शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

परभणी : दुसऱ्या टप्प्यातील १६६ कोटी बँकेकडे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:20 IST

अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी दुसºया टप्प्यामध्ये जिल्ह्याला प्राप्त झालेल्या १९१ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांपैकी १६६ कोटी २४ लाख ३४ हजार रुपये प्रत्यक्ष बँकेकडे वर्ग करण्यात आले असून, बँक प्रशासन प्राप्त झालेल्या यादीनुसार प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी दुसºया टप्प्यामध्ये जिल्ह्याला प्राप्त झालेल्या १९१ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांपैकी १६६ कोटी २४ लाख ३४ हजार रुपये प्रत्यक्ष बँकेकडे वर्ग करण्यात आले असून, बँक प्रशासन प्राप्त झालेल्या यादीनुसार प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे़परभणी जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते़ त्यात कापूस आणि सोयाबीन या नगदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले़ या शेतकºयांना जिरायती पिकांसाठी ८ हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे शासनाने मदत जाहीर केली असून या मदतीचा पहिला टप्पा जिल्ह्यामध्ये वाटप झाला आहे़मागील आठवड्यात १९१ कोटी रुपयांच्या मदतीचा दुसरा टप्पा जिल्ह्याला प्राप्त झाला़ प्रशासनाने प्राप्त झालेली ही मदत तहसीलदारांच्या खात्यावर वर्ग केली़ त्यानंतर तहसीलस्तरावरुन मदतीची ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकºयांच्या यादीनिहाय बँकांकडे वर्ग केली असून, बँक प्रशासन आता प्रत्यक्ष खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया करणार आहे़ त्यामुळे दुसºया टप्प्यामध्ये बहुतांश शेतकºयांना मदत निधी प्राप्त होईल, अशी आशा निर्माण झाली आहे़ उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणी तालुक्याने ३४ कोटी २१ लाख ८५ हजार रुपये, जिंतूर ३० कोटी ६२ लाख ४५ हजार, मानवत १५ कोटी ६१ लाख ९८ हजार, सोनपेठ ११ कोटी ६१ लाख ३० हजार, गंगाखेड २० कोटी ८२ लाख ३० हजार, पालम १७ कोटी ५८ लाख ५९ हजार अशी दुसºया टप्प्यातील संपूर्ण रक्कम शेतकºयांच्या यादीसह बँकेकडे वर्ग केली आहे़ सेलू तालुक्याला २१ कोटी ४१ लाख ८० हजार रुपये प्राप्त झाले होते़ त्यापैकी १६ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपये (७८़३८ टक्के) आणि पूर्णा तालुक्याने २१ कोटी ६३ लाख ८८ हजार रुपयांपैकी १८ कोटी ९७ लाख १९ हजार रुपये (८७़६८ टक्के) बँकेकडे वर्ग केले आहेत़२ लाख शेतकºयांना मिळणार लाभ४अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांसाठी प्राप्त झालेल्या दुसºया टप्प्याची मदत सद्यस्थितीला बँकांकडे वर्ग केली असून, त्यातून १ लाख ९२ हजार ९९५ शेतकºयांच्या खात्यावर ही रक्कम नुकसानी प्रमाणे वर्ग केली जाणार आहे़४त्यामध्ये परभणी तालुक्यातील ३६ हजार ४८३, सेलू १९ हजार ९३६, जिंतूर ३१ हजार १६६, मानवत १६ हजार ६५९, सोनपेठ १४ हजार ३४१, गंगाखेड २८ हजार ३६९, पालम २१ हजार ८८६ आणि पूर्णा तालुक्यातील २४ हजार १५५ शेतकºयांना बाधित पिकांच्या नुकसानीपोटी मदत मिळणार आहे़४त्यामुळे या शेतकºयांना आता अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार नसून, लवकरच त्यांच्या बँक खात्यात मदत जमा होणार आहे.तिसºया टप्प्याची प्रतीक्षाच !४अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदतीचे दोन टप्पे जिल्ह्याला आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. अजूनही अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. या जिल्ह्यात सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक शेतकºयांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन टप्प्यांचे वाटप झाल्यानंतरही मदतीपासून वंचित राहणाºया शेतकºयांना तिसºया टप्प्याच्या मदतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरीbankबँक