शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
2
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
3
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
4
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
5
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
6
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
7
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
8
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
9
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
10
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
11
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
12
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
13
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
14
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
15
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
16
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
17
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
18
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
19
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
20
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:30 IST

तालुक्यात मागील महिनाभरापासून पावसाचा खंड पडला आहे. परतीच्या पावसाची आशा मावळली असून वेळेत पाऊस न पडल्याने सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात मागील महिनाभरापासून पावसाचा खंड पडला आहे. परतीच्या पावसाची आशा मावळली असून वेळेत पाऊस न पडल्याने सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पालम तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात २८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यावर्षी प्रारंभी पिकाची वाढ जोमदार झाली होती. शेतकऱ्यांनी हजोरांचा खर्च करीत खताचा डोस देत औषधांची फवारणी केली होती. ऐेन शेंगा भरणीच्या वेळी पावसाने तालुक्यात उघडीप दिली. एका महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले तरी पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे सोयाबीनचा दाना अतिशय लहान आकारात राहिला आहे. तसेच मालाचा दर्जा खराब होत आहे. पीक वाळून गेल्याने कापणी व काढणीची कामे सुरू आहेत. उत्पादनात निम्यापेक्षा जास्त घट झाली असून खर्च निघणेही कठीण बनले आहे. त्यामुळे शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले आहेत.एकरी : कापसणीसाठी ३ हजारांची मजुरीयावर्षी पाऊस वेळेवर न झाल्याने सोयाबीन पिकाची कापणी एकाच वेळी सर्वत्र आली आहे. त्यामुळे मजुरांची अडचण भासत आहे. एकरी कापणीसाठी २ हजार ५०० ते ३००० रुपयांचा खर्च लागत असून शेतकºयांना तो परवडनासा झाला आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर दरवर्षी सोयाबीन पीक येत असते. हे पीक शेतकºयांचे नगदी पीक असल्याने अनेक व्यवहार या पिकावर अवलंबून आहेत;परंतु, पावसाने दगा दिल्याने शेतकºयांचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत.वस्सा परिसरात परतीच्या पावसाची हुलकावणीवस्सा- जिंतूर तालुक्यातील वस्सा परिसरात ३० दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. त्यातच परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात वस्सा परिसरात सोयाबीन व कापसाची मोठ्या संख्येने लागवड झाली आहे;परंतु, ऐन पावसाळ्यात महिन्यापासून पावसाने खंड दिला आहे. त्यातच परतीच्या पावसाने चकवा दिल्याने खरीप हंगामाची वाट लागली आहे. सोयाबीन व कापसाचा उतार निम्याने घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरडवाहू शेतकºयांसाठी परिस्थिती चिंताजनक असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर वस्सा व परिसरात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस