शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

परभणीत सभा : एकजुटीने लढा देऊन गड शाबूत ठेवा- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:27 IST

भाजपाकडून लोकशाहीची मूल्य पायदळी तुडविली जात आहेत़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढा देऊन आपला गड, आपला मतदार संघ कायम ठेवावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी येथे आयोजित सभेत बोलताना केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भाजपाकडून लोकशाहीची मूल्य पायदळी तुडविली जात आहेत़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढा देऊन आपला गड, आपला मतदार संघ कायम ठेवावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी येथे आयोजित सभेत बोलताना केले़परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे उमेदवार सुरेश देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी भवन येथे आयोजित सभेत खा़ चव्हाण बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर हिंगोलीचे खा़ राजीव सातव, माजी मंत्री आ़ राजेश टोपे, आ़ विजय भांबळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ रामराव वडकुते, आ़ रोहिदास चव्हाण, आ़ डी़पी़ सावंत, आ़ संतोष टारफे, माजी आ़ सुरेश देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी आ़ भाऊराव पाटील गोरेगावकर, महापौर मीनाताई वरपूडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष पंडितराव चोखट, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, माजी खा़ तुकाराम रेंगे, जि़प़ उपाध्यक्षा भावना नखाते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष स्वराजसिंह परिहार, हिंगोलीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे आदींची उपस्थिती होती़यावेळी बोलताना खा़ चव्हाण म्हणाले की, भाजपाकडून तोडफोडीचे राजकारण करून लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकजुटीने लढा दिला पाहिजे़ अशक्य काहीही नाही, आपला जिल्हा, आपला मतदार संघ शाबूत ठेवला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून काम करावे, असे ते म्हणाले़ राज्यात १३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; परंतु, राज्य सरकारला याकडे पाहण्यास वेळ मिळत नाही़ शेतकºयांच्या कर्जमाफीची बोगस घोषणा केली़ सरकारला दुष्काळाकडे पाहण्यास वेळ नाही़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विद्यमान परिस्थितीवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे़, असेही ते म्हणाले़यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की, जातीयवादी पक्षांचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे़ आज घडीला समाजातील कोणताही घटक समाधानी नाही़ बोंडअळी, पीक विमा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती यासाठी पैसे दिले जात नाहीत़ विविध योजनांच्या अनुदानाचे पैसे दिले जात नाहीत़ कर्जमाफीची पोकळ घोषणा करण्यात आली़ त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले़ यावेळी खा़ राजीव सातव, माजी आ़ सुरेश देशमुख, आ़ बाबाजानी दुर्राणी, सुरेश वरपूडकर यांनीही मार्गदर्शन केले़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकSuresh Deshmukhसुरेश देशमुखAshok Chavanअशोक चव्हाण