शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

परभणी : सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:30 IST

तालुक्यात मागील महिनाभरापासून पावसाचा खंड पडला आहे. परतीच्या पावसाची आशा मावळली असून वेळेत पाऊस न पडल्याने सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात मागील महिनाभरापासून पावसाचा खंड पडला आहे. परतीच्या पावसाची आशा मावळली असून वेळेत पाऊस न पडल्याने सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पालम तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात २८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यावर्षी प्रारंभी पिकाची वाढ जोमदार झाली होती. शेतकऱ्यांनी हजोरांचा खर्च करीत खताचा डोस देत औषधांची फवारणी केली होती. ऐेन शेंगा भरणीच्या वेळी पावसाने तालुक्यात उघडीप दिली. एका महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले तरी पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे सोयाबीनचा दाना अतिशय लहान आकारात राहिला आहे. तसेच मालाचा दर्जा खराब होत आहे. पीक वाळून गेल्याने कापणी व काढणीची कामे सुरू आहेत. उत्पादनात निम्यापेक्षा जास्त घट झाली असून खर्च निघणेही कठीण बनले आहे. त्यामुळे शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले आहेत.एकरी : कापसणीसाठी ३ हजारांची मजुरीयावर्षी पाऊस वेळेवर न झाल्याने सोयाबीन पिकाची कापणी एकाच वेळी सर्वत्र आली आहे. त्यामुळे मजुरांची अडचण भासत आहे. एकरी कापणीसाठी २ हजार ५०० ते ३००० रुपयांचा खर्च लागत असून शेतकºयांना तो परवडनासा झाला आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर दरवर्षी सोयाबीन पीक येत असते. हे पीक शेतकºयांचे नगदी पीक असल्याने अनेक व्यवहार या पिकावर अवलंबून आहेत;परंतु, पावसाने दगा दिल्याने शेतकºयांचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत.वस्सा परिसरात परतीच्या पावसाची हुलकावणीवस्सा- जिंतूर तालुक्यातील वस्सा परिसरात ३० दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. त्यातच परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात वस्सा परिसरात सोयाबीन व कापसाची मोठ्या संख्येने लागवड झाली आहे;परंतु, ऐन पावसाळ्यात महिन्यापासून पावसाने खंड दिला आहे. त्यातच परतीच्या पावसाने चकवा दिल्याने खरीप हंगामाची वाट लागली आहे. सोयाबीन व कापसाचा उतार निम्याने घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरडवाहू शेतकºयांसाठी परिस्थिती चिंताजनक असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर वस्सा व परिसरात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस