण्याबाबत महावितरणने पुढाकार घेणे गरजेचे आहे.दुसरीकडे या प्रक्रियेला सात ते आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या रखडल्याने अर्ज केलेल्या उमेदवारांची धाकधुक वाढली आहे.गावातच नोकरी मिळणार या आशेने अर्ज केलेला उमेदवार ग्रामपंचायत कार्यालयाकडे चकरा मारीत आहेत.११ ग्रा.पं.ला : मिळेना उमेदवारमानवत तालुक्यातील ३ हजार लोकसंख्येच्या ४५ ग्रामपंचायतींना जाहिरातीद्वारे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यापैकी ११ ग्रामपंचायतींना मात्र पाच कि.मी. अंतरा अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण उमेदवार सापडत नसल्याने या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव अद्यापही पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले नाहीत. दरम्यान, महावितरणकडे पाठविण्यात आलेल्या ३४ ग्रा.पं.च्या प्रस्तावा संदर्भात महावितरणकडे पं.स. कडून पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र महावितरणकडून अद्यापही प्रस्तावासंदर्भात कोणतीच कार्यवाही करण्यात येत नाही.अशी आहेत विद्युत व्यवस्थापकाची कामेग्राम विद्युत व्यवस्थापकामार्फत गावातील मीटर रिडिंग घेणे, वीज देयकाचे वाटप करणे, ब्रेकडाऊन अहेड करून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करणे, डीओ, फ्युज टाकणे, पथदिवे, नवीन जोडणी करणे, थकबाकी वसूल करणे, वीजपुरवठा बंद करणे यासारखी विविध कामे करण्यात येणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण