शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

परभणी : शंभर गावांमध्ये कृषी विभागाकडून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:07 IST

तालुक्यातील कापूस पिकावर वेगवेगळ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी २६ जुलैपासून तालुका कृषी कार्यालयाकडून तालुक्यातील १३१ गावांपैकी १०० गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन व औषधांची माहिती देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: तालुक्यातील कापूस पिकावर वेगवेगळ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी २६ जुलैपासून तालुका कृषी कार्यालयाकडून तालुक्यातील १३१ गावांपैकी १०० गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन व औषधांची माहिती देण्यात आली आहे.परभणी तालुक्यात दरवर्षी खरीप हंगामात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गतवर्षी तालुक्यातील १३१ गावांमध्ये ३४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती; परंतु, कापसावर शेंद्री बोंडअळीने हल्ला चढविल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकºयांनी पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघाला नाही. २०१८-१९ या खरीप हंगामात कापूस पिकाच्या लागवडीमध्ये घट होईल, अशी चिन्हे होती. त्यानुसार यावर्षी तालुक्यात २९ हजार ६०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ५ हजार हेक्टर कापसाची लागवड घटली आहे.शेतकºयांनी लागवड केलेले कापूस पीक पात्या-फुलांच्या अवस्थेत आहे. असे असताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्यांनी कापूस पिकाला घेरले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक अडचणीत सापडला आहे. शेतकºयांना धीर देण्यासाठी तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ व ४८ कृषी सहाय्यकांकडून तालुक्यातील १३१ गावांमध्ये २६ जुलैपासून क्रॉपसॅप अभियानांतर्गत बोंडअळीबाबत जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. १६ दिवसांमध्ये १०० गावांतील शेतकºयांच्या बांधावर जावून कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी व पावसाचा खंड या दोन्ही बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचबरोबर सोयाबीन पीक पावसाच्या खंडकाळात तग धरुन रहावे यासाठी खते व औषधींची मात्रा देण्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील गावांमध्ये जाऊन बोंडअळीबाबत जनजागृती करण्यात येत असल्याने कापूस उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.४०० शेतकºयांना दिले प्रशिक्षणतालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील १३१ गावांमधील ४०० शेतकºयांना बोंडअळीच्या नियंत्रणासाठी दोन टप्प्यामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर तालुक्यातील ५४ गावांमध्ये वाहनांद्वारे जनजागृतीही केली जात आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे कापूस उत्पादक शेतकºयांना धीर मिळाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी