शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

परभणी : दररोज होतेय ३ हजार ऊस वाढ्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:39 IST

यंदाच्या हंगामात जेमतेम पाऊस झाल्याने परिसरात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून ताडबोरगाव व परिसरामध्ये दररोज तीन हजार वाढ्यांची (ऊस) विक्री होऊ लागली आहे.

राजू पठाडे।लोकमत न्यूज नेटवर्कताडबोरगाव (परभणी) : यंदाच्या हंगामात जेमतेम पाऊस झाल्याने परिसरात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून ताडबोरगाव व परिसरामध्ये दररोज तीन हजार वाढ्यांची (ऊस) विक्री होऊ लागली आहे.कडवळ, मका, संकरित ज्वारी आणि चराईसाठी कुठेही गवत उगवले नसल्याने परिसरात हिरवा चारा शिल्लक नाही. सोयाबीनचे थोडेफार भूस होते, तेही संपत आले आहे. त्यामुळे पशूपालकांसमवेत चाºयाचा गंभीर प्रश्न उभा टाकला आहे. विकत चारा घेऊन जनावरांचे पालन-पोषण करण्याची वेळ पशूपालकांवर ओढावली आहे.यंदाच्या संपूर्ण पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परिणामी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच चाºयाचा प्रश्न आतापासूनच निर्माण झाला आहे. पशूधन सांभाळणे अवघड झाले असून दररोज शेतकºयांना चारा विकत घ्यावा लागत आहे. सध्या उसाची तोडणी सुरु असून या उसाचे वाढे विक्रीला येत आहेत. ताडबोरगाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वाढ्यांची विक्री होत आहे.जनावरांचे पालन-पोषण करण्यासाठी पशूपालकांनी वाढ्याला पसंती दिली असून दररोज सुमारे ३ हजार वाढ्यांची या भागात विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जनावरे सांभाळणे जिकरीचे झाले आहे.रब्बी ज्वारीवरही संकटअनेक शेतकºयांनी उपलब्ध पाण्यावर चाºयासाठी ज्वारीची पेरणी केली आहे. त्यावरही आता लष्करी अळीचा प्रादूर्भाव झाला असून या अळीने पाते, पोंगे कुरतडून नुकसान केले आहे. यामुळे ज्वारी, मका ही पिके हाती लागणार नसून चाºयाचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.शेतीला जोड म्हणून म्हैस घेऊन दुध व्यवसाय सुरु केला; परंतु, ओला चारा नसल्याने दररोज विकतचा चारा घ्यावा लागत आहे. परिणामी व्यवसाय अडचणीत सापडला आहे.-संतोष पठाडे, शेतकरीअत्यल्प पावसाळामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच चाºयाचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.-सुनिता पठाडे, सरपंच

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी