शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परभणी : लोकप्रतिनिधींना डावलून प्रशासनाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:24 IST

दुष्काळामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न गंभीर होत असताना प्रशासनातील अधिकारी मात्र लोकप्रतिनिधींना डावलून काम करीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुष्काळामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न गंभीर होत असताना प्रशासनातील अधिकारी मात्र लोकप्रतिनिधींना डावलून काम करीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले़जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत सोमवारी स्थायी समितीची बैठक झाली़ यावेळी जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, कृषी सभापती श्रीनिवास मुंडे, महिला व बालकल्याण सभापती राधाताई सूर्यवंशी, समाजकल्याण सभापती उर्मिलाताई बनसोडे आदींची उपस्थिती होती़ यावेळी चर्चे दरम्यान, शिवसेनेचे जि़प़ सदस्य विष्णू मांडे यांनी मानवत तालुक्यात प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींना डावलून काम सुरू असल्याचा आरोप केला़ जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई आढावा बैठका घेण्यात आल्या; परंतु, मानवतला बैठक घेण्यात आली नाही़ एवढेच नव्हे तर पाणीटंचाईचा आराखडाही लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पाठविण्यात आला़ पाणीटंचाईचा प्रश्न संवेदनशील आहे़ त्यामुळे याबाबतची जाण आम्हालाही आहे; परंतु, लोकप्रतिनिधींना कोणतीही कल्पना न देता ग्रामसेवक चुकीची माहिती वरिष्ठांना देत आहेत़ विशेष म्हणजे ८ ते १५ दिवसांत कधी तरी ग्रामसेवक गावांत येतात़ अशावेळी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना आम्हाला सामोरे जावे लागते़ त्यामुळे प्रशासनाची ही भूमिका अयोग्य आहे़, असेही यावेळी मांडे म्हणाले़ यावर शिवसेनेचे सदस्य राम खराबे यांनी सेलूतील बैठकीला आपणासही बोलावण्यात आले नाही, असे सांगितले़ यावेळी सीईओ बी़ पी़ पृथ्वीराज यांनी प्रशासनाकडून यापुढे काळजी घेतली जाईल, असे सांगितले़ यावेळी सिंचन विभागातील प्रभारी उपअभियंता टने हे १९९५ पासून एकाच जागेवर जिल्हा परिषदेत ठाण मांडून आहेत़ तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी त्यांची जिंतूर येथे बदली केली होती़ काही दिवसच त्यांनी जिंतूर येथे काम केले व पुन्हा ते जिंतूर येथे नियुक्ती असताना परभणीत काम करीत आहेत़ त्यांचे हे लाड कशासाठी प्रशासन करीत आहे? असा सवाल करून सेलू, मानवत, जिंतूर व पाथरी तालुक्यातील शेतकºयांची ते अडवणूक करीत आहेत, असा आरोपही यावेळी विरोधी सदस्यांनी केला़ टने यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली़ यावेळी अन्य काही मुद्यांवर चर्चा करण्यात आली़बुधवारी सर्वसाधारण सभा४जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी २ वाजता जि़प़च्या सभागृहात होणार आहे़ गेल्या वेळी ही सभा प्रमुख अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित नसल्याने तहकूब करण्यात आली होती़ आता बुधवारी ही सभा होणार असल्याने या सभेत अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार असल्याचे समजते़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीParbhani z pपरभणी जिल्हा परिषदShiv Senaशिवसेना