शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

परभणी: विजांच्या कडकडाटासह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:44 IST

जिल्ह्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाल्याने हळद, ज्वारी इ. पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाल्याने हळद, ज्वारी इ. पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले.वादळी वाºयासह विजांचा कडकडाट व गारांचा पाऊस झाल्याने ग्रामस्थांची मोठी धावपळ झाली. मंगळवारी रात्री वातावरणामध्ये अचानक बदल होऊन पावसाला सुरूवात झाली. अनेक ठिकाणी गारांचा पाऊसही झाल्याची माहिती समोर आली आहे. जिंतूर तालुक्यातील येलदरी परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने हळदीच्या पिकासह आंब्याचे नुकसान झाले. बुधवारी सकाळी दिवसभर ढगाळ वातावरण होते.सेलू शहरासह परिसरात मंगळवारी रात्री ७.३० वाजता पाऊस झाला. त्याचबरोबर देवगावफाटा येथेही १५ मिनिटे वाºयासह पाऊस झाल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले. मानवत शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. तालुक्यात कोठेही नुकसान झाले नसल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. सोनपेठमध्ये मंगळवारी सकाळी १० मिनिटे पाऊस झाला. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.बामणी परिसर : नऊ गावे २४ तासांपासून अंधारातबामणी- बामणी व परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे नऊ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, २४ तासांपासून ही गावे अंधारात आहेत.मंगळवारच्या वादळी वाºयामध्ये बामणी व सावंगी भांबळे येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. बामणी, संक्राळा, कोलपा, कोरवाडी, कुंभेफळ, सावंगी, धमधम, असोला, कावी आदी गावांत विद्युत खांब कोसळले तसेच तारा तुटल्या आहेत.जखमी वृद्धाचा मृत्यूसावंगीत परमेश्वर भांबळे, दिलीप खाडे, नारायण खाडे, शिवाजी खाडे, सोपान खाडे, कमलाबाई खरात यांच्या घरांच्या भितीला तडे जाऊन भिंती पडल्या. या घटनेत सावंगी भांबळे येथील ग्यानोजी मोरे (७०) हे पत्र्यावरून पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना मंगळवारी रात्री उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते; परंतु, १७ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला.शहापूरमध्ये २० मिनिटे गारपीटपरभणी- तालुक्यातील शहापूूर येथे मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. या पावसामध्ये सलग २० मिनिटे गारा पडल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची चांगलीच धांदल उडाली.दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून सोसाट्याच्या वादळी वाºयासह विजांचा कडकडाट होत आहे. त्यातच मंगळवारी रात्री झालेल्या पावसामध्ये शहापूर येथे २० मिनिटे गारा पडल्या.या गारांमुळे शहापूर व परिसरातील हळद, ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. या पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस