शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणी: बँकांकडून होतेय व्याजाची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू (परभणी): केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांची अर्धवट पीक कर्ज माफी केली. त्यातच भरीस भर ...

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांची अर्धवट पीक कर्ज माफी केली. त्यातच भरीस भर म्हणून पीककर्ज माफीच्या रक्कमेवरील व्याजाची वसुली शेतकऱ्यांकडून बँका करीत असल्याने दुष्काळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले असल्याची परिस्थिती तालुक्यात दिसून येत आहे.शहरातील स्टेट बॅक आॅफ इंडिया या शाखेने शेतकºयांनी घेतलेल्या ुपीक कर्जावरील व्याजाच्या वसुलीचा सपाटा लावला आहे. शासनस्तरावरून पीककर्ज वसुलीस स्थगिती दिली असतानाही बँक प्रशासन मनमानी कारभार करीत आहे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करुन कर्जमाफीसाठी शेतकºयांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले होते. त्यामध्ये पात्र शेतकºयांना कर्जमाफीचे संदेश बँक तसेच शासनस्तरावरुन पाठविण्यात आले होते. मात्र ही योजना कुचकामी ठरली असल्याने अनेक शेतकरी कर्ज माफीपासून वंचीत राहीले आहेत. मात्र अनेक शेतकºयांची नावे कर्जमाफीच्या यादीमध्ये असतांना देखील बँकेच्या वतीने पीक कर्जमाफीसाठी रक्कमेवर व्याज आकारणी केली जात आहे. सध्या तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात सापडला आहे. सद्य स्थितीत व्याजाची रक्कम भरणा करण्या इतपत पैसा शेतकºयांकडे नसल्याने ते भरणा करुन शकत नाहीत. त्यामध्ये बँकांनी वसुली करण्याचे आडमुठे धोरण अवंलबिले असल्याने शेतकºयांना पीक कर्जापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ही व्याज आकारणी तत्काळ थांबविण्याची मागणी लाभार्थी शेतकºयातून होत आहे.शेतकºयांची तहसील प्रशासनाकडे धावसध्या तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रबी व खरीप हंगामात शेतकºयांना उत्पन्न मिळाले नाही. परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असतानाच बँकांकडून शेतकºयांच्या कर्जमाफीच्या रकमेवरील व्याज वसुल करणे सुरू आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार तत्काळ बंद करावा, अशी मागणी सेलू तालुक्यातील गोगलगाव येथील शेतकरी सुरेश मगर यांनी तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकारFarmerशेतकरीbankबँक