शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

परभणी : शंभर गावांमध्ये कृषी विभागाकडून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:07 IST

तालुक्यातील कापूस पिकावर वेगवेगळ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी २६ जुलैपासून तालुका कृषी कार्यालयाकडून तालुक्यातील १३१ गावांपैकी १०० गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन व औषधांची माहिती देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: तालुक्यातील कापूस पिकावर वेगवेगळ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी २६ जुलैपासून तालुका कृषी कार्यालयाकडून तालुक्यातील १३१ गावांपैकी १०० गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन व औषधांची माहिती देण्यात आली आहे.परभणी तालुक्यात दरवर्षी खरीप हंगामात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गतवर्षी तालुक्यातील १३१ गावांमध्ये ३४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती; परंतु, कापसावर शेंद्री बोंडअळीने हल्ला चढविल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकºयांनी पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघाला नाही. २०१८-१९ या खरीप हंगामात कापूस पिकाच्या लागवडीमध्ये घट होईल, अशी चिन्हे होती. त्यानुसार यावर्षी तालुक्यात २९ हजार ६०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ५ हजार हेक्टर कापसाची लागवड घटली आहे.शेतकºयांनी लागवड केलेले कापूस पीक पात्या-फुलांच्या अवस्थेत आहे. असे असताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्यांनी कापूस पिकाला घेरले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक अडचणीत सापडला आहे. शेतकºयांना धीर देण्यासाठी तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ व ४८ कृषी सहाय्यकांकडून तालुक्यातील १३१ गावांमध्ये २६ जुलैपासून क्रॉपसॅप अभियानांतर्गत बोंडअळीबाबत जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. १६ दिवसांमध्ये १०० गावांतील शेतकºयांच्या बांधावर जावून कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी व पावसाचा खंड या दोन्ही बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचबरोबर सोयाबीन पीक पावसाच्या खंडकाळात तग धरुन रहावे यासाठी खते व औषधींची मात्रा देण्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील गावांमध्ये जाऊन बोंडअळीबाबत जनजागृती करण्यात येत असल्याने कापूस उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.४०० शेतकºयांना दिले प्रशिक्षणतालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील १३१ गावांमधील ४०० शेतकºयांना बोंडअळीच्या नियंत्रणासाठी दोन टप्प्यामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर तालुक्यातील ५४ गावांमध्ये वाहनांद्वारे जनजागृतीही केली जात आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे कापूस उत्पादक शेतकºयांना धीर मिळाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी