शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

परभणी-पुणे 'जलद' रेल्वे धावणार ताशी २७ किलोमीटरने; धीम्यागतीमुळे प्रवाशांमध्ये संताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 13:53 IST

रेल्वे विभागाने प्रवासाचा अवधी १५ तासांवर नेवून पोहचविल्याने परभणीसह नांदेड व या मार्गावरील प्रवाशांच्या गैरसोयीत भर घातली आहे़ 

ठळक मुद्दे रेल्वे गाड्यांचा वेग तासी ६० किमी आहे़ हा वेग प्रतितास वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत मराठवाड्यातील प्रवाशांना मात्र तासी २७ किमी या वेगाने पुणे गाठावे लागणार आहे़ ५५६ किमी अंतरासाठी १५ तास मोजावे लागणार असून, यामुळे रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा होणार आहे़

परभणी : एकीकडे जग गतीमान होत असताना दुसरीकडे दक्षिण-मध्य रेल्वेने त्याच अंतरासाठी जास्तीचे तास देऊन मराठवाड्यातील प्रवाशांवर अन्यायाची भूमिका सुरूच ठेवली आहे़ नांदेड ते पुणे हे ११ तासांचे अंतर असताना रेल्वे विभागाने ते १५ तासांवर नेवून पोहचविल्याने परभणीसह नांदेड व या मार्गावरील प्रवाशांच्या गैरसोयीत भर घातली आहे़ 

दक्षिण-मध्य रेल्वे विभागाकडून मराठवाड्यावर वारंवार अन्याय केला जात आहे़ नांदेडहून पुण्यासाठी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात लूझ टाईम दिला जात आहे़ हा लूझ टाईम  कमी करावा, अशी मागणी होत असताना तो वाढविण्यात आला आहे़ नांदेड ते पुणे हे ५५६ किमीचे अंतर असून, या अंतरासाठी जलद रेल्वेला ११ तासांचा वेळ निर्धारित केला आहे; परंतु, तो आता १५ तासांवर पोहचला असल्याची माहिती मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने दिली आहे़ 

२००५-०६ मध्ये नांदेड-पुणे लातूरमार्गे ११ तासांचा प्रवास निर्धारित करण्यात आला़ त्यानंतर हळूहळू या गाडीला लूझ टाईम वाढविण्यात आला़ १२ तास, १३ आणि आता तर चक्क १५ तास निर्धारित करण्यात आले आहेत़ लातूर रोड ते नांदेड हे १८९ किमी अंतर गाठण्यासाठी ७ तास लागणार आहेत. लातूर रोड ते परळी या ६३ किमीसाठी ३ तास १० मिनिटे लागणार आहेत़ केवळ खाजगी ट्रॅव्हल्स मालकांच्या फायद्यासाठी  हा प्रकार केला जात असल्याचा आरोपही मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे़ गंगाखेड येथून पुण्याला तीन ट्रॅव्हल्स धावतात तसेच एसटी बसची सुविधाही आहे़ नांदेड-पनवेल या रेल्वेला गंगाखेड येथे थांबा देण्याचे टाळले जात आहे़ वारंवार मागणी करूनही या ठिकाणी थांबा दिला जात नाही़ 

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे गाड्यांचा वेग वाढवून प्रवाशांची सुविधा करण्याचे धोरण निश्चित केले असताना दुसरीकडे मात्र नांदेड विभागातील रेल्वे गाड्यांवर सातत्याने अन्याय केला जात आहे़ खाजगी ट्रॅव्हल्स चालकांचे हित जोपासण्याचे धोरण अवलंबिले जात असून, या प्रकाराचा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने निषेध नोंदविला आहे़ महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा़ सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डॉ़ राजगोपाल कालानी, रविंद्र मुथा, संभानाथ काळे, श्रीकांत गडप्पा, प्रवीण थानवी, सुनील जोशी, दिलीपराव दुधाटे, नयना गुप्ता, अनिल देसाई, हर्षद शहा, शंतनु डोईफोडे, उमाकांत जोशी, किरण चिद्रवार, अमीत कासलीवार, रवि रोडे, ओमसिंग ठाकूर, चंदूलाल बियानी आदींनी रेल्वे प्रशासनाच्या धोरणावर टीका केली आहे़ 

तासी २७ किमीने धावणार जलद गाडीमराठवाडा विभाागात सर्वसाधारणपणे रेल्वे गाड्यांचा वेग तासी ६० किमी आहे़ हा वेग प्रतितास वाढविण्यासाठी प्रयत्न होत असताना मराठवाड्यातील प्रवाशांना मात्र तासी २७ किमी या वेगाने पुणे गाठावे लागणार आहे़ ५५६ किमी अंतरासाठी १५ तास मोजावे लागणार असून, यामुळे रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा होणार आहे़ पुण्याबरोबरच लातूर रोड ते नांदेड या अंतरासाठी ७ तास तर लातूर रोड ते परळी अंतरासाठी ३ तास १० मिनिटे एवढा वेळ खर्ची घालावा लागणार आहे़ विशेष म्हणजे भाडेही वाढविण्यात आले आहे़ रेल्वेच्या स्लिपर टिकीटासाठी २८५ रुपयांऐवजी आता ३७५ रुपये म्हणजे एका तिकीटामागे ९० रुपयांचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागणार आहे़ विशेष गाड्यांच्या नावावर प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी महासंघाने केला आहे

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीparabhaniपरभणी