शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

परभणी ;आत्मदहनाच्या प्रयत्नातील शेतकऱ्यांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:40 IST

निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मावेजा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकºयांना नवा मोंढा पोलिसांनी जायकवाडी परिसरातील गेटवरच ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मावेजा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकºयांना नवा मोंढा पोलिसांनी जायकवाडी परिसरातील गेटवरच ताब्यात घेतले.परभणी तालुक्यातील संबर व पिंपळगाव टोंग या गावांतील ७६ शेतकºयांनी या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ७६ शेतकºयांच्या जमिनी निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी खाजगी वाटाघाटीने २७ जून २०१४ ते २७ जुलै २०१५ या दरम्यान खरेदी करुन संपादित केल्या होत्या. या जमिनीचा मोबदला भूसंपादन कायदा २०१३ प्रमाणे देण्यात यावा, यासाठी वर्षभरापासून या शेतकºयांनी शासन दरबारी निवेदने दिली आहेत; परंतु, याबाबत कारवाई झाली नसल्याने संबर व पिंपळगाव टोंग या गावातील ७६ शेतकºयांनी १ जून रोजी जायकवाडी प्रकल्प कार्यालय किंवा जिल्हा कचेरी परिसरात आत्मदहनाचा इशारा दिला होता.त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच पोलीस प्रशासनाने जायकवाडी परिसरातील माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० च्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. शिवाय आत्मदहनाचा इशारा देणाºया शेतकºयांचा पोलीस शोध घेत होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास गंगाधर चव्हाण, सुदाम झाडे, कुंडलिक चव्हाण, रंगनाथ काळे, बालाजी पवार, प्रकाश टोंग यांच्यासह ७६ शेतकरी हातामध्ये पेट्रोलच्या कॅन, कीटक नाशक औषधी घेऊन जायकवाडी वसाहतीकडे निघाले. हे शेतकरी जायकवाडी वसाहतीतील समाजकल्याण विभागाच्या गेट जवळ आले असता नवा मोंढा पोलिसांनी त्यांना अडविले व त्यांच्याकडून पेट्रोलची कॅन, कीटकनाशके व अन्य साहित्य जप्त करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर येथे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना काही वेळानंतर सोडून देण्यात आले.संबर येथील शेतकºयांच्या जमिनीचे खरेदीखत २०१३-१४ या वर्षात तर पिंपळगाव टोंग येथील शेतकºयांच्या जमिनीचे खरेदीखत २०१४ मध्ये झाले आहेत. खाजगी वाटाघाटीद्वारे संबंधितांना जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. १२ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा, अशी या शेतकºयांची मागणी आहे; परंतु, २०१५ चा निर्णय होण्यापूर्वीच या शेतकºयांच्या जमिनीच्या खरेदीखताचे व्यवहार पूर्ण झाले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची मागणी मान्य करणे शक्य नाही. या संदर्भात बैठक घेऊन व पत्राद्वारे त्यांना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.-डॉ.संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी