शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

परभणी : कार्यालय चालते रेल्वे वेळापत्रकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:33 IST

तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना पंचायत समितीसारख्या महत्त्वाच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अधिकारी व विविध विभागातील कर्मचारी फिरकत नसल्याचे चित्र शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. दरम्यान, अनेक ग्रामस्थ कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करीत असल्याचे पहावयास मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना पंचायत समितीसारख्या महत्त्वाच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अधिकारी व विविध विभागातील कर्मचारी फिरकत नसल्याचे चित्र शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. दरम्यान, अनेक ग्रामस्थ कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करीत असल्याचे पहावयास मिळाले.येथील पंचायत समिती कार्यालयातून ग्रामीण भागातील विविध योजना राबविल्या जातात. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयात लाभार्थी व ग्रामस्थांची गर्दी असते;परंतु, येथील पंचायत समितीला अनेक महिन्यांपासून नियमित गटविकास अधिकारी मिळाले नाहीत. इतर तालुक्याच्या गटविकास अधिकाºयांना सेलूचा पदभार देऊन कामकाज केले जात आहे. परिणामी प्रभारी बीडीओ आठवड्यातून एक ते दोन दिवस काही तासांची कार्यालयात हजेरी लावून जातात. यामुळे शेकडो लाभार्थ्यांना ताटकळत बसावे लागते. तसेच अधिकारी व कर्मचाºयांना रान मोकळे मिळते.पंचायत समिती कार्यालयातील पंचायत विभाग, बांधकाम विभाग, लेखा विभाग, मग्रारोहचो विभाग, आरोग्य, घरकूल आवास योजना व इतर विभागातील काळात शुक्रवारी, दुपारी १२ वाजेर्पंत शुकशुकाट होता. केवळ लेखा व सामान्य अस्थापना विभागातील चार ते पाच कर्मचारी टेबलवर कामकाज करताना दिसून आले.बांधकाम विभागातील एक कनिष्ठ सहाय्यक वगळता एकही अभियंता कक्षात नव्हता. पंचायत विभागातील सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. तर सभापती व पदाधिकाºयांच्या कक्षाला देखील कुलूप होते.दरम्यान, दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागात पाणी, चारा व केंद्र, राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पं.स. कार्यालयाची आहे;परंतु, कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने कार्यालयाचे कामकाज ढेपाळल्याचे चित्र दिसून आले.कार्यालय चालते रेल्वे वेळापत्रकावर४पंचायत समिती कार्यालयातील बहुतांश कर्मचारी व अधिकारी परभणी येथून ये-जा करतात. दुपारी बारानंतर तपोवन रेल्वे गाडीने कार्यालयात पोहचतात. तर दुपारी साडेतीनच्या तपोवनने परत जातात. त्यामुळे तीनच तास कर्मचारी कार्यालयात उपलब्ध असतात. अनेक अधिकारी व कर्मचारी बैठकीच्या नावावर कार्र्यालयाला दांडी मारीत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीEmployeeकर्मचारी