शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

परभणी : टंचाई निवारणासाठी ५३९ विहिरींचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:42 IST

दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावा-गावांत सार्वजनिक विहीर घेतली जात असून, या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाकडे ५३९ विहिरींचे प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यापैकी १४३ विहिरींची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावा-गावांत सार्वजनिक विहीर घेतली जात असून, या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाकडे ५३९ विहिरींचे प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यापैकी १४३ विहिरींची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत़उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण होते़ टंचाई कालावधीत गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जातात़ त्यावर लाखो रुपयांचा खर्च होतो़ दरवर्षीच ही परिस्थिती उद्भवते़ त्यावर मात करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना व्हावी, टंचाईग्रस्त गावाला गावातच पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी ग्रामपंचायतस्तरावर गावातील सार्वजनिक जागेत विहीर घेण्याची योजना आखली आहे़ त्यानुसार परभणी जिल्ह्यात या योजनेला प्रारंभ झाला असून, ग्रामपंचायतींकडून सार्वजनिक विहिरींसाठी प्रस्ताव मागविले जात आहेत़ २२ सप्टेंबरपर्यंत जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाला ५३९ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी १६९ प्रस्तावांना आॅनलाईन वर्ककोड देण्यात आला आहे़ तालुकास्तरीय समितीने ३९२ प्रस्तावांना मान्यता दिली असून, जिल्हास्तरीय समितीने त्यातील ३८७ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे़ त्यापैकी १४३ गावांमध्ये सार्वजनिक विहीर घेण्याचे काम सुरू झाले आहे़ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेंतर्गत कामे सुरू करण्यात आली आहेत़ गावा-गावांत सार्वजनिक विहीर घेतल्याने त्या गावातील पाणीटंचाई दूर होणार असून, या माध्यमातून उन्हाळ्यामध्ये ग्रामवासियांना पाणी उपलब्ध होणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ