शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
3
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
4
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
5
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
6
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
7
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
8
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
9
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
10
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
11
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
12
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
13
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
14
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
15
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
16
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
17
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
18
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
19
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
20
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?

परभणी: जिल्ह्याला मिळाली ८५६ कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:50 IST

: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्याला ८५६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून, दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेंतर्गत रक्कम भरण्यासाठी ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्याला ८५६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून, दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेंतर्गत रक्कम भरण्यासाठी ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़२००९-१० पासून जिल्ह्यामध्ये कधी दुष्काळी तर कधी नापिकी परिस्थिती ओढावत आहे़ त्यामुळे उसणवारी करून व बँकांकडूनपीक कर्ज मिळवून दरवर्षी शेतकरी रबी व खरीप हंगामामध्ये पेरणी करीत आहे़ पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती कवडीचेही उत्पन्न लागत नाही़ परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे़ त्याचबरोबर बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाचा डोंगरही त्याच्या डोक्यावर वाढत आहे़त्यामुळे बँकांनी पीक कर्ज देण्यास आखडता हात घेतला़ त्यानंतर शेतकºयाचे पीककर्ज माफ करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना व शेतकºयांकडून करण्यात आली़ या मागणीचा विचार करून राज्य शासनाने कर्जमाफी योजनेची घोषणा केली़ त्यानुसार २००९-१० पासून सततच्या दुष्काळ व नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी २४ जून २०१७ च्या मंत्रीमंडळ बैठकीत या कर्जमाफी योजनेला मान्यता देण्यात आली़२८ जून २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ ची घोषणा करण्यात आली़ या योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह लाभार्थी शेतकºयांचे दीड लाख रुपये कर्ज माफ करण्याचे ठरविण्यात आले़ त्याचबरोबर ज्या शेतकºयांची दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे, त्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता योजनाही अंमलात आणली़ त्यानुसार दीड लाखांपेक्षा अधिक असलेले कर्ज भरल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत पात्र असलेल्या शेतकºयांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम ३० जून २०१९ पर्यंत बँकेत जमा करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपुष्टात येत असल्याने यामध्ये राज्य शासनाने वाढ केली आहे़त्यानुसार आता ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत या योजनेचा संबधितांना लाभ घेता येणार आहे़ त्यामुळे शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान चार महिन्यांचा अवधी शिल्लक आहे़बँकनिहाय पात्र ठरलेले लाभार्थी शेतकरी४छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अलहाबाद बँकेने आतापर्यंत ३ हजार ६१३ शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग केली आहे़ त्याचबरोबर अंध्रा बँकेने १ हजार २८१, अ‍ॅक्सीस बँकेने ३३ शेतकरी, बँक आॅफ बडोदा १ हजार ७५४, बँक आॅफ इंडिया १ हजार ७०२, बँक आॅफ इंडिया ८ हजार ९६०, कॅनरा बँक ९४२, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ६२२, देना बँक २ हजार १५७, एचडीएफसी ३३६, आयसीआयसीआय १५, आयडीबीआय ३९६ शेतकºयांना लाभ दिला आहे़४इंडियन ओव्हरसीस बँक ३३८, पंजाब नॅशनल बँक १५१, सर्वाधिक स्टेट बँक आॅफ इंडिया ७८ हजार ४३८, सिंडीकेट २७९, युको १ हजार ३८०, युनियन बँक आॅफ इंडिया ९०५, सर्वात कमी विजया बँकेने एका शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ दिला आहे़ त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २२ हजार २११ तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने २७ हजार २३२ अशा एकूण १ लाख ५२ हजार ७४६ शेतकºयांच्या खात्यावर ८५६ कोटी १६ लाख ३१ हजार ३०८ रुपयांची रक्कम वर्ग केली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज