शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

परभणी : हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:53 IST

पावसाच्या अत्यल्प प्रमाणाचा फटका तुरीच्या पिकाला बसला असून, उत्पादनात घट झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे़ बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील महिनाभरात १८०० क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे़ त्यामुळे हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट सुरूच असल्याचे पहावयास मिळत आहे़

सत्यशील धबडगे ।लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : पावसाच्या अत्यल्प प्रमाणाचा फटका तुरीच्या पिकाला बसला असून, उत्पादनात घट झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे़ बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील महिनाभरात १८०० क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे़ त्यामुळे हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट सुरूच असल्याचे पहावयास मिळत आहे़२०१७ मध्ये तालुक्यातील एकूण ३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती़ मात्र २०१८ मध्ये खरीप हंगामात तुरीच्या पेरणी क्षेत्रात घट झाल्याचे दिसून आले़ मानवत मंडळात १२०५ हेक्टर, कोल्हा मंडळात ६६७ हेक्टर तर केकरजवळा मंडळात ९५९ हेक्टर अशा एकूण २ हजार ८०१ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती़ पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने कृपा केल्याने शेतकरी समाधानी होता़ मात्र शेवटच्या दीड महिन्यात पावसाने खंड दिल्याने याचा फटका तालुक्यातील तूर उत्पादक शेतकºयांना बसला़ अनंत अडचणींना तोंड देऊन १२ डिसेंबरपासून शेतकºयांनी बाजारपेठेत तूर विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली़ सुरुवातीला तुरीला ४ हजार ७०० रुपये दर मिळाला होता़ त्यामुळे शेतकºयांत नाराजी दिसून येत होती़ निराशेचे वातावरण शेतकºयांत निर्माण झाले होते़ मात्र आता मागील आठवड्यापासून तुरीच्या दरात सतत वाढ होत आहे़ तुरीला बाजारपेठेत ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे़ आतापर्यंत बाजारपेठेत १८०० क्विंटल आवक झाल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे़कापूस उत्पादकही हवालदिलकापूस वेचणीला दिवाळीच्या अगोदर सुरुवात झाली आहे़ दुष्काळामुळे कामाच्या शोधात अनेकांनी शहराकडे धाव घेतल्याने मजूर मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे़ जे मजूर उपलब्ध आहेत ते वेचणीसाठी जास्तीचा दर मागत आहेत़ ८ ते १० रुपये प्रतिकिलो मजुरी द्यावी लागते़दुसरीकडे कापसाला चांगला दर मिळेल, या आशेने बहुतांश शेतकºयांनी कापूस विक्रीकडे पाठ फिरविली आहे़ सुरुवातीच्या काळात कापसाचा दर ६ हजारापर्यंत गेला होता़ मागील आठवड्यात ५ हजार ६८० रुपये कापसाला वरचा दर मिळाला होता़ मात्र तो आता ५ हजार ५७० रुपयांपर्यंत घसरला आहे़ १०० रुपयांनी भाव तुटले आहेत़१२ जानेवारी रोजी ५ हजार ५७० रुपयांचा कापसाला वरचा दर मिळाला़ यामुळे शेतकरी निराश झाले आहेत़ भाव कमी-जास्त होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत़ भाव वाढतील, या आशेने अनेक शेतकरी वाट बघत होते़ मात्र प्रत्यक्षात भाव वाढ होत नसल्याने शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी बाहेर काढताना दिसत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी