शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

परभणी : टंचाईसाठी ८५ लाखांची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:26 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रशासनाने टंचाईवर मात करण्यासाठी ८५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे मागील काही महिन्यांपासून रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत़

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रशासनाने टंचाईवर मात करण्यासाठी ८५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे मागील काही महिन्यांपासून रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत़परभणी जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे़ भूजल पातळी खालावल्याने अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजना बंद पडल्या़ परिणामी ग्रामस्थांना गावाशेजारी असलेल्या विहिरींमधून पाणी आणावे लागत आहे़ परभणी, पूर्णा, मानवत तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता तेवढी अधिक नसली तरी जिंतूर, पालम आणि गंगाखेड या तीन तालुक्यांमध्ये पाणी समस्या अधिक गंभीर आहे़ त्यामुळे प्रशासनाने देखील जिंतूर, पालम, गंगाखेड या तालुक्यांनाच कामे मंजूर करताना प्राधान्य दिले आहे़ जिल्हा प्रशासनाने २९ कोटी रुपये खर्चाचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे़ मात्र प्रत्यक्षात आराखड्यातील कामांना मंजुरी मिळत नसल्याची ओरड वाढली होती़ जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी तातडीने पावले उचलत आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेल्या कामांना तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे़जिल्हा प्रशासनाने जून महिन्यापर्यंतचा टंचाई कृती आराखडा तयार केला असून, एप्रिल महिन्यात पाणीटंचाईची समस्या वाढत चालल्याने प्रत्यक्ष कामांनाही सुरुवात झाली आहे़ आतापर्यंत ३८ गावांमध्ये नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून, चार गावांमध्ये तात्पुरती पुरक नळ योजनेला मंजुरी देण्यात आली आहे़नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची ६७ लाख ४६ हजार ८२७ रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत़ तर तात्पुरत्या पुरक नळ योजनेसाठी १६ लाख ९९ हजार ६७५ रुपयांच्या कामांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ एकंदर जिल्हा प्रशासनाच्या टंचाई निवारणाच्या कामांना मंजुरी मिळाल्याने यापुढे ग्रामीण भागात तातडीने कामे होवून ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़जिल्ह्यात २४३ कामे सुरूपाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात २४३ कामे सुरू केली आहेत. त्यामध्ये १० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ ५१ ठिकाणी विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत़ विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीची १२३ कामे सुरू झाली आहेत़ नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची ३९ तर तात्पुरत्या पुरक नळ योजनेची ५ आणि नवीन विंधन विहिरींची १५ कामे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली़जिल्हा प्रशासनाची मंजुरीजिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ यापूर्वी घेण्यात आलेल्या विंधन विहिरींचे पाणी खोल गेल्याने आता त्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ अशा परिस्थितीमध्ये गावांत पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नवीन विंधन विहिरी घेण्यास जिल्हा प्रशासनाने एका आदेशान्वये मंजुरी दिली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई