शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत सभा : एकजुटीने लढा देऊन गड शाबूत ठेवा- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:27 IST

भाजपाकडून लोकशाहीची मूल्य पायदळी तुडविली जात आहेत़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढा देऊन आपला गड, आपला मतदार संघ कायम ठेवावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी येथे आयोजित सभेत बोलताना केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भाजपाकडून लोकशाहीची मूल्य पायदळी तुडविली जात आहेत़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढा देऊन आपला गड, आपला मतदार संघ कायम ठेवावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी येथे आयोजित सभेत बोलताना केले़परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे उमेदवार सुरेश देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी भवन येथे आयोजित सभेत खा़ चव्हाण बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर हिंगोलीचे खा़ राजीव सातव, माजी मंत्री आ़ राजेश टोपे, आ़ विजय भांबळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ रामराव वडकुते, आ़ रोहिदास चव्हाण, आ़ डी़पी़ सावंत, आ़ संतोष टारफे, माजी आ़ सुरेश देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी आ़ भाऊराव पाटील गोरेगावकर, महापौर मीनाताई वरपूडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष पंडितराव चोखट, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, माजी खा़ तुकाराम रेंगे, जि़प़ उपाध्यक्षा भावना नखाते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष स्वराजसिंह परिहार, हिंगोलीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे आदींची उपस्थिती होती़यावेळी बोलताना खा़ चव्हाण म्हणाले की, भाजपाकडून तोडफोडीचे राजकारण करून लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकजुटीने लढा दिला पाहिजे़ अशक्य काहीही नाही, आपला जिल्हा, आपला मतदार संघ शाबूत ठेवला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून काम करावे, असे ते म्हणाले़ राज्यात १३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; परंतु, राज्य सरकारला याकडे पाहण्यास वेळ मिळत नाही़ शेतकºयांच्या कर्जमाफीची बोगस घोषणा केली़ सरकारला दुष्काळाकडे पाहण्यास वेळ नाही़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विद्यमान परिस्थितीवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे़, असेही ते म्हणाले़यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की, जातीयवादी पक्षांचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे़ आज घडीला समाजातील कोणताही घटक समाधानी नाही़ बोंडअळी, पीक विमा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती यासाठी पैसे दिले जात नाहीत़ विविध योजनांच्या अनुदानाचे पैसे दिले जात नाहीत़ कर्जमाफीची पोकळ घोषणा करण्यात आली़ त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले़ यावेळी खा़ राजीव सातव, माजी आ़ सुरेश देशमुख, आ़ बाबाजानी दुर्राणी, सुरेश वरपूडकर यांनीही मार्गदर्शन केले़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकSuresh Deshmukhसुरेश देशमुखAshok Chavanअशोक चव्हाण