शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

परभणी : शंभर गावांमध्ये कृषी विभागाकडून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:07 IST

तालुक्यातील कापूस पिकावर वेगवेगळ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी २६ जुलैपासून तालुका कृषी कार्यालयाकडून तालुक्यातील १३१ गावांपैकी १०० गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन व औषधांची माहिती देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: तालुक्यातील कापूस पिकावर वेगवेगळ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी २६ जुलैपासून तालुका कृषी कार्यालयाकडून तालुक्यातील १३१ गावांपैकी १०० गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन व औषधांची माहिती देण्यात आली आहे.परभणी तालुक्यात दरवर्षी खरीप हंगामात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गतवर्षी तालुक्यातील १३१ गावांमध्ये ३४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती; परंतु, कापसावर शेंद्री बोंडअळीने हल्ला चढविल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकºयांनी पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघाला नाही. २०१८-१९ या खरीप हंगामात कापूस पिकाच्या लागवडीमध्ये घट होईल, अशी चिन्हे होती. त्यानुसार यावर्षी तालुक्यात २९ हजार ६०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ५ हजार हेक्टर कापसाची लागवड घटली आहे.शेतकºयांनी लागवड केलेले कापूस पीक पात्या-फुलांच्या अवस्थेत आहे. असे असताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्यांनी कापूस पिकाला घेरले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक अडचणीत सापडला आहे. शेतकºयांना धीर देण्यासाठी तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ व ४८ कृषी सहाय्यकांकडून तालुक्यातील १३१ गावांमध्ये २६ जुलैपासून क्रॉपसॅप अभियानांतर्गत बोंडअळीबाबत जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. १६ दिवसांमध्ये १०० गावांतील शेतकºयांच्या बांधावर जावून कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी व पावसाचा खंड या दोन्ही बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचबरोबर सोयाबीन पीक पावसाच्या खंडकाळात तग धरुन रहावे यासाठी खते व औषधींची मात्रा देण्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील गावांमध्ये जाऊन बोंडअळीबाबत जनजागृती करण्यात येत असल्याने कापूस उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.४०० शेतकºयांना दिले प्रशिक्षणतालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील १३१ गावांमधील ४०० शेतकºयांना बोंडअळीच्या नियंत्रणासाठी दोन टप्प्यामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर तालुक्यातील ५४ गावांमध्ये वाहनांद्वारे जनजागृतीही केली जात आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे कापूस उत्पादक शेतकºयांना धीर मिळाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी