शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

परभणी-पुणे 'जलद' रेल्वे धावणार ताशी २७ किलोमीटरने; धीम्यागतीमुळे प्रवाशांमध्ये संताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 13:53 IST

रेल्वे विभागाने प्रवासाचा अवधी १५ तासांवर नेवून पोहचविल्याने परभणीसह नांदेड व या मार्गावरील प्रवाशांच्या गैरसोयीत भर घातली आहे़ 

ठळक मुद्दे रेल्वे गाड्यांचा वेग तासी ६० किमी आहे़ हा वेग प्रतितास वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत मराठवाड्यातील प्रवाशांना मात्र तासी २७ किमी या वेगाने पुणे गाठावे लागणार आहे़ ५५६ किमी अंतरासाठी १५ तास मोजावे लागणार असून, यामुळे रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा होणार आहे़

परभणी : एकीकडे जग गतीमान होत असताना दुसरीकडे दक्षिण-मध्य रेल्वेने त्याच अंतरासाठी जास्तीचे तास देऊन मराठवाड्यातील प्रवाशांवर अन्यायाची भूमिका सुरूच ठेवली आहे़ नांदेड ते पुणे हे ११ तासांचे अंतर असताना रेल्वे विभागाने ते १५ तासांवर नेवून पोहचविल्याने परभणीसह नांदेड व या मार्गावरील प्रवाशांच्या गैरसोयीत भर घातली आहे़ 

दक्षिण-मध्य रेल्वे विभागाकडून मराठवाड्यावर वारंवार अन्याय केला जात आहे़ नांदेडहून पुण्यासाठी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात लूझ टाईम दिला जात आहे़ हा लूझ टाईम  कमी करावा, अशी मागणी होत असताना तो वाढविण्यात आला आहे़ नांदेड ते पुणे हे ५५६ किमीचे अंतर असून, या अंतरासाठी जलद रेल्वेला ११ तासांचा वेळ निर्धारित केला आहे; परंतु, तो आता १५ तासांवर पोहचला असल्याची माहिती मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने दिली आहे़ 

२००५-०६ मध्ये नांदेड-पुणे लातूरमार्गे ११ तासांचा प्रवास निर्धारित करण्यात आला़ त्यानंतर हळूहळू या गाडीला लूझ टाईम वाढविण्यात आला़ १२ तास, १३ आणि आता तर चक्क १५ तास निर्धारित करण्यात आले आहेत़ लातूर रोड ते नांदेड हे १८९ किमी अंतर गाठण्यासाठी ७ तास लागणार आहेत. लातूर रोड ते परळी या ६३ किमीसाठी ३ तास १० मिनिटे लागणार आहेत़ केवळ खाजगी ट्रॅव्हल्स मालकांच्या फायद्यासाठी  हा प्रकार केला जात असल्याचा आरोपही मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे़ गंगाखेड येथून पुण्याला तीन ट्रॅव्हल्स धावतात तसेच एसटी बसची सुविधाही आहे़ नांदेड-पनवेल या रेल्वेला गंगाखेड येथे थांबा देण्याचे टाळले जात आहे़ वारंवार मागणी करूनही या ठिकाणी थांबा दिला जात नाही़ 

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे गाड्यांचा वेग वाढवून प्रवाशांची सुविधा करण्याचे धोरण निश्चित केले असताना दुसरीकडे मात्र नांदेड विभागातील रेल्वे गाड्यांवर सातत्याने अन्याय केला जात आहे़ खाजगी ट्रॅव्हल्स चालकांचे हित जोपासण्याचे धोरण अवलंबिले जात असून, या प्रकाराचा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने निषेध नोंदविला आहे़ महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा़ सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डॉ़ राजगोपाल कालानी, रविंद्र मुथा, संभानाथ काळे, श्रीकांत गडप्पा, प्रवीण थानवी, सुनील जोशी, दिलीपराव दुधाटे, नयना गुप्ता, अनिल देसाई, हर्षद शहा, शंतनु डोईफोडे, उमाकांत जोशी, किरण चिद्रवार, अमीत कासलीवार, रवि रोडे, ओमसिंग ठाकूर, चंदूलाल बियानी आदींनी रेल्वे प्रशासनाच्या धोरणावर टीका केली आहे़ 

तासी २७ किमीने धावणार जलद गाडीमराठवाडा विभाागात सर्वसाधारणपणे रेल्वे गाड्यांचा वेग तासी ६० किमी आहे़ हा वेग प्रतितास वाढविण्यासाठी प्रयत्न होत असताना मराठवाड्यातील प्रवाशांना मात्र तासी २७ किमी या वेगाने पुणे गाठावे लागणार आहे़ ५५६ किमी अंतरासाठी १५ तास मोजावे लागणार असून, यामुळे रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा होणार आहे़ पुण्याबरोबरच लातूर रोड ते नांदेड या अंतरासाठी ७ तास तर लातूर रोड ते परळी अंतरासाठी ३ तास १० मिनिटे एवढा वेळ खर्ची घालावा लागणार आहे़ विशेष म्हणजे भाडेही वाढविण्यात आले आहे़ रेल्वेच्या स्लिपर टिकीटासाठी २८५ रुपयांऐवजी आता ३७५ रुपये म्हणजे एका तिकीटामागे ९० रुपयांचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागणार आहे़ विशेष गाड्यांच्या नावावर प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी महासंघाने केला आहे

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीparabhaniपरभणी