शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

परभणी : कापडी आच्छादनाने डाळिंब बागांचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:15 IST

जमिनीतील खोल गेलेली पाणीपातळी, उन्हाचा वाढलेला पारा यामुळे तालुक्यातील डोंगराळ भागामध्ये बागायती पिके धोक्यात आली आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक झाडाला कपड्याचे आच्छादन टाकून टाकळखोपा येथील डांळिंब बाग वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत.

विजय चोरडिया।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : जमिनीतील खोल गेलेली पाणीपातळी, उन्हाचा वाढलेला पारा यामुळे तालुक्यातील डोंगराळ भागामध्ये बागायती पिके धोक्यात आली आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक झाडाला कपड्याचे आच्छादन टाकून टाकळखोपा येथील डांळिंब बाग वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत.तालुक्यामध्ये ५ ते १० टक्के बागायती शेती आहे; परंतु, यावर्षी अपुरा पाऊस झाल्याने जमिनीतील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. जमिनीत पाणी नसल्याने पिकांना पाणी द्यावे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एकीकडे पाण्यासाठी बळीराजाची होणारी ससेहोलपट होत असताना दुसरीकडे तापमानही वाढत आहे. त्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. किमान शेतात उभ्या असलेल्या पिकांना वाचविता यावे, यासाठी बळीराजाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.जिंतूर तालुक्यातील टाकळखोपा येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव बुधवंत यांनी दहा एकरवर डाळिंबाची लागवड केली आहे. या शेतकºयाने आपल्या शेतात पिकणाºया डाळिंबासाठी आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळविले. शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करून आधुुनिक उत्पादन वाढीवर त्यांचा प्रयत्न आहे. यावर्षी मात्र निसर्गाने त्यांना साथ दिली नाही. सद्यस्थितीला पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, उन्हामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत असल्याने बुधवंत यांनी आपल्या बागेतील सर्वच झाडांना कापडी अच्छादन टाकले असून, उन्हापासून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची परिसरात चर्चा होत आहे.पिके वाचविण्यासाठी धडपडजिंतूर तालुक्यात यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे शाश्वत जलस्त्रोतही एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत आटले आहे. त्यामुळे टाकळखोपा येथील ज्ञानदेव बुधवंत यांनी दीड हजार डाळिंबाच्या झाडांना कापडी आच्छादन व एक हजारापेक्षा जास्त झाडांना उन्हापासून संरक्षण मिळावे, यासाठी मोठा खर्च केला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाºया तापमानामुळे पिके जगविण्यासाठी धडपड करावी लागत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरीTemperatureतापमान