शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

परभणी ;आत्मदहनाच्या प्रयत्नातील शेतकऱ्यांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:40 IST

निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मावेजा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकºयांना नवा मोंढा पोलिसांनी जायकवाडी परिसरातील गेटवरच ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मावेजा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकºयांना नवा मोंढा पोलिसांनी जायकवाडी परिसरातील गेटवरच ताब्यात घेतले.परभणी तालुक्यातील संबर व पिंपळगाव टोंग या गावांतील ७६ शेतकºयांनी या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ७६ शेतकºयांच्या जमिनी निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी खाजगी वाटाघाटीने २७ जून २०१४ ते २७ जुलै २०१५ या दरम्यान खरेदी करुन संपादित केल्या होत्या. या जमिनीचा मोबदला भूसंपादन कायदा २०१३ प्रमाणे देण्यात यावा, यासाठी वर्षभरापासून या शेतकºयांनी शासन दरबारी निवेदने दिली आहेत; परंतु, याबाबत कारवाई झाली नसल्याने संबर व पिंपळगाव टोंग या गावातील ७६ शेतकºयांनी १ जून रोजी जायकवाडी प्रकल्प कार्यालय किंवा जिल्हा कचेरी परिसरात आत्मदहनाचा इशारा दिला होता.त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच पोलीस प्रशासनाने जायकवाडी परिसरातील माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० च्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. शिवाय आत्मदहनाचा इशारा देणाºया शेतकºयांचा पोलीस शोध घेत होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास गंगाधर चव्हाण, सुदाम झाडे, कुंडलिक चव्हाण, रंगनाथ काळे, बालाजी पवार, प्रकाश टोंग यांच्यासह ७६ शेतकरी हातामध्ये पेट्रोलच्या कॅन, कीटक नाशक औषधी घेऊन जायकवाडी वसाहतीकडे निघाले. हे शेतकरी जायकवाडी वसाहतीतील समाजकल्याण विभागाच्या गेट जवळ आले असता नवा मोंढा पोलिसांनी त्यांना अडविले व त्यांच्याकडून पेट्रोलची कॅन, कीटकनाशके व अन्य साहित्य जप्त करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर येथे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना काही वेळानंतर सोडून देण्यात आले.संबर येथील शेतकºयांच्या जमिनीचे खरेदीखत २०१३-१४ या वर्षात तर पिंपळगाव टोंग येथील शेतकºयांच्या जमिनीचे खरेदीखत २०१४ मध्ये झाले आहेत. खाजगी वाटाघाटीद्वारे संबंधितांना जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. १२ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा, अशी या शेतकºयांची मागणी आहे; परंतु, २०१५ चा निर्णय होण्यापूर्वीच या शेतकºयांच्या जमिनीच्या खरेदीखताचे व्यवहार पूर्ण झाले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची मागणी मान्य करणे शक्य नाही. या संदर्भात बैठक घेऊन व पत्राद्वारे त्यांना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.-डॉ.संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी