शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

परभणी : चार क्विंटल निर्माल्यातून होणार गांडूळ खताची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 23:55 IST

गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरात विविध भागात निर्माल्य संकलन केंद्र सुरु करुन महानगरपालिकेने सुमारे ४ क्विंटल निर्माल्य संकलित केले आहे. या निर्माल्याच्या माध्यमातून गांडूळ खताची निर्मिती केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरात विविध भागात निर्माल्य संकलन केंद्र सुरु करुन महानगरपालिकेने सुमारे ४ क्विंटल निर्माल्य संकलित केले आहे. या निर्माल्याच्या माध्यमातून गांडूळ खताची निर्मिती केली जाणार आहे.गणेशोत्सव काळात १० दिवस श्री गणरायाची पूजा केली जाते. या पुजेसाठी हार, फुले, दुर्वा आदींचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांबरोबरच घरोघरी स्थापित केलेल्या गणेश मूर्र्तींसमोर जमा झालेले निर्माल्य विसर्जनाच्या दिवशी पाण्यात टाकले जाते किंवा रस्त्याच्या कडेला फेकून दिले जाते. त्यामुळे या निर्माल्याचे पावित्र्य राखले जात नाही.ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांच्या संकल्पनेतून गांडूळखत उत्पादित करण्याचा प्रकल्प गणेशोत्सवापूर्वी सुरु करण्यात आला. येथील गांधी पार्क भागात साडेतीन बाय ११ फूट लांब आणि साडेतीन फूट खोल खड्डा करुन त्यात गांडूळ खताची निर्मिती केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत सार्वजनिक गणेश मंडळांनी या ठिकाणी दररोज निर्माल्य जमा केले. त्याच प्रमाणे विसर्जनाच्या दिवशी खंडोबा बाजार, देशमुख हॉटेल, वसमतरोडवरील काळी कमान, जिंतूररोडवरील गणपती चौक, दर्गारोड परिसरातील कृत्रिम रेतन केंद्र भागात निर्माल्य संकलन केंद्र सुरु केले होते. विसर्जनाच्या दिवशी या केंद्रामध्ये नागरिकांनी जमा झालेले निर्माल्य एकत्रित केले. या काळात जवळपास चार क्विंटल निर्माल्य जमा झाले आहे.शहरातील वसमतरोडवरील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात गणेश विसर्जनाची व्यवस्था महापालिकेने केली होती. या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलित करण्यात आले. या निर्माल्याचे वर्गीकरण करुन ते गांधी पार्क येथे जमा केले असून त्यातून आता गांडुळखताची निर्मिती केली जाणार आहे. याकामी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अलकेश देशमुख, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुºहा यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला. त्यामुळे निर्माल्यापासून आता खताची निर्मिती होणार आहे.टाकाऊ वस्तुंचा पूनर्रवापर४सहाय्यक आयुक्त अलकेश देशमुख आणि स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुºहा यांच्या पुढाकारातून गांधी पार्क भागात टाकाऊ वस्तुंचा पूनर्रवापर करण्यात आला. त्यात जुन्या फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये रोपांची लागवड करण्यात आली आहे. तसेच फायबर कुलरचे दोन भाग करुन ट्री गार्ड म्हणून वापर करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे उन्हाळ्यात अंबा, जांभूळ, करंजी आदी बियाणे जमा करुन ३०० रोपांची लागवड या परिसरात केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी