शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

परभणी : चार क्विंटल निर्माल्यातून होणार गांडूळ खताची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 23:55 IST

गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरात विविध भागात निर्माल्य संकलन केंद्र सुरु करुन महानगरपालिकेने सुमारे ४ क्विंटल निर्माल्य संकलित केले आहे. या निर्माल्याच्या माध्यमातून गांडूळ खताची निर्मिती केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरात विविध भागात निर्माल्य संकलन केंद्र सुरु करुन महानगरपालिकेने सुमारे ४ क्विंटल निर्माल्य संकलित केले आहे. या निर्माल्याच्या माध्यमातून गांडूळ खताची निर्मिती केली जाणार आहे.गणेशोत्सव काळात १० दिवस श्री गणरायाची पूजा केली जाते. या पुजेसाठी हार, फुले, दुर्वा आदींचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांबरोबरच घरोघरी स्थापित केलेल्या गणेश मूर्र्तींसमोर जमा झालेले निर्माल्य विसर्जनाच्या दिवशी पाण्यात टाकले जाते किंवा रस्त्याच्या कडेला फेकून दिले जाते. त्यामुळे या निर्माल्याचे पावित्र्य राखले जात नाही.ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांच्या संकल्पनेतून गांडूळखत उत्पादित करण्याचा प्रकल्प गणेशोत्सवापूर्वी सुरु करण्यात आला. येथील गांधी पार्क भागात साडेतीन बाय ११ फूट लांब आणि साडेतीन फूट खोल खड्डा करुन त्यात गांडूळ खताची निर्मिती केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत सार्वजनिक गणेश मंडळांनी या ठिकाणी दररोज निर्माल्य जमा केले. त्याच प्रमाणे विसर्जनाच्या दिवशी खंडोबा बाजार, देशमुख हॉटेल, वसमतरोडवरील काळी कमान, जिंतूररोडवरील गणपती चौक, दर्गारोड परिसरातील कृत्रिम रेतन केंद्र भागात निर्माल्य संकलन केंद्र सुरु केले होते. विसर्जनाच्या दिवशी या केंद्रामध्ये नागरिकांनी जमा झालेले निर्माल्य एकत्रित केले. या काळात जवळपास चार क्विंटल निर्माल्य जमा झाले आहे.शहरातील वसमतरोडवरील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात गणेश विसर्जनाची व्यवस्था महापालिकेने केली होती. या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलित करण्यात आले. या निर्माल्याचे वर्गीकरण करुन ते गांधी पार्क येथे जमा केले असून त्यातून आता गांडुळखताची निर्मिती केली जाणार आहे. याकामी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अलकेश देशमुख, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुºहा यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला. त्यामुळे निर्माल्यापासून आता खताची निर्मिती होणार आहे.टाकाऊ वस्तुंचा पूनर्रवापर४सहाय्यक आयुक्त अलकेश देशमुख आणि स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुºहा यांच्या पुढाकारातून गांधी पार्क भागात टाकाऊ वस्तुंचा पूनर्रवापर करण्यात आला. त्यात जुन्या फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये रोपांची लागवड करण्यात आली आहे. तसेच फायबर कुलरचे दोन भाग करुन ट्री गार्ड म्हणून वापर करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे उन्हाळ्यात अंबा, जांभूळ, करंजी आदी बियाणे जमा करुन ३०० रोपांची लागवड या परिसरात केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी