शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

परभणी :‘रमाई आवास’चे प्रस्ताव प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:10 IST

रमाई घरकूल योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी दाखल झालेले प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयातच पडून असल्याने आर्थिक वर्ष संपत आले तरीही तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण होईना़ त्यामुळे लाभार्थ्यांची प्रतिक्षा शिगेला टांगली आहे.

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रमाई घरकूल योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी दाखल झालेले प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयातच पडून असल्याने आर्थिक वर्ष संपत आले तरीही तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण होईना़ त्यामुळे लाभार्थ्यांची प्रतिक्षा शिगेला टांगली आहे.ग्रामीण भागातील मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना त्यांचे हक्काचे घरकूल मिळावे, या उद्देशाने राज्य शासन रमाई आवास योजना राबविते़ या योजनेंतर्गत प्रत्येक पंचायत समितींना घरकुलांचे उद्दिष्ट दिले जाते़ त्यानुसार पंचायत समितीमार्फत लाभार्थ्यांकडून प्रस्तावांची मागणी करण्यात येते़ २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी परभणी तालुक्याला ११०० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ पंचायत समितीमार्फत यासाठी लाभार्थ्यांकडून प्रस्तावांची मागणी करण्यात आली़लाभार्थ्यांनीही योजनेंतर्गत आपले प्रस्ताव दाखल केले आहेत़ तब्बल १६०० प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत़ मात्र अद्यापपर्यंत या प्रस्तावांवर साधी चर्चाही झाली नाही़ त्यामुळे लाभार्थ्यांनी दाखल केलेले प्रस्ताव पंचायत समितीतच धूळ खात पडून आहेत़दरवर्षी रमाई आवास योजनेंतर्गत पंचायत समित्यांना उद्दिष्ट दिले जाते़ पंचायत समित्यांमार्फत आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करून टप्प्या टप्प्याने घरकुलांचे अनुदानही वितरित केले जाते़ मात्र यावर्षी पंचायत समितीचा कारभार ढेपाळला आहे़जानेवारी महिना उजाडला तरीही लाभार्थ्यांनी दाखल केलेले प्रस्ताव पंचायत समितीमधून पुढे सरकारले नाहीत़ आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे़या दोन महिन्यांत पंचायत समितीचे अधिकारी प्रस्ताव मंजूर करून मोकळे होतीलही़ परंतु, लाभार्थ्यांना अनुदान कधी मिळणार? आणि त्यांनी घरकुले कधी बांधायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ घरकुलांचे प्रस्ताव पुढे पाठविण्यास चालढकल होत असल्याने लाभार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़ पं़स़च्या अधिकाºयांनी रमाई आवास योजनेंतर्गत तत्काळ बैठक घेऊन प्रस्ताव हातावेगळे करावेत, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे़अशी आहे योजनेची प्रक्रियाग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावांची छाननी पं़स़ अधिकाºयांमार्फत केली जाते़ त्यानंतर दिलेल्या उद्दिष्टानुसार लाभार्थ्यांची निवड करून त्यांचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठविले जातात़ समाजकल्याण विभागातून या प्रस्तावांना निधी उपलब्ध करून दिला जातो़ प्रतिलाभार्थी १ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान तीन टप्प्यात वितरित केले जाते़ त्यात पहिल्या टप्प्यामध्ये ३० हजार रुपये लाभार्थ्यांना दिले जातात़ घरकूल बांधणीच्या कामाला सुरुवात केल्यानंतर दुसरा टप्पा आणि घरकूल पूर्ण झाल्यानंतर तिसºया टप्प्याचे अनुदान वितरित केल जाते़मनुष्यबळ नसल्याने रखडले प्रस्तावपरभणी पंचायत समितीमधील बांधकाम विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे़ केवळ एका अधिकाºयावर हा विभाग चालविला जातो़ त्यामुळे रमाई आवास योजनेंतर्गत दाखल प्रस्ताव मंजूर करण्यासाठी विलंब होत आहे़ जानेवारी महिना उजाडला तरी हे प्रस्ताव मंजूर झाले नसल्याने घरकूल बांधकामास नवीन आर्थिक वर्षातच सुरुवात होते की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे़या गावांमधून आले प्रस्ताव४परभणी तालुक्यामध्ये १३१ गावे असून, ही सर्व गावे रमाई आवास योजनेसाठी पात्र आहेत़ त्यापैकी मांडाखळी, तरोडा, नांदगाव खुर्द, आलेगाव पांढरी, कारला, आर्वी, शिर्शी आदी गावातून प्रस्ताव आले आहेत़