शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

परभणी : टंचाईच्या देयकांसाठी ४ कोटी रुपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:48 IST

ग्रामीण भागात निर्माण झालेली पाणी टंचाई शिथील करण्यासाठी जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध उपाययोजनांच्या देयकापोटी विभागीय आयुक्त कार्यालयातून जिल्हा परिषदेला ४ कोटी २३ लाख ३७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या निधीतून टंचाई देयके अदा केली जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ग्रामीण भागात निर्माण झालेली पाणी टंचाई शिथील करण्यासाठी जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध उपाययोजनांच्या देयकापोटी विभागीय आयुक्त कार्यालयातून जिल्हा परिषदेला ४ कोटी २३ लाख ३७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या निधीतून टंचाई देयके अदा केली जाणार आहेत.२०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने आणि मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात परतीचा पाऊसच झाला नसल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. सर्वसाधारणपणे जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात होते. मात्र यावर्षी जिल्हा प्रशासनाला आॅक्टोबर महिन्यापासूनच टंचाईचे नियोजन करावे लागले होते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पाणी टंचाईची तीव्रता अधिक होती. या टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर ते जून या ९ महिन्यांच्या काळात विविध योजना राबविल्या होत्या. त्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहीर, बोअरचे अधिग्रहण, तात्पुरती पूरक पाणीपुरवठा योजना, नळ योजनांची दुरुस्ती आदी योजनांच्या माध्यमातून टंचाईग्रस्त गावांना पाणी उपलब्ध करुन देण्यात आले होते.जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या टंचाई निवारण आराखड्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच सर्वाधिक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. ९ महिन्यांच्या या काळात जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून टंचाईग्रस्त गावांना उपाययोजना करण्यात आल्या.या उपाययोजनांपोटी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे निधीची मागणी केली होती. विभागीय आयुक्त कार्यालयास हा निधी प्राप्त झाला असून, आयुक्त कार्यालयातून येथील जिल्हा परिषदेला ४ कोटी २३ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला हा निधी ४ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला आहे. त्यामुळे टंचाई काळात ज्यांनी कामे केली त्यांची देयके अदा करणे सोयीचे होणार आहे.औरंगाबाद जिल्ह्याला सर्वाधिक निधीच्राज्य शासनाने पाणी टंचाईच्या निवारणासाठी केलेल्या कामांपोटी १८९ कोटी ८६ लाख ९० हजार रुपये विभागीय आयुक्त कार्यालयात मंजूर केले आहेत.च्विभागीय आयुक्त कार्यालयाने या निधीचे जिल्हानिहाय वितरण केले असून, त्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेला सर्वाधिक ८९ कोटी २३ लाख ४८ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.च्त्या खालोखाल बीड जिल्हा परिषदेला ४० कोटी ४६ लाख ६६ हजार रुपये, नांदेड जिल्हा परिषदेला २८ कोटी ९८ लाख ७४ हजार रुपये, उस्मानाबाद जिल्हा परिषदेला १० कोटी ७५ लाख रुपये, परभणी ४ कोटी २३ लाख २७ हजार रुपये आणि हिंगोली जिल्हा परिषदेला ४ कोटी २९ लाख ७६ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.निधीचे तालुकानिहाय वितरण सुरूच्जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला निधी प्राप्त झाल्यानंतर तालुक्यातून आलेल्या मागणीप्रमाणे या निधीचे वितरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.च्प्राप्त झालेला निधी पंचायत समितीनिहाय वर्गीकरण करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी या निधी वितरणास परवानगी देताच तो पंचायत समितींकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळWaterपाणी