शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

परभणी : आज थांबणार जाहीर प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:41 IST

लोकसभा निवडणुकीत १८ दिवसांच्या प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास थांबणार असून, त्यानंतर छुप्या प्रचारावरच उमेदवारांची भिस्त राहणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीत १८ दिवसांच्या प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास थांबणार असून, त्यानंतर छुप्या प्रचारावरच उमेदवारांची भिस्त राहणार आहे़या मतदार संघात शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार खा़ बंडू जाधव, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांच्यासह १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ २९ मार्चपासून या मतदार संघात जाहीर प्रचाराला सुरुवात झाली़ ध्वनीक्षेपक, कॉर्नर बैठका, पदयात्रा, गाठीभेटी आणि स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा असे प्रचाराचे स्वरुप राहिले़ १८ दिवस उमेदवारांनी दिवसरात्र एक करून संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला़ अनेक भागात प्रचाराच्या दोन-दोन फेऱ्याही पूर्ण झाल्या आहेत़ या मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने स्टार प्रचारकांच्या सभांच आयोजन केले होते़ या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभा या मतदार संघात झाल्या़ तर महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री गुलाबराव पाटील आदींच्या सभा झाल्या़ सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही सभा झाली़ तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांची सभा पूर्णा, पाथरी येथे झाली़ या सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या़ त्याच प्रमाणे कॉर्नर बैठकांतून विकास कामावंर चर्चा झडल्या़ त्यामुळे या काळात जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते़यावर्षी उन्हाचे प्रमाण अधिक राहिले़ एप्रिल महिन्यांतील १५ दिवस तापमान ४० अंशाच्या पुढे नोंद झाले़ त्यामुळे राजकीय पक्ष कार्यकर्र्त्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागला़ वाढत जाणारे ऊन लक्षात घेऊन सकाळी ७ वाजेपासूनच प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली जात होती़ ११ वाजेपर्यंत बहुतांश प्रचार फेºया पूर्ण केल्यानंतर दुपारच्या काळात चावडीवरील बैठका, कॉर्नर बैठकांवर भर देण्यात आला़ जाहीर सभांचे नियोजन करतानाही शक्य तो सकाळी किंवा सायंकाळच्या वेळा निवडण्यात आल्या़एकंदर प्रचाराची ही रणधुमाळी आता थांबविण्याची वेळ जवळ आली आहे़ १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जाहीर प्रचाराची मुदत आहे़ त्यामुळे मंगळवारचा संपूर्ण दिवस उमेदवारांकडे शिल्लक असून, या काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न हे उमेदवार करतील़ सायंकाळी ६ नंतर मात्र प्रचार थांबणार आहे़जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, जाहीर प्रचार थांबल्यानंतर उमेदवारांकडे आणखी दोन दिवस शिल्लक आहेत़ या काळात प्रत्यक्ष जाहीर प्रचार करता येणार नसला तरी गाठीभेटी घेणे, मतदारांशी संपर्क वाढवून छुप्या पद्धतीने प्रचार केला जाईल, असा अंदाज आहे़एकंदर निवडणुकीतील प्रचाराचा महत्त्वाचा टप्पा मंगळवारी संपणार असून, उमेदवारांना आता जास्तीत जास्त मतदान करून घेण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे़ तर दुसरीकडे जाहीर प्रचार संपल्याने प्रशासनाची जबाबदारी वाढली असून, पथकांना अधिक सजग करण्यात आले आहे़गाठी भेटीवरच द्यावा लागेल भर४मंगळवार सायंकाळनंतर जाहीर प्रचार थांबणार असल्याने उमेदवार, त्यांच्या कार्यकर्त्यांना जाहीर सभा, पदयात्रा यासारखा प्रचार करता येणार नाही. त्यामुळे मतदारांच्या वैयक्तिक गाठी भेटी घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे या माध्यमातूनच प्रचार करावा लागेल. उमेदवारांकडे दोन दिवस आणि दोन रात्र शिल्लक असून, या काळात किती मतदारांपर्यंत उमेदवार पोहोचू शकतात, यावरच सर्वकाही अवलंबून आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहूनही मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न उमेदवारांना करता येईल.पथकांची वाढली जबाबदारीजाहीर प्रचार थांबल्यानंतर दोन दिवस महत्त्वपूर्ण आहेत. या काळात आचारसंहिता भंग होण्याचे प्रकार होवू शकतात़ त्यामुळे गैरकृत्यांवर नजर ठेवण्यासाठी आचारसंहिता पथकांची जबाबदारी महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्यामुळे या काळात होणाºया हालचालींवर बारकाईने ठेवण्याची भूमिका पथकांना घ्यावी लागेल. दोन्ही दिवशी रात्री गस्त वाढवावी लागणार आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरुन धावणाºया वाहनांचीही कसून तपासणी करावी लागेल.प्रशिक्षणात पथक प्रमुखांना सूचनाआचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी व्हिडीओ सर्व्हलन्स टीम, स्टॅटेस्टिक सर्व्हलन्स टीम यासह प्लार्इंग स्कॉड आणि इतर पथकांची स्थापना करण्यात आली आहे़ या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण झाले आहे़ त्यांची जबाबदारी काय? त्यांनी कुठल्या पद्धतीने काम करावे, याची माहिती प्रशिक्षणा दरम्यान अधिकारी, कर्मचाºयांना देण्यात आली आहे़ मंगळवारी सायकाळी प्रचार थांबल्यानंतर या पथकांची जबाबदारी वाढणार आहे़ या दृष्टीनेही बैठक घेऊन अधिकारी, कर्मचाºयांना सूचना दिल्या जातील, असे निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी सांगितले़

टॅग्स :parbhani-pcपरभणीparabhaniपरभणीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक