शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

परभणी : दुसऱ्या टप्प्यातील १६६ कोटी बँकेकडे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:20 IST

अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी दुसºया टप्प्यामध्ये जिल्ह्याला प्राप्त झालेल्या १९१ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांपैकी १६६ कोटी २४ लाख ३४ हजार रुपये प्रत्यक्ष बँकेकडे वर्ग करण्यात आले असून, बँक प्रशासन प्राप्त झालेल्या यादीनुसार प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी दुसºया टप्प्यामध्ये जिल्ह्याला प्राप्त झालेल्या १९१ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांपैकी १६६ कोटी २४ लाख ३४ हजार रुपये प्रत्यक्ष बँकेकडे वर्ग करण्यात आले असून, बँक प्रशासन प्राप्त झालेल्या यादीनुसार प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे़परभणी जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते़ त्यात कापूस आणि सोयाबीन या नगदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले़ या शेतकºयांना जिरायती पिकांसाठी ८ हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे शासनाने मदत जाहीर केली असून या मदतीचा पहिला टप्पा जिल्ह्यामध्ये वाटप झाला आहे़मागील आठवड्यात १९१ कोटी रुपयांच्या मदतीचा दुसरा टप्पा जिल्ह्याला प्राप्त झाला़ प्रशासनाने प्राप्त झालेली ही मदत तहसीलदारांच्या खात्यावर वर्ग केली़ त्यानंतर तहसीलस्तरावरुन मदतीची ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकºयांच्या यादीनिहाय बँकांकडे वर्ग केली असून, बँक प्रशासन आता प्रत्यक्ष खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया करणार आहे़ त्यामुळे दुसºया टप्प्यामध्ये बहुतांश शेतकºयांना मदत निधी प्राप्त होईल, अशी आशा निर्माण झाली आहे़ उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणी तालुक्याने ३४ कोटी २१ लाख ८५ हजार रुपये, जिंतूर ३० कोटी ६२ लाख ४५ हजार, मानवत १५ कोटी ६१ लाख ९८ हजार, सोनपेठ ११ कोटी ६१ लाख ३० हजार, गंगाखेड २० कोटी ८२ लाख ३० हजार, पालम १७ कोटी ५८ लाख ५९ हजार अशी दुसºया टप्प्यातील संपूर्ण रक्कम शेतकºयांच्या यादीसह बँकेकडे वर्ग केली आहे़ सेलू तालुक्याला २१ कोटी ४१ लाख ८० हजार रुपये प्राप्त झाले होते़ त्यापैकी १६ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपये (७८़३८ टक्के) आणि पूर्णा तालुक्याने २१ कोटी ६३ लाख ८८ हजार रुपयांपैकी १८ कोटी ९७ लाख १९ हजार रुपये (८७़६८ टक्के) बँकेकडे वर्ग केले आहेत़२ लाख शेतकºयांना मिळणार लाभ४अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांसाठी प्राप्त झालेल्या दुसºया टप्प्याची मदत सद्यस्थितीला बँकांकडे वर्ग केली असून, त्यातून १ लाख ९२ हजार ९९५ शेतकºयांच्या खात्यावर ही रक्कम नुकसानी प्रमाणे वर्ग केली जाणार आहे़४त्यामध्ये परभणी तालुक्यातील ३६ हजार ४८३, सेलू १९ हजार ९३६, जिंतूर ३१ हजार १६६, मानवत १६ हजार ६५९, सोनपेठ १४ हजार ३४१, गंगाखेड २८ हजार ३६९, पालम २१ हजार ८८६ आणि पूर्णा तालुक्यातील २४ हजार १५५ शेतकºयांना बाधित पिकांच्या नुकसानीपोटी मदत मिळणार आहे़४त्यामुळे या शेतकºयांना आता अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार नसून, लवकरच त्यांच्या बँक खात्यात मदत जमा होणार आहे.तिसºया टप्प्याची प्रतीक्षाच !४अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदतीचे दोन टप्पे जिल्ह्याला आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. अजूनही अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. या जिल्ह्यात सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक शेतकºयांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन टप्प्यांचे वाटप झाल्यानंतरही मदतीपासून वंचित राहणाºया शेतकºयांना तिसºया टप्प्याच्या मदतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरीbankबँक