शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

परभणी: जिल्ह्याला मिळाली ८५६ कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:50 IST

: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्याला ८५६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून, दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेंतर्गत रक्कम भरण्यासाठी ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्याला ८५६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून, दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेंतर्गत रक्कम भरण्यासाठी ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़२००९-१० पासून जिल्ह्यामध्ये कधी दुष्काळी तर कधी नापिकी परिस्थिती ओढावत आहे़ त्यामुळे उसणवारी करून व बँकांकडूनपीक कर्ज मिळवून दरवर्षी शेतकरी रबी व खरीप हंगामामध्ये पेरणी करीत आहे़ पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती कवडीचेही उत्पन्न लागत नाही़ परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे़ त्याचबरोबर बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाचा डोंगरही त्याच्या डोक्यावर वाढत आहे़त्यामुळे बँकांनी पीक कर्ज देण्यास आखडता हात घेतला़ त्यानंतर शेतकºयाचे पीककर्ज माफ करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना व शेतकºयांकडून करण्यात आली़ या मागणीचा विचार करून राज्य शासनाने कर्जमाफी योजनेची घोषणा केली़ त्यानुसार २००९-१० पासून सततच्या दुष्काळ व नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी २४ जून २०१७ च्या मंत्रीमंडळ बैठकीत या कर्जमाफी योजनेला मान्यता देण्यात आली़२८ जून २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ ची घोषणा करण्यात आली़ या योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह लाभार्थी शेतकºयांचे दीड लाख रुपये कर्ज माफ करण्याचे ठरविण्यात आले़ त्याचबरोबर ज्या शेतकºयांची दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे, त्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता योजनाही अंमलात आणली़ त्यानुसार दीड लाखांपेक्षा अधिक असलेले कर्ज भरल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत पात्र असलेल्या शेतकºयांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम ३० जून २०१९ पर्यंत बँकेत जमा करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपुष्टात येत असल्याने यामध्ये राज्य शासनाने वाढ केली आहे़त्यानुसार आता ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत या योजनेचा संबधितांना लाभ घेता येणार आहे़ त्यामुळे शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान चार महिन्यांचा अवधी शिल्लक आहे़बँकनिहाय पात्र ठरलेले लाभार्थी शेतकरी४छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अलहाबाद बँकेने आतापर्यंत ३ हजार ६१३ शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग केली आहे़ त्याचबरोबर अंध्रा बँकेने १ हजार २८१, अ‍ॅक्सीस बँकेने ३३ शेतकरी, बँक आॅफ बडोदा १ हजार ७५४, बँक आॅफ इंडिया १ हजार ७०२, बँक आॅफ इंडिया ८ हजार ९६०, कॅनरा बँक ९४२, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ६२२, देना बँक २ हजार १५७, एचडीएफसी ३३६, आयसीआयसीआय १५, आयडीबीआय ३९६ शेतकºयांना लाभ दिला आहे़४इंडियन ओव्हरसीस बँक ३३८, पंजाब नॅशनल बँक १५१, सर्वाधिक स्टेट बँक आॅफ इंडिया ७८ हजार ४३८, सिंडीकेट २७९, युको १ हजार ३८०, युनियन बँक आॅफ इंडिया ९०५, सर्वात कमी विजया बँकेने एका शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ दिला आहे़ त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २२ हजार २११ तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने २७ हजार २३२ अशा एकूण १ लाख ५२ हजार ७४६ शेतकºयांच्या खात्यावर ८५६ कोटी १६ लाख ३१ हजार ३०८ रुपयांची रक्कम वर्ग केली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज