शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

परभणी : ४४० कोटी रुपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:25 IST

यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी १७८३ कोटी ९१ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ ३० सप्टेंबरपर्यंत ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी १७८३ कोटी ९१ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ ३० सप्टेंबरपर्यंत ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे़परभणी हा कृषी व्यवसायावर अवलंबून असलेला जिल्हा आहे़ खरिप हंगामात मिळालेल्या उत्पादनातून शेतकरी आगामी वर्षाचे आर्थिक नियोजन करतात़ त्यामुळे खरीप हंगाम शेतकºयांसाठी आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी आणि खाजगी बँकांच्या माध्यमातून शेतकºयांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते़ या पीक कर्जासाठी शेतकरी मोठ्या आशा लावून असतात़ गतवर्षी जिल्ह्यातील बँकांनी शेतकºयांसाठी उद्दिष्टापेक्षा एक पाऊल पुढे टाकत १०७ टक्के पीककर्ज वाटप केले होते़ त्यामुळे गत खरीप हंगामात पीक कर्जाचा मोठा हातभार शेतकºयांना लाभला होता; परंतु, मागील वर्षी जिल्ह्यात सर्वसाधरण पाऊस झाल्याने जिल्ह्यातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली़ त्यातच ज्या शेतकºयांकडे कापूस पीक उपलब्ध होते़ त्या शेतकºयांच्या कापसावर बोंडअळीने हल्ला चढविला़ त्याचबरोबरच विमा कंपनीनेही शेतकºयांसोबत धोका करून विम्याच्या मदतीपासून वंचित ठेवले़यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १७८३ कोटी ९१ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ यामध्ये ३० सप्टेंबरपर्यंत ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे़ यामध्ये व्यावसायिक बँकांनी २३ हजार ७७७ शेतकºयांना १७८ कोटी ७३ लाख रुपयांचे वाटप केले आहे़ खाजगी बँकांनी २ हजार ३७ शेतकºयांना २७ कोटी ३५ लाखांचे पीक कर्ज उपलब्ध करून दिले़महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १९ हजार ९५४ शेतकºयांना १४५ कोटी ६२ लाख, जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३७ हजार ३१७ शेतकºयांना ८८ कोटी ५७ लाख रुपयांचे वाटप केले आहे़ दरम्यान, या आकडेवारीवरून व्यापाºयांनी बँकांनी शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात आखडता हात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे़ तसेच खरीप हंगाम संपून रबी हंगामाची तयारी जिल्ह्यातील शेतकºयांकडून सुरू आहे; परंतु, अद्यापही बँकांना जिल्ह्याला देण्यात आलेले १७८३ कोटी ९१ लाख रुपयांचे उद्दिष्ट गाठता आलेले नाही़ त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत कुठेतरी या वर्षी बँकांनी शेतकºयांना मदत करण्याऐवजी आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे़कर्जमाफी शेतकºयांच्या मुळावरमहाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये अंमलात आणली़ या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जात आहे, असा मोठा गाजावाजा केला़ त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही करण्यात आले़ शेतकºयांना ग्रामपंचायत, इंटरनेट व मोबाईल संदेशाद्वारे माहितीही देण्यात आली़ त्यामुळे आपले कर्जमाफ झाले या अपेक्षेने शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत चकरा मारत आहेत; परंतु, राज्य शासनाने कर्जमाफी देताना काढलेले ढीगभर अध्यादेश पुढे करून पीक कर्ज देण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ केली जात आहे़ त्यामुळे राज्य शासनाची कर्जमाफी सध्या शेतकºयांच्या मुळावर उठल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी