शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

परभणी : सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:30 IST

तालुक्यात मागील महिनाभरापासून पावसाचा खंड पडला आहे. परतीच्या पावसाची आशा मावळली असून वेळेत पाऊस न पडल्याने सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात मागील महिनाभरापासून पावसाचा खंड पडला आहे. परतीच्या पावसाची आशा मावळली असून वेळेत पाऊस न पडल्याने सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पालम तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात २८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यावर्षी प्रारंभी पिकाची वाढ जोमदार झाली होती. शेतकऱ्यांनी हजोरांचा खर्च करीत खताचा डोस देत औषधांची फवारणी केली होती. ऐेन शेंगा भरणीच्या वेळी पावसाने तालुक्यात उघडीप दिली. एका महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले तरी पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे सोयाबीनचा दाना अतिशय लहान आकारात राहिला आहे. तसेच मालाचा दर्जा खराब होत आहे. पीक वाळून गेल्याने कापणी व काढणीची कामे सुरू आहेत. उत्पादनात निम्यापेक्षा जास्त घट झाली असून खर्च निघणेही कठीण बनले आहे. त्यामुळे शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले आहेत.एकरी : कापसणीसाठी ३ हजारांची मजुरीयावर्षी पाऊस वेळेवर न झाल्याने सोयाबीन पिकाची कापणी एकाच वेळी सर्वत्र आली आहे. त्यामुळे मजुरांची अडचण भासत आहे. एकरी कापणीसाठी २ हजार ५०० ते ३००० रुपयांचा खर्च लागत असून शेतकºयांना तो परवडनासा झाला आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर दरवर्षी सोयाबीन पीक येत असते. हे पीक शेतकºयांचे नगदी पीक असल्याने अनेक व्यवहार या पिकावर अवलंबून आहेत;परंतु, पावसाने दगा दिल्याने शेतकºयांचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत.वस्सा परिसरात परतीच्या पावसाची हुलकावणीवस्सा- जिंतूर तालुक्यातील वस्सा परिसरात ३० दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. त्यातच परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात वस्सा परिसरात सोयाबीन व कापसाची मोठ्या संख्येने लागवड झाली आहे;परंतु, ऐन पावसाळ्यात महिन्यापासून पावसाने खंड दिला आहे. त्यातच परतीच्या पावसाने चकवा दिल्याने खरीप हंगामाची वाट लागली आहे. सोयाबीन व कापसाचा उतार निम्याने घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरडवाहू शेतकºयांसाठी परिस्थिती चिंताजनक असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर वस्सा व परिसरात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस