शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

परभणीत सभा : एकजुटीने लढा देऊन गड शाबूत ठेवा- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:27 IST

भाजपाकडून लोकशाहीची मूल्य पायदळी तुडविली जात आहेत़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढा देऊन आपला गड, आपला मतदार संघ कायम ठेवावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी येथे आयोजित सभेत बोलताना केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भाजपाकडून लोकशाहीची मूल्य पायदळी तुडविली जात आहेत़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढा देऊन आपला गड, आपला मतदार संघ कायम ठेवावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी येथे आयोजित सभेत बोलताना केले़परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे उमेदवार सुरेश देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी भवन येथे आयोजित सभेत खा़ चव्हाण बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर हिंगोलीचे खा़ राजीव सातव, माजी मंत्री आ़ राजेश टोपे, आ़ विजय भांबळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ रामराव वडकुते, आ़ रोहिदास चव्हाण, आ़ डी़पी़ सावंत, आ़ संतोष टारफे, माजी आ़ सुरेश देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी आ़ भाऊराव पाटील गोरेगावकर, महापौर मीनाताई वरपूडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष पंडितराव चोखट, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, माजी खा़ तुकाराम रेंगे, जि़प़ उपाध्यक्षा भावना नखाते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष स्वराजसिंह परिहार, हिंगोलीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे आदींची उपस्थिती होती़यावेळी बोलताना खा़ चव्हाण म्हणाले की, भाजपाकडून तोडफोडीचे राजकारण करून लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकजुटीने लढा दिला पाहिजे़ अशक्य काहीही नाही, आपला जिल्हा, आपला मतदार संघ शाबूत ठेवला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून काम करावे, असे ते म्हणाले़ राज्यात १३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; परंतु, राज्य सरकारला याकडे पाहण्यास वेळ मिळत नाही़ शेतकºयांच्या कर्जमाफीची बोगस घोषणा केली़ सरकारला दुष्काळाकडे पाहण्यास वेळ नाही़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विद्यमान परिस्थितीवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे़, असेही ते म्हणाले़यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की, जातीयवादी पक्षांचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे़ आज घडीला समाजातील कोणताही घटक समाधानी नाही़ बोंडअळी, पीक विमा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती यासाठी पैसे दिले जात नाहीत़ विविध योजनांच्या अनुदानाचे पैसे दिले जात नाहीत़ कर्जमाफीची पोकळ घोषणा करण्यात आली़ त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले़ यावेळी खा़ राजीव सातव, माजी आ़ सुरेश देशमुख, आ़ बाबाजानी दुर्राणी, सुरेश वरपूडकर यांनीही मार्गदर्शन केले़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकSuresh Deshmukhसुरेश देशमुखAshok Chavanअशोक चव्हाण