शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

परभणी ;आत्मदहनाच्या प्रयत्नातील शेतकऱ्यांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:40 IST

निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मावेजा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकºयांना नवा मोंढा पोलिसांनी जायकवाडी परिसरातील गेटवरच ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मावेजा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकºयांना नवा मोंढा पोलिसांनी जायकवाडी परिसरातील गेटवरच ताब्यात घेतले.परभणी तालुक्यातील संबर व पिंपळगाव टोंग या गावांतील ७६ शेतकºयांनी या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ७६ शेतकºयांच्या जमिनी निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी खाजगी वाटाघाटीने २७ जून २०१४ ते २७ जुलै २०१५ या दरम्यान खरेदी करुन संपादित केल्या होत्या. या जमिनीचा मोबदला भूसंपादन कायदा २०१३ प्रमाणे देण्यात यावा, यासाठी वर्षभरापासून या शेतकºयांनी शासन दरबारी निवेदने दिली आहेत; परंतु, याबाबत कारवाई झाली नसल्याने संबर व पिंपळगाव टोंग या गावातील ७६ शेतकºयांनी १ जून रोजी जायकवाडी प्रकल्प कार्यालय किंवा जिल्हा कचेरी परिसरात आत्मदहनाचा इशारा दिला होता.त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच पोलीस प्रशासनाने जायकवाडी परिसरातील माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० च्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. शिवाय आत्मदहनाचा इशारा देणाºया शेतकºयांचा पोलीस शोध घेत होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास गंगाधर चव्हाण, सुदाम झाडे, कुंडलिक चव्हाण, रंगनाथ काळे, बालाजी पवार, प्रकाश टोंग यांच्यासह ७६ शेतकरी हातामध्ये पेट्रोलच्या कॅन, कीटक नाशक औषधी घेऊन जायकवाडी वसाहतीकडे निघाले. हे शेतकरी जायकवाडी वसाहतीतील समाजकल्याण विभागाच्या गेट जवळ आले असता नवा मोंढा पोलिसांनी त्यांना अडविले व त्यांच्याकडून पेट्रोलची कॅन, कीटकनाशके व अन्य साहित्य जप्त करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर येथे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना काही वेळानंतर सोडून देण्यात आले.संबर येथील शेतकºयांच्या जमिनीचे खरेदीखत २०१३-१४ या वर्षात तर पिंपळगाव टोंग येथील शेतकºयांच्या जमिनीचे खरेदीखत २०१४ मध्ये झाले आहेत. खाजगी वाटाघाटीद्वारे संबंधितांना जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. १२ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा, अशी या शेतकºयांची मागणी आहे; परंतु, २०१५ चा निर्णय होण्यापूर्वीच या शेतकºयांच्या जमिनीच्या खरेदीखताचे व्यवहार पूर्ण झाले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची मागणी मान्य करणे शक्य नाही. या संदर्भात बैठक घेऊन व पत्राद्वारे त्यांना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.-डॉ.संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी