शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परभणी: विजांच्या कडकडाटासह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:44 IST

जिल्ह्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाल्याने हळद, ज्वारी इ. पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाल्याने हळद, ज्वारी इ. पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले.वादळी वाºयासह विजांचा कडकडाट व गारांचा पाऊस झाल्याने ग्रामस्थांची मोठी धावपळ झाली. मंगळवारी रात्री वातावरणामध्ये अचानक बदल होऊन पावसाला सुरूवात झाली. अनेक ठिकाणी गारांचा पाऊसही झाल्याची माहिती समोर आली आहे. जिंतूर तालुक्यातील येलदरी परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने हळदीच्या पिकासह आंब्याचे नुकसान झाले. बुधवारी सकाळी दिवसभर ढगाळ वातावरण होते.सेलू शहरासह परिसरात मंगळवारी रात्री ७.३० वाजता पाऊस झाला. त्याचबरोबर देवगावफाटा येथेही १५ मिनिटे वाºयासह पाऊस झाल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले. मानवत शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. तालुक्यात कोठेही नुकसान झाले नसल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. सोनपेठमध्ये मंगळवारी सकाळी १० मिनिटे पाऊस झाला. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.बामणी परिसर : नऊ गावे २४ तासांपासून अंधारातबामणी- बामणी व परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे नऊ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, २४ तासांपासून ही गावे अंधारात आहेत.मंगळवारच्या वादळी वाºयामध्ये बामणी व सावंगी भांबळे येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. बामणी, संक्राळा, कोलपा, कोरवाडी, कुंभेफळ, सावंगी, धमधम, असोला, कावी आदी गावांत विद्युत खांब कोसळले तसेच तारा तुटल्या आहेत.जखमी वृद्धाचा मृत्यूसावंगीत परमेश्वर भांबळे, दिलीप खाडे, नारायण खाडे, शिवाजी खाडे, सोपान खाडे, कमलाबाई खरात यांच्या घरांच्या भितीला तडे जाऊन भिंती पडल्या. या घटनेत सावंगी भांबळे येथील ग्यानोजी मोरे (७०) हे पत्र्यावरून पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना मंगळवारी रात्री उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते; परंतु, १७ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला.शहापूरमध्ये २० मिनिटे गारपीटपरभणी- तालुक्यातील शहापूूर येथे मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. या पावसामध्ये सलग २० मिनिटे गारा पडल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची चांगलीच धांदल उडाली.दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून सोसाट्याच्या वादळी वाºयासह विजांचा कडकडाट होत आहे. त्यातच मंगळवारी रात्री झालेल्या पावसामध्ये शहापूर येथे २० मिनिटे गारा पडल्या.या गारांमुळे शहापूर व परिसरातील हळद, ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. या पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस