शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

परभणी : प्रवाशांना मरणयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:51 AM

परभणी-जिंतूर व जिंतूर-औंढा या रस्त्यावर ठिक ठिकाणी पडलेले खड्डे व प्रचंड उडणारी धूळ यामुळे प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे़ यामुळे प्रवाशांच्या मणक्याच्या आजारासह डोळ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : परभणी-जिंतूर व जिंतूर-औंढा या रस्त्यावर ठिक ठिकाणी पडलेले खड्डे व प्रचंड उडणारी धूळ यामुळे प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे़ यामुळे प्रवाशांच्या मणक्याच्या आजारासह डोळ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.परभणी-जिंतूर रस्त्याचे काम दीड वर्षापासून संथगतीने सुरू आहे़ हे काम करीत असताना संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजुंना असणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण व्यवस्थित न केल्याने या रस्त्यावर प्रचंड खड्डे व धूळ निर्माण झाली आहे़ परिणामी वाहनधारकांना दिवसा वाहनांचे दिवे लावून प्रवास करावा लागत आहे़ यामुळे अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे़ याशिवाय दुचाकी वाहनांना तर हा प्रवास जीवघेणा ठरत आहे़ या सर्व प्रकाराला संबंधित कंत्राटदार जबाबदार असून, संबंधिताने पर्यायी मार्गाचे कोणतेही नियम न पाळल्याने त्याचा त्रास सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे़जिंतूर-औंढा रस्त्यावरही प्रचंड खड्डे पडले आहेत़ मागील वर्षी या रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले होते़ अवघ्या सहा महिन्यांतच जिंतूर ते पुंगळा, पुंगळा ते आडगाव फाटा हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे़ मोठ मोठे खड्डे पडल्याने खड्डा चुकविताना अनेक अपघात होत आहेत़ विशेष म्हणजे, या रस्त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च होवूनही रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’च आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे़ अशीच परिस्थिती जिंतूर-येलदरी या मार्गावरही झाली आहे़ या मार्गावरही अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रवास करीत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ या मुख्य रस्त्याप्रमाणेच तालुक्याला जोडणाºया अनेक डांबरी रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे़ या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वीच झालेला खर्च वायफळ गेला असून, सा़बां़ विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे़नेत्यांची चुप्पी४तालुक्यातील विविध रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत एकाही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी याबाबत चकार शब्दही काढलेला नाही़ विशेष म्हणजे, जिंतूर-परभणी या रस्त्यावरील प्रवाशांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत़ परंतु, राजकीय पक्ष गप्प का? याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे़४अशीच अवस्था जिंतूर-औंढा या रस्त्याची झाली आहे़ सहा महिन्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे सा़बां़ विभागाने बुजविले होते़ आज मात्र या रस्त्यावरून प्रवास करणे वाहनधारकांना कठीण झाले आहे़ याकडेही राजकीय पक्षांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते़

टॅग्स :parabhaniपरभणी