शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

परभणी : कार्यालय चालते रेल्वे वेळापत्रकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:33 IST

तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना पंचायत समितीसारख्या महत्त्वाच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अधिकारी व विविध विभागातील कर्मचारी फिरकत नसल्याचे चित्र शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. दरम्यान, अनेक ग्रामस्थ कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करीत असल्याचे पहावयास मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना पंचायत समितीसारख्या महत्त्वाच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अधिकारी व विविध विभागातील कर्मचारी फिरकत नसल्याचे चित्र शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. दरम्यान, अनेक ग्रामस्थ कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करीत असल्याचे पहावयास मिळाले.येथील पंचायत समिती कार्यालयातून ग्रामीण भागातील विविध योजना राबविल्या जातात. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयात लाभार्थी व ग्रामस्थांची गर्दी असते;परंतु, येथील पंचायत समितीला अनेक महिन्यांपासून नियमित गटविकास अधिकारी मिळाले नाहीत. इतर तालुक्याच्या गटविकास अधिकाºयांना सेलूचा पदभार देऊन कामकाज केले जात आहे. परिणामी प्रभारी बीडीओ आठवड्यातून एक ते दोन दिवस काही तासांची कार्यालयात हजेरी लावून जातात. यामुळे शेकडो लाभार्थ्यांना ताटकळत बसावे लागते. तसेच अधिकारी व कर्मचाºयांना रान मोकळे मिळते.पंचायत समिती कार्यालयातील पंचायत विभाग, बांधकाम विभाग, लेखा विभाग, मग्रारोहचो विभाग, आरोग्य, घरकूल आवास योजना व इतर विभागातील काळात शुक्रवारी, दुपारी १२ वाजेर्पंत शुकशुकाट होता. केवळ लेखा व सामान्य अस्थापना विभागातील चार ते पाच कर्मचारी टेबलवर कामकाज करताना दिसून आले.बांधकाम विभागातील एक कनिष्ठ सहाय्यक वगळता एकही अभियंता कक्षात नव्हता. पंचायत विभागातील सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. तर सभापती व पदाधिकाºयांच्या कक्षाला देखील कुलूप होते.दरम्यान, दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागात पाणी, चारा व केंद्र, राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पं.स. कार्यालयाची आहे;परंतु, कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने कार्यालयाचे कामकाज ढेपाळल्याचे चित्र दिसून आले.कार्यालय चालते रेल्वे वेळापत्रकावर४पंचायत समिती कार्यालयातील बहुतांश कर्मचारी व अधिकारी परभणी येथून ये-जा करतात. दुपारी बारानंतर तपोवन रेल्वे गाडीने कार्यालयात पोहचतात. तर दुपारी साडेतीनच्या तपोवनने परत जातात. त्यामुळे तीनच तास कर्मचारी कार्यालयात उपलब्ध असतात. अनेक अधिकारी व कर्मचारी बैठकीच्या नावावर कार्र्यालयाला दांडी मारीत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीEmployeeकर्मचारी