शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

परभणी : सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:30 IST

तालुक्यात मागील महिनाभरापासून पावसाचा खंड पडला आहे. परतीच्या पावसाची आशा मावळली असून वेळेत पाऊस न पडल्याने सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात मागील महिनाभरापासून पावसाचा खंड पडला आहे. परतीच्या पावसाची आशा मावळली असून वेळेत पाऊस न पडल्याने सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पालम तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात २८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यावर्षी प्रारंभी पिकाची वाढ जोमदार झाली होती. शेतकऱ्यांनी हजोरांचा खर्च करीत खताचा डोस देत औषधांची फवारणी केली होती. ऐेन शेंगा भरणीच्या वेळी पावसाने तालुक्यात उघडीप दिली. एका महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले तरी पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे सोयाबीनचा दाना अतिशय लहान आकारात राहिला आहे. तसेच मालाचा दर्जा खराब होत आहे. पीक वाळून गेल्याने कापणी व काढणीची कामे सुरू आहेत. उत्पादनात निम्यापेक्षा जास्त घट झाली असून खर्च निघणेही कठीण बनले आहे. त्यामुळे शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले आहेत.एकरी : कापसणीसाठी ३ हजारांची मजुरीयावर्षी पाऊस वेळेवर न झाल्याने सोयाबीन पिकाची कापणी एकाच वेळी सर्वत्र आली आहे. त्यामुळे मजुरांची अडचण भासत आहे. एकरी कापणीसाठी २ हजार ५०० ते ३००० रुपयांचा खर्च लागत असून शेतकºयांना तो परवडनासा झाला आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर दरवर्षी सोयाबीन पीक येत असते. हे पीक शेतकºयांचे नगदी पीक असल्याने अनेक व्यवहार या पिकावर अवलंबून आहेत;परंतु, पावसाने दगा दिल्याने शेतकºयांचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत.वस्सा परिसरात परतीच्या पावसाची हुलकावणीवस्सा- जिंतूर तालुक्यातील वस्सा परिसरात ३० दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. त्यातच परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात वस्सा परिसरात सोयाबीन व कापसाची मोठ्या संख्येने लागवड झाली आहे;परंतु, ऐन पावसाळ्यात महिन्यापासून पावसाने खंड दिला आहे. त्यातच परतीच्या पावसाने चकवा दिल्याने खरीप हंगामाची वाट लागली आहे. सोयाबीन व कापसाचा उतार निम्याने घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरडवाहू शेतकºयांसाठी परिस्थिती चिंताजनक असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर वस्सा व परिसरात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस