शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

परभणी : टंचाईसाठी ८५ लाखांची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:26 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रशासनाने टंचाईवर मात करण्यासाठी ८५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे मागील काही महिन्यांपासून रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत़

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रशासनाने टंचाईवर मात करण्यासाठी ८५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे मागील काही महिन्यांपासून रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत़परभणी जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे़ भूजल पातळी खालावल्याने अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजना बंद पडल्या़ परिणामी ग्रामस्थांना गावाशेजारी असलेल्या विहिरींमधून पाणी आणावे लागत आहे़ परभणी, पूर्णा, मानवत तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता तेवढी अधिक नसली तरी जिंतूर, पालम आणि गंगाखेड या तीन तालुक्यांमध्ये पाणी समस्या अधिक गंभीर आहे़ त्यामुळे प्रशासनाने देखील जिंतूर, पालम, गंगाखेड या तालुक्यांनाच कामे मंजूर करताना प्राधान्य दिले आहे़ जिल्हा प्रशासनाने २९ कोटी रुपये खर्चाचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे़ मात्र प्रत्यक्षात आराखड्यातील कामांना मंजुरी मिळत नसल्याची ओरड वाढली होती़ जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी तातडीने पावले उचलत आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेल्या कामांना तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे़जिल्हा प्रशासनाने जून महिन्यापर्यंतचा टंचाई कृती आराखडा तयार केला असून, एप्रिल महिन्यात पाणीटंचाईची समस्या वाढत चालल्याने प्रत्यक्ष कामांनाही सुरुवात झाली आहे़ आतापर्यंत ३८ गावांमध्ये नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून, चार गावांमध्ये तात्पुरती पुरक नळ योजनेला मंजुरी देण्यात आली आहे़नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची ६७ लाख ४६ हजार ८२७ रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत़ तर तात्पुरत्या पुरक नळ योजनेसाठी १६ लाख ९९ हजार ६७५ रुपयांच्या कामांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ एकंदर जिल्हा प्रशासनाच्या टंचाई निवारणाच्या कामांना मंजुरी मिळाल्याने यापुढे ग्रामीण भागात तातडीने कामे होवून ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़जिल्ह्यात २४३ कामे सुरूपाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात २४३ कामे सुरू केली आहेत. त्यामध्ये १० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ ५१ ठिकाणी विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत़ विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीची १२३ कामे सुरू झाली आहेत़ नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची ३९ तर तात्पुरत्या पुरक नळ योजनेची ५ आणि नवीन विंधन विहिरींची १५ कामे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली़जिल्हा प्रशासनाची मंजुरीजिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ यापूर्वी घेण्यात आलेल्या विंधन विहिरींचे पाणी खोल गेल्याने आता त्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ अशा परिस्थितीमध्ये गावांत पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नवीन विंधन विहिरी घेण्यास जिल्हा प्रशासनाने एका आदेशान्वये मंजुरी दिली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई