शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : तालुक्यात बहरलेल्या पिकांना पावसाची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 23:34 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ६ हजार ३३० हेक्टर क्षेत्रावर तालुका कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले होते़ तालुक्यात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर १ लाख ४ हजार ४१६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे़ पेरणी केलेली पिके पूर्णपणे बहरात आहेत़ या पिकांना सध्या पावसाची नितांत गरज आहे; परंतु, पावसाळा सुरू होवून अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे़ या महिन्यातील पाऊस पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढविणाराच आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ६ हजार ३३० हेक्टर क्षेत्रावर तालुका कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले होते़ तालुक्यात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर १ लाख ४ हजार ४१६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे़ पेरणी केलेली पिके पूर्णपणे बहरात आहेत़ या पिकांना सध्या पावसाची नितांत गरज आहे; परंतु, पावसाळा सुरू होवून अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे़ या महिन्यातील पाऊस पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढविणाराच आहे़परभणी तालुक्यात सर्वसाधारणपणे नगदी पीक म्हणून ओळखले जाणाºया कापूस व सोयाबीन पिकांची सर्वाधिक पेरणी केली जाते़ काळ्या मातीने सुजलाम् सुफलाम असलेला हा तालुका सिंचनात मागे पडलेला आहे़ या तालुक्यातून दूधना, पूर्णा या प्रमुख नद्या प्रवाही आहेत; परंतु, गतवर्षी दुष्काळामुळे हिवाळ्यात या नद्यांचे पात्र कोरडेठाक पडले़ परभणी जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या निम्न दूधना प्रकल्पातून या दोन्ही उपद्यांच्या पात्रात पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे यावर्षीच्या जूनपर्यंत नदीकाठावरील ग्रामस्थांची तहान व काही प्रमाणात सिंचनाचा प्रश्न मिटला़यावर्षी खरीप हंगामात शेतकºयांनी तालुक्यात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर पेरणी करण्यास सुरुवात केली़ ५ आॅगस्टपर्यंत तालुका कृषी विभागाने नियोजन केलेल्या १ लाख ६ हजार ३३० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ४ हजार ४१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली़ यामध्ये तूर १२ हजार ५५८, मूग ५३ हजार ५७ हेक्टर, उडीद ६ हजार ३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ त्याचबरोबर सोयाबीन ४८ हजार २५७, कापूस ३७ हजार ४४२ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आला आहे़ पेरणी केलेली पिके कमी अधिक पावसावर बहरली आहेत़ कापसाची चांगली वाढ झाली आहे तर सोयाबीन पीक शेंगा व फुल लागण्याच्या अवस्थेत आहे़ या पिकांना सध्या पावसाची नितांत आवश्यकता आहे; परंतु, मागील आठ दिवसांत तालुक्यात पावसाचा एक थेंबही बरसला नाही़ त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांची पिके जरी चांगली असली तरी पावसाची प्रतीक्षा मात्र पावसाळा सुरू होवून अडीच महिन्यानंतरही कायम आहे़ त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांच्या नजरा दमदार पावसासाठी आकाशाकडे लागल्या आहेत़सिंचनासोबत जनावरांच्या चाºयाचा प्रश्न ऐरणीवरपरभणी तालुक्याची पावसाची सरासरी ८६२़६० मिमी आहे़ १ जूनपासून ते १६ आॅगस्टपर्यंत तालुक्यात केवळ २४५़४६ मिमी पाऊस झाला आहे़ टक्केवारीच्या तुलनेत तालुक्यात आजपर्यंत ४८़ ६० टक्के पाऊस होणे अपेक्षित होते; परंतु, १७ आॅगस्टपर्यंत तालुक्यात केवळ ३०़६ टक्के पाऊस झाला आहे़ त्यामुळे पावसाळ्याचे अडीच महिने संपले तरीही १८ टक्के पाऊस कमी झाला आहे़ त्यामुळे तालुक्यात शेती सिंचनाबरोबराच जनावरांच्या चाºयाचा व तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ त्याचबरोबर मध्यम लघु प्रकल्पासह दूधना व पूर्णा या प्रवाही नद्यांच्या पात्रातही एक थेंब पाणी नाही़ उरलेल्या दोन महिन्यांत पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावली तरच हे प्रश्न निकाली निघणार आहेत़ अन्यथा तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी