शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मुंबईच्या आंदोलकांसाठी परभणीकरांची घरची गोडधोड शिदोरी; ७५ हजार किट्स आंदोलनस्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 19:23 IST

परभणीकर मैदानात! मुंबईतील आंदोलकांसाठी पाठवल्या घरच्या शिदोरीच्या ७५ हजार किट्स

परभणी : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाला जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या बांधवांच्या जेवण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी परभणी जिल्ह्याने एकजुटीचे दर्शन घडवले. सोमवारी पहाटे परभणीतून रवाना झालेले चार टन जेवणाचे साहित्याच्या ७५ हजार किट्स दोन ट्रकमधून आझाद मैदानावर पोहोचल्या.

जिल्ह्यातील समाजबांधवांनी जबाबदारीची भावना जपत आंदोलनकर्त्यांसाठी आवश्यक शिदोरी उपलब्ध करून दिली. भाकरी, ठेचा, चटणी, लोणचं, कांदा, तसेच सणासुदीचे गोडधोड पदार्थ यात समाविष्ट असल्याने आंदोलनकर्त्यांना घरगुती जेवणाचा आस्वाद मिळाला. या साहित्यामुळे उपोषणस्थळी गेल्या चार दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या मराठा बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. २९ ऑगस्टपासून मुंबईत सुरू झालेल्या या उपोषणासाठी परभणी जिल्ह्यातील युवकांनी २७ ऑगस्टपासूनच आंतरवली सराटीकडे कूच सुरू केली. त्यानंतर दररोज हजारो वाहनांमधून मराठा समाजबांधव मुंबईत पोहोचू लागले. गणेशोत्सव आणि महालक्ष्मीच्या सणाच्या दिवसांतही समाजातील तरुणांनी सणाला दुय्यम स्थान देत लाखोंच्या संख्येने आझाद मैदानावर ठिय्या दिला आहे. १ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव आंदोलनस्थळी दाखल झाले असून, या लढ्याला भक्कम ताकद मिळाली आहे.

समाजाच्या एकतेचे दर्शनआंदोलनकर्त्यांची शिदोरीसाठी परभणीत खास मदत कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयातून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आले की, “प्रत्येक घरातून दहा भाकऱ्या, ठेचा, चटणी, कांदा, लोणचं आणि सणासाठी गोडधोड कार्यालयात जमा करावे.” या आवाहनाला जिल्ह्याच्या काेनाकोपऱ्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. काही तासांतच प्रचंड प्रमाणात साहित्य जमा झाले. परभणीकरांनी पुन्हा एकदा आपली उदारता सिद्ध केली आणि समाजाच्या एकतेचे दर्शन घडवले.

दोन ट्रकमधून सोमवारी पोहोचले मुंबईतजमा झालेल्या साहित्याचे नियोजन करून कार्यकर्त्यांनी पद्धतशीर तयारी केली. भाकरी, चटणी, लोणचं, कांदा आणि गोडधोड यांचे मिश्रण करून ७५ हजार किट्स तयार करण्यात आल्या. या किट्स रविवारी उशिरा रात्री दोन मोठ्या ट्रकमधून मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. सोमवारी पहाटे हे ट्रक आझाद मैदानावर दाखल झाले आणि आंदोलनकर्त्यांच्या हाती जेवणाच्या पिशव्या पोहोचल्या.

समाजमाध्यमातही आरक्षणाचाच बोलबालादरम्यान, जिल्ह्यातील अनेक गावे व शहरांतून अजूनही मराठा बांधव मुंबईकडे रवाना होत आहेत. सोशल मीडियावरूनही जिल्ह्यातील तरुण शासनावर दबाव आणत आहेत. फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूब आणि विविध डिजिटल माध्यमांतून आंदोलनाचे फोटो व व्हिडीओ शेअर करून आरक्षणाच्या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणparabhaniपरभणी