शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ४४० कोटी रुपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:25 IST

यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी १७८३ कोटी ९१ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ ३० सप्टेंबरपर्यंत ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी १७८३ कोटी ९१ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ ३० सप्टेंबरपर्यंत ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे़परभणी हा कृषी व्यवसायावर अवलंबून असलेला जिल्हा आहे़ खरिप हंगामात मिळालेल्या उत्पादनातून शेतकरी आगामी वर्षाचे आर्थिक नियोजन करतात़ त्यामुळे खरीप हंगाम शेतकºयांसाठी आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी आणि खाजगी बँकांच्या माध्यमातून शेतकºयांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते़ या पीक कर्जासाठी शेतकरी मोठ्या आशा लावून असतात़ गतवर्षी जिल्ह्यातील बँकांनी शेतकºयांसाठी उद्दिष्टापेक्षा एक पाऊल पुढे टाकत १०७ टक्के पीककर्ज वाटप केले होते़ त्यामुळे गत खरीप हंगामात पीक कर्जाचा मोठा हातभार शेतकºयांना लाभला होता; परंतु, मागील वर्षी जिल्ह्यात सर्वसाधरण पाऊस झाल्याने जिल्ह्यातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली़ त्यातच ज्या शेतकºयांकडे कापूस पीक उपलब्ध होते़ त्या शेतकºयांच्या कापसावर बोंडअळीने हल्ला चढविला़ त्याचबरोबरच विमा कंपनीनेही शेतकºयांसोबत धोका करून विम्याच्या मदतीपासून वंचित ठेवले़यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १७८३ कोटी ९१ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ यामध्ये ३० सप्टेंबरपर्यंत ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे़ यामध्ये व्यावसायिक बँकांनी २३ हजार ७७७ शेतकºयांना १७८ कोटी ७३ लाख रुपयांचे वाटप केले आहे़ खाजगी बँकांनी २ हजार ३७ शेतकºयांना २७ कोटी ३५ लाखांचे पीक कर्ज उपलब्ध करून दिले़महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १९ हजार ९५४ शेतकºयांना १४५ कोटी ६२ लाख, जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३७ हजार ३१७ शेतकºयांना ८८ कोटी ५७ लाख रुपयांचे वाटप केले आहे़ दरम्यान, या आकडेवारीवरून व्यापाºयांनी बँकांनी शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात आखडता हात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे़ तसेच खरीप हंगाम संपून रबी हंगामाची तयारी जिल्ह्यातील शेतकºयांकडून सुरू आहे; परंतु, अद्यापही बँकांना जिल्ह्याला देण्यात आलेले १७८३ कोटी ९१ लाख रुपयांचे उद्दिष्ट गाठता आलेले नाही़ त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत कुठेतरी या वर्षी बँकांनी शेतकºयांना मदत करण्याऐवजी आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे़कर्जमाफी शेतकºयांच्या मुळावरमहाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये अंमलात आणली़ या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जात आहे, असा मोठा गाजावाजा केला़ त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही करण्यात आले़ शेतकºयांना ग्रामपंचायत, इंटरनेट व मोबाईल संदेशाद्वारे माहितीही देण्यात आली़ त्यामुळे आपले कर्जमाफ झाले या अपेक्षेने शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत चकरा मारत आहेत; परंतु, राज्य शासनाने कर्जमाफी देताना काढलेले ढीगभर अध्यादेश पुढे करून पीक कर्ज देण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ केली जात आहे़ त्यामुळे राज्य शासनाची कर्जमाफी सध्या शेतकºयांच्या मुळावर उठल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी