शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

परभणी : पूर्णा नदीचे पात्र पडले कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:09 IST

जिंतूर तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाखाली बांधलेल्या तिन्ही बंधाऱ्यांतील पाणीसाठा संपल्याने नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी परिसरातील गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाखाली बांधलेल्या तिन्ही बंधाऱ्यांतील पाणीसाठा संपल्याने नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी परिसरातील गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.येलदरी धरणातून तीन जिल्ह्यांमधील शहरी व ग्रामीण भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी धरण परिसरातच टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. येलदरी धरणाखाली तीन बंधारे बांधले असून या बंधाºयात एप्रिल महिन्यापर्यंत पाणीसाठा राहतो.मात्र यावर्षी बंधाºयातील पाणी नोव्हेंबरमध्येच संपले आहे. परिणामी नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे या भागातील सावळी, घडोळी, हिवरखेडा, केहाळ, चिंचखेडा, आमदरी, ब्रह्मवाडी, सावंगी म्हाळसा आदी गावांमधील शेतकरी, ग्रामस्थ अडचणीत सापडले आहेत. जनावरांच्या चाºयाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.पाणवटे, ओढे, नदीतील डोह आटल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.दरम्यान, जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चाºयासाठी येलदरी धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांतून केली गेली आहे.या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदनही देण्यात आले आहे.येलदरी धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने परिसरात खरीप आणि रबीच्या पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.जनावरे कशी जगवावीत, असा प्रश्न पशुपालकांसमोर असून येलदरी प्रकल्पातून टप्प्या टप्प्याने १२ दलघमी पाणी पूर्णा नदीत सोडावे, अशी मागणी शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीWaterपाणी