शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
4
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
5
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
6
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
7
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
8
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
9
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
10
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
11
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
12
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
13
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
14
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
15
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
16
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
17
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
18
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
19
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
20
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:53 IST

पावसाच्या अत्यल्प प्रमाणाचा फटका तुरीच्या पिकाला बसला असून, उत्पादनात घट झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे़ बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील महिनाभरात १८०० क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे़ त्यामुळे हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट सुरूच असल्याचे पहावयास मिळत आहे़

सत्यशील धबडगे ।लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : पावसाच्या अत्यल्प प्रमाणाचा फटका तुरीच्या पिकाला बसला असून, उत्पादनात घट झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे़ बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील महिनाभरात १८०० क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे़ त्यामुळे हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट सुरूच असल्याचे पहावयास मिळत आहे़२०१७ मध्ये तालुक्यातील एकूण ३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती़ मात्र २०१८ मध्ये खरीप हंगामात तुरीच्या पेरणी क्षेत्रात घट झाल्याचे दिसून आले़ मानवत मंडळात १२०५ हेक्टर, कोल्हा मंडळात ६६७ हेक्टर तर केकरजवळा मंडळात ९५९ हेक्टर अशा एकूण २ हजार ८०१ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती़ पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने कृपा केल्याने शेतकरी समाधानी होता़ मात्र शेवटच्या दीड महिन्यात पावसाने खंड दिल्याने याचा फटका तालुक्यातील तूर उत्पादक शेतकºयांना बसला़ अनंत अडचणींना तोंड देऊन १२ डिसेंबरपासून शेतकºयांनी बाजारपेठेत तूर विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली़ सुरुवातीला तुरीला ४ हजार ७०० रुपये दर मिळाला होता़ त्यामुळे शेतकºयांत नाराजी दिसून येत होती़ निराशेचे वातावरण शेतकºयांत निर्माण झाले होते़ मात्र आता मागील आठवड्यापासून तुरीच्या दरात सतत वाढ होत आहे़ तुरीला बाजारपेठेत ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे़ आतापर्यंत बाजारपेठेत १८०० क्विंटल आवक झाल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे़कापूस उत्पादकही हवालदिलकापूस वेचणीला दिवाळीच्या अगोदर सुरुवात झाली आहे़ दुष्काळामुळे कामाच्या शोधात अनेकांनी शहराकडे धाव घेतल्याने मजूर मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे़ जे मजूर उपलब्ध आहेत ते वेचणीसाठी जास्तीचा दर मागत आहेत़ ८ ते १० रुपये प्रतिकिलो मजुरी द्यावी लागते़दुसरीकडे कापसाला चांगला दर मिळेल, या आशेने बहुतांश शेतकºयांनी कापूस विक्रीकडे पाठ फिरविली आहे़ सुरुवातीच्या काळात कापसाचा दर ६ हजारापर्यंत गेला होता़ मागील आठवड्यात ५ हजार ६८० रुपये कापसाला वरचा दर मिळाला होता़ मात्र तो आता ५ हजार ५७० रुपयांपर्यंत घसरला आहे़ १०० रुपयांनी भाव तुटले आहेत़१२ जानेवारी रोजी ५ हजार ५७० रुपयांचा कापसाला वरचा दर मिळाला़ यामुळे शेतकरी निराश झाले आहेत़ भाव कमी-जास्त होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत़ भाव वाढतील, या आशेने अनेक शेतकरी वाट बघत होते़ मात्र प्रत्यक्षात भाव वाढ होत नसल्याने शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी बाहेर काढताना दिसत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी