शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

परभणी पंचायत समिती : १३६ विहिरींचे प्रस्ताव छाननी समितीकडे पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:51 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिर योजनेचे प्रस्ताव तांत्रिक मान्यता प्राप्त करून ग्रामपंचायतींनी विहिरींच्या कामास मान्यता मिळविण्यासाठी पंचायत समितीकडे दाखल केले़ पंचायत समितीने प्राप्त प्रस्ताव १९ मार्च रोजी तालुकास्तरीय छाननी समितीकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत़ मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्यापही या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिर योजनेचे प्रस्ताव तांत्रिक मान्यता प्राप्त करून ग्रामपंचायतींनी विहिरींच्या कामास मान्यता मिळविण्यासाठी पंचायत समितीकडे दाखल केले़ पंचायत समितीने प्राप्त प्रस्ताव १९ मार्च रोजी तालुकास्तरीय छाननी समितीकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत़ मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्यापही या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही़परभणी पंचायत समिती अंतर्गत १३१ गावे येतात़ या गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समिती प्रशासनमार्फत विविध कामे केली जातात़ राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी राज्य शासनाने ११ कलमी कार्यक्रम हाती घेऊन समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना अंमलात आणली़ या योजनेतून सर्वसाधारणपणे ग्रामीण भागात सिंचन आणि स्वच्छतेची कामे हाती घ्यावयाची आहेत़ जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जनकल्याण योजनेची आखणी करून ग्रामीण भागातील जलसंधारण स्वच्छतेची कामे केली जाणार आहेत़ ‘कामे नरेगाची शाश्वत विकासाची’ हे ब्रिद वाक्य घेऊन योजना अंमलात आणली़ या योजनेत अमृत कुंड शेततळे, अंकुर रोपवाटीका, निर्मल शौचालय, कल्पवृक्ष फळबाग लागवड, अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना आदी ११ कामे करावयाची आहेत़ या योजनेंतर्गत करावयाच्या कामांचे उद्दिष्ठ ठरवून दिले आहे़ अहिल्यादेवी सिंचन विहिर योजनेंतर्गत आतापर्यंत केवळ २१ विहिरींचीच कामे पूर्ण झाली आहेत़ येत्या पावसाळ्यापुर्वी परभणी पंचायत समितीला दिलेले उद्दिष्ट पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाने तत्परता दाखविणे आवश्यक आहे़ परभणी पंचायत समिती प्रशासनाकडे अहिल्यदेवी सिंचन विहिर योजनेंतर्गत विहिरींचे प्रस्ताव तांत्रिक मान्यता प्राप्त करून ग्रामपंचायतींनी विहिरींच्या कामास मान्यता मिळविण्यासाठी १९ मार्च २०१८ रोजी तालुकास्तरीय छाननी समितीकडे अर्ज दाखल केले़ टप्प्या टप्प्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत १३६ अर्ज मान्यतेसाठी पाठविण्यात आले़ मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे़ तालुकास्तरीय छाननी समितीत पं़सक़डून प्राप्त प्रस्तावांवर कोणतीच चर्चा झाली नाही़ त्यामुळे मंजुरीविनाच हे प्रस्ताव छाननी समितीकडे पडून आहेत़ त्यामुळे या योजनेच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत़मार्चमध्ये पाठविले : ४७ प्रस्तावसमृद्ध महाराष्ट्र योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरींचे ४७ प्रस्ताव तांत्रिक मान्यता प्राप्त करून ग्रामपंचायतींनी विहिरींच्या कामास मान्यता मिळावी, यासाठी पं़स़ प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत़ पं़स़ प्रशासनाने या कामांना गती मिळावी, या उदात्त हेतुने प्राप्त ४७ प्रस्ताव तालुकास्तरीय छाननी समितीकडे पाठविले आहेत. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे़ अद्याप या प्रस्तावांना तालुकास्तरीय छाननी समितीची मंजुरी मिळाली नाही़ त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे़या गावांचा समावेशराज्य शासनाच्या समृद्ध महाराष्ट्र योजनेंतर्गत परभणी तालुक्यातील इस्माईलपूर, ताडपांगरी, उजाळंबा, आळंद, मोहपुरी, सिंगनापूर, टाकळी बोबडे, करडगाव, किन्होळा, इंदेवाडी, नरसापूर, पेगरगव्हाण, सोन्ना, आंबेटाकळी, उखळद, तट्टू जवळा, असोला, बोरवंड खुर्द, पिंगळी लोखंडे, नागापूर या गावातील प्रत्येकी ४ ते ५ लाभार्थ्यांचे प्रस्ताव दोन महिन्यांपासून तालुकास्तरीय छाननी समितीकडे मंजुरीअभावी पडून आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी