शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : घरकुल बांधकामांत वाळूचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:34 IST

रमाई आवास योजनेंतर्गत शहरात १६०० घरकुलांना मंजुरी दिली असली तरी वाळू उपलब्ध नसल्याने केवळ ३६२ घरकुलं अंतिम टप्प्यात पोहचली आहेत. उर्वरित घरकुलांसाठी वाळूची अडचण सतावत असून महापालिकेचे उद्दिष्ट यावर्षी रखडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रमाई आवास योजनेंतर्गत शहरात १६०० घरकुलांना मंजुरी दिली असली तरी वाळू उपलब्ध नसल्याने केवळ ३६२ घरकुलं अंतिम टप्प्यात पोहचली आहेत. उर्वरित घरकुलांसाठी वाळूची अडचण सतावत असून महापालिकेचे उद्दिष्ट यावर्षी रखडले आहे.शहरी भागातील मागासवर्गीय घटकातील लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाकडून रमाई आवास योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड करुन घरकुल बांधण्यासाठी या लाभार्थ्यांना टप्प्याटप्याने अनुदानाचे वितरण केले जाते. परभणी शहरामध्ये २०१८-१९ या वर्षासाठी ३ हजार ३०० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. महापालिकेने १६०० लाभार्थ्यांची योजनेसाठी निवड केली. त्यामुळे वर्षभरामध्ये किमान १६०० घरकुल बांधून पूर्ण होणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे या लाभार्थ्यांसाठी महापालिकेकडे निधीही उपलब्ध आहे. घरकुलांच्या बांधकामानुसार लाभार्थ्यांना निधी वितरित केला जातो. मात्र यावर्षी वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. घरकुल बांधण्यासाठी किमान ५ ब्रास वाळूची आवश्यकता असून १ ब्रास वाळू ६ हजार रुपयांपर्यत मिळू लागली आहे. सर्वसाधारणपणे ३ हजार रुपये ब्रास विक्री होणाऱ्या वाळूचे भाव दुप्पट्टीने वाढल्याने घरकुल बांधकामाचे गणित कोलमडले आहे. त्याचा परिणाम अनेकांनी निधी मंजूर झाल्यानंतरही बांधकामे ठप्प ठेवली आहेत.परभणी शहरामध्ये एकूण १६०० लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाची प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी ३६२ लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम लेंटल लेव्हलपर्यंत पोहचले आहे. या लाभार्थ्यांना महापालिकेकडून पाचव्या टप्प्याचे अनुदान वितरित केले जाणार आहे.४९५ लाभार्थ्यांनी दुसऱ्या टप्प्यापर्यंत बांधकाम केले असून या लाभार्थ्यांचेही बांधकामाचे अनुदान वितरित केले जाणार आहे. तसेच ७५६ लाभार्थ्यांच्या घरकुलांचे बांधकाम सद्यस्थितीला बेसमेंटस्तरापर्यंतच आहे. ३१ मार्च २०१९ पर्यंत प्रशासकीय मंजुरी दिलेल्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र मुदत संपली तरी पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या ३६२ च्या पुढे सरकली नाही. परिणामी वाळूचा खोडा लाभार्थ्यांबरोबरच प्रशासकीय यंत्रणेलाही बसला आहे. राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने घरकुलासाठी वाळू उपलब्ध करुन द्यावी आणि लाभार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी पाऊले उचलावीत, अशी मागणी होत आहे.महापालिकेने नोंदविली मागणीपरभणी शहरातील घरकुलांचे बांधकाम वाळूअभावी होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर लाभार्थ्यांना कमी दरात वाळू उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी महानगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविली आहे. विशेष म्हणजे मनपाने मंजुरी दिलेल्या लाभार्थ्यांची यादीही जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोणताही एक वाळू धक्का घरकुल बांधकामासाठी उपलब्ध करुन द्यावा आणि या वाळू धक्क्यावरुन प्रति लाभार्थी ५ ब्रास वाळू द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य शासनानेही घरकुल बांधकामांना वाळू देण्याचे आदेश दिले आहेत; परंतु, परभणी जिल्हा प्रशासनाने अजूनही या संदर्भात गांभीर्याने घेतले नसल्याने लाभार्थी प्रशासनाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.घरकुल बांधकामात पाणीटंचाईचा अडसर४आतापर्यंत शहरामध्ये लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध होत नसल्याने घरकुल बांधकाम झाले नाहीत. मागील काही दिवसांपासून शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नळ योजनेद्वारे येणारे पाणी १३ ते १५ दिवसांना एकवेळ मिळत आहे. तर हातपंपाची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावत आहे. त्याचा परिणामही घरकुल बांधकामावर झाला असून बांधकामांची गती मंदावली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूHomeघर