शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणी : पाणीपुरवठा योजनांची थकबाकी टंचाई निधीतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:11 IST

दुष्काळी भागातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची थकीत विद्युत देयकांची रक्कम टंचाई निधीतून देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे़ त्यामुळे या योजनांचा प्रश्न मार्गी लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुष्काळी भागातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची थकीत विद्युत देयकांची रक्कम टंचाई निधीतून देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे़ त्यामुळे या योजनांचा प्रश्न मार्गी लागणार आहे़राज्यातील १५१ तालुक्यातील २६८ महसुली मंडळात गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे़ त्या अनुषंगाने दुष्काळी उपाययोजनांना राज्य सरकारने सुरुवात केली आहे़ त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांची विद्युत देयके थकीत असल्यामुळे अनेक योजना बंद आहेत़ अशा योजना चालू केल्यास पाणीपुरवठा सुरळीत होवू शकतो व टँकर खर्चात बचत होवू शकते, या अनुषंगाने ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांची थकीत विद्युत देयके टंचाई निधीमधून देण्यासंदर्भातील निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ या संदर्भात ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक झाली होती़ या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला़ त्यानंतर ११ दिवसांनी या संदर्भातील आदेश राज्याच्या महसूल व वन विभागाने काढला आहे़ त्यानुसार ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांची थकीत विद्युत देयकांच्या मुद्दल रक्कमेपैकी ५ टक्के रक्कम सद्यस्थितीत मदत व पुनर्वसन विभागाकडून भरण्यात येणार आहे़ त्यामुळे अशा योजनांचा खंडीत करण्यात आलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, असेही या संदभातील आदेशात नमूद करण्यात आले आहे़त्यामुळे या पाणीपुरवठा योजना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ राज्य शासनाने ११ डिसेंबर रोजी हा आदेश काढला असला तरी त्याची अंमलबजावणी तातडीने होणे आवश्यक आहे़ जिल्ह्यात अद्याप या अनुषंगाने कार्यवाही झालेली नाही़

टॅग्स :parabhaniपरभणीPower ShutdownभारनियमनmahavitaranमहावितरणState Governmentराज्य सरकार