शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

परभणी : दररोज होतेय ३ हजार ऊस वाढ्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:39 IST

यंदाच्या हंगामात जेमतेम पाऊस झाल्याने परिसरात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून ताडबोरगाव व परिसरामध्ये दररोज तीन हजार वाढ्यांची (ऊस) विक्री होऊ लागली आहे.

राजू पठाडे।लोकमत न्यूज नेटवर्कताडबोरगाव (परभणी) : यंदाच्या हंगामात जेमतेम पाऊस झाल्याने परिसरात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून ताडबोरगाव व परिसरामध्ये दररोज तीन हजार वाढ्यांची (ऊस) विक्री होऊ लागली आहे.कडवळ, मका, संकरित ज्वारी आणि चराईसाठी कुठेही गवत उगवले नसल्याने परिसरात हिरवा चारा शिल्लक नाही. सोयाबीनचे थोडेफार भूस होते, तेही संपत आले आहे. त्यामुळे पशूपालकांसमवेत चाºयाचा गंभीर प्रश्न उभा टाकला आहे. विकत चारा घेऊन जनावरांचे पालन-पोषण करण्याची वेळ पशूपालकांवर ओढावली आहे.यंदाच्या संपूर्ण पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परिणामी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच चाºयाचा प्रश्न आतापासूनच निर्माण झाला आहे. पशूधन सांभाळणे अवघड झाले असून दररोज शेतकºयांना चारा विकत घ्यावा लागत आहे. सध्या उसाची तोडणी सुरु असून या उसाचे वाढे विक्रीला येत आहेत. ताडबोरगाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वाढ्यांची विक्री होत आहे.जनावरांचे पालन-पोषण करण्यासाठी पशूपालकांनी वाढ्याला पसंती दिली असून दररोज सुमारे ३ हजार वाढ्यांची या भागात विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जनावरे सांभाळणे जिकरीचे झाले आहे.रब्बी ज्वारीवरही संकटअनेक शेतकºयांनी उपलब्ध पाण्यावर चाºयासाठी ज्वारीची पेरणी केली आहे. त्यावरही आता लष्करी अळीचा प्रादूर्भाव झाला असून या अळीने पाते, पोंगे कुरतडून नुकसान केले आहे. यामुळे ज्वारी, मका ही पिके हाती लागणार नसून चाºयाचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.शेतीला जोड म्हणून म्हैस घेऊन दुध व्यवसाय सुरु केला; परंतु, ओला चारा नसल्याने दररोज विकतचा चारा घ्यावा लागत आहे. परिणामी व्यवसाय अडचणीत सापडला आहे.-संतोष पठाडे, शेतकरीअत्यल्प पावसाळामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच चाºयाचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.-सुनिता पठाडे, सरपंच

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी