शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

परभणी : धान्य घोटाळ्याचा तपास पडला अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:09 AM

येथील पुरवठा विभागात दीड वर्षांपूर्वी झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास हिंगोली येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्याकडे दिल्यानंतरही त्यांनी या घोटाळ्यातील आरोपींना अटकच केली नसल्याने हा तपास अडगळीत पडला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील पुरवठा विभागात दीड वर्षांपूर्वी झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास हिंगोली येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्याकडे दिल्यानंतरही त्यांनी या घोटाळ्यातील आरोपींना अटकच केली नसल्याने हा तपास अडगळीत पडला आहे़परभणी येथील पुरवठा विभागाच्या गोदामात आॅगस्ट २०१६ मध्ये २८ कोटी रुपयांचा धान्य घोटाळा झाल्या प्रकरणी ३७ जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला होता़ या प्रकरणातील २३ आरोपींना अटक करण्यात आली़ या सर्व आरोपींना जामीनही मिळालेला आहे़ उर्वरित आरोपींपैकी एकाचा मृत्यू झाला असून, १४ पैकी ९ आरोपी हे शासकीय अधिकारी आहेत़ तर खाजगी पाच आरोपी आहेत़ ८ सप्टेंबर रोजी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौºयाच्या वेळी परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यात वाद झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास पानसरे यांनी इतर अधिकाºयांना सोपविण्याची विनंती विशेष पोलीस महानिरीक्षकांना केली होती़ त्यानुसार हिंगोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांना हे प्रकरण तपासासाठी आॅक्टोबर महिन्यात सोपविण्यात आले़ त्यानंतर जवळपास अडीच महिन्यांपासून गुंजाळ यांनी या प्रकरणात एकाही आरोपीला अटक केलेली नाही़ विशेष म्हणजे या प्रकरणातील एक आरोपी हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी आहे़ तर परभणीतील एक बडा उद्योजक आहे़ या खाजगी आरोपींना अटक करण्याबाबत गुंजाळ यांना काय अडचण येत आहे? हे समजत नाही़ परभणीहून हिंगोलीकडे तपास वर्ग झाल्यानंतर या तपासाला गती येईल, अशी परभणीकरांची अपेक्षा होती़ परंतु, गुंजाळ यांनी ही अपेक्षा पूर्णत: फोल ठरविली आहे़ विशेष म्हणजे तब्बल दीड वर्षांचा कालावधी या प्रकरणाला झाल्यानंतरही एकही संघटना या विरोधात आता बोलत नाही़ परिणामी या प्रकरणातील आरोपी आता उजळमाथ्याने फिरत आहेत़ शिवाय शासकीय सेवेतील निलंबित झालेले अधिकारी सेवेत पुनर्रस्थापित झाले आहेत. तर अन्य आरोपी शासकीय पगार घेऊन आरामात नोकरी करीत आहेत़वरिष्ठ अधिकाºयांनीही दिले आरोपींना अभयपरभणीच्या धान्य घोटाळ्यात दोन उपजिल्हाधिकाºयांसह तब्बल ९ शासकीय अधिकारी व कर्मचारी आरोपी आहेत़ यातील उपजिल्हाधिकारी कच्छवे व तहसीलदार रुईकर यांना निलंबित करण्यात आले होते़ ते आता शासकीय सेवेत परतले आहेत़ इतर आरोपींबाबतचा विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे अहवाल सादर करूनही कारवाई करण्यात आलेली नाही़ त्यामुळे वरिष्ठ पातळीवरूनही या अधिकाºयांना अभय दिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे़ शिवाय पोलीसही या आरोपींना अटक करीत नाहीत़